शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यात पर्यावरण धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:51 IST

निसर्गरम्य वसई भकास होण्याच्या मार्गावर : ६०० फूट बोअरवेल मारूनही लागत नाही पाणी

पारोळ : वसई तालुक्यातील पर्यावरण धोक्यात आले असून ओसाड डोंगर, सुक्या नद्या, बुजलेले बावखले, विकासकांनी केलेली तिवरांची कत्तल, खदान माफियांनी नष्ट केलेले डोंगर, वनजमीनीच्या नावाखाली केलेली जंगल तोड, रेती माफियांनी केलेली नदीतील दगड गोटयांची लूट, विकासाच्या नावाखाली शहरी भागात केलेली वृक्ष तोंड यामुळे वसई पर्यावरण धोक्यात आले असून निसर्गाने नटलेली वसई आज भकास होण्याच्या मार्गावर आहे., व या पर्यावरणाचा ºहास रोखण्यात प्रशासकीय यंत्रणा मात्र नापास झाल्या आहेत.

मध्यंतरी सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केली. विशेष म्हणजे या प्लास्टिक बंदी घोषणेचे लोकांनी उत्स्फूर्त असे स्वागत केले. दंडाच्या भीतीपेक्षा लोकांना प्लास्टिक भस्मासूराची जास्त चिंता वाटली होती. सर्वसामान्य लोकांनी स्वत:हून प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद केले. त्यांनी कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवातही केली. भाजी, केळी वगैरे विकणाऱ्यांनीही प्लास्टिकच्या पिशव्या देणे बंद केले होते. तपासनीसांनी प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांविरुद्ध दंडाची कारवाईही सुरू केली होती. प्रसारमाध्यमातून येणाºया माहितीमुळे शहरांप्रमाणे अगदी ग्रामीण भागातही प्लास्टिक बंदी पाळली जाऊ लागली होती. परंतु मध्यंतरी काय झाले कोण जाणे, सरकारी आदेशाची कारवाई थंडावली. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाºयांविरुद्ध करण्यात येणारी दंडाची कारवाईही थंड झाली. भाजीविक्रेत्यांनी पुन्हा प्लास्टिक पिशव्या वापरणे सुरू केले. कारवाई थंड झाल्याने त्यांच्या मनात भीती उरली नाही. वाईट याचेच वाटते की पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी सुरू झालेली ही विशेष मोहीम थंडावली. कायदा मोडण्याचे काहीच वाटेनासे झाले. प्लास्टिक बंदी हा केवळ एक निव्वळ फार्स ठरला. त्यामुळे येणाºया पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार चालूच राहणार आहेत.

मागील वर्षी काही भागांत पाऊस कमी पडला त्यामुळे यावर्षी बºयाच भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली पन्नास वर्षांत कोरड्या पडल्या नाहीत अशा विहिरी ही यंदा कोरड्या पडल्या, बोअरवेलचे पाणी खोल गेले मात्र अशावेळी पाण्याचे मोल आपणास कळू लागते.इमारतींची संख्या झपाट्याने वाढली झाडांची मात्र झाली कमी!

पाण्याचे खरे मोल अजूनही आपल्याला कळलेले नाही. बोअरवेल भूगर्भात इतकी खोल जाते की वसई ग्रामीण भागात ६०० फूट बोअरवेल मारूनही पाणी लागले नाही. पण, लाव्हारस बाहेर येईल की काय याची भीती वाटते.

शहरातील इमारतींची संख्या झपाट्याने वाढली पण झाडांची संख्या मात्र कमी झाली. वसईतील पर्यावरणाची हानी झाल्याने या भागात तापमानात ही वाढ झाली आहे.

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्व प्रशासकीय यंत्रणा मात्र वृक्षारोपण करून आपण पर्यावरणाचे रक्षण केले असा आव आणतात पण त्यांनी लावलेली झाडे किती जिवंत राहिली हा प्रश्न आहे. वसईतील पर्यावरण वाचविण्यासाठी संस्थानी पुढे येण्याची गरज आहे.