शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या व्यासपीठावरून पर्यावरणमंत्र्यांची टीका

By admin | Updated: June 8, 2015 04:28 IST

नालासोपारा येथे शुक्रवारी झालेल्या युतीच्या जाहीर सभेत उपस्थित नेत्यांनी केलेल्या विखारी प्रचारावरून सर्वत्र नाराजी व्यक्त होत असून वातावरणही तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे.

वसई : नालासोपारा येथे शुक्रवारी झालेल्या युतीच्या जाहीर सभेत उपस्थित नेत्यांनी केलेल्या विखारी प्रचारावरून सर्वत्र नाराजी व्यक्त होत असून वातावरणही तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. या सभेत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना लक्ष्य करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्यावरणमंत्र्यांनी त्यांना थेट दोन महिने जेलमध्ये पाठवण्याची गर्भीत धमकीच दिली. त्यामुळे राजकीय वातावरण बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने युतीच्या सरकारला बिनशर्त पाठींबा दिला असला तरी जिल्हापरिषद निवडणुकीमध्ये भाजपने बहुजन विकास आघाडीला जवळ करत सेनेला धोबीपछाड दिल्यामुळे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ही टीका केली असल्याची चर्चा होत आहे.राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्यासह पक्षाच्या ३ आमदारांचा फडणवीस सरकारला बिनशर्त पाठींबा जाहीर केला. त्यानंतर झालेल्या जिल्हापरिषद निवडणुकीमध्ये भाजपने बहुजन विकास आघाडीशी हातमिळवणी करून सेनेला सत्तेपासून दूर राखले होते. परंतु वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत सेना-भाजप युती झाली. शनिवारी झालेल्या युतीच्या या सभेत आघाडीच्या एकंदरीत कारभारावर सर्वच वक्त्यांनी टीकास्त्र सोडले. सेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख असणारे अनंत तरे यांनी दोनच दिवसापूर्वी ठाण्यामध्ये भाजपवर लबाडीचा आरोप केला होता. ते ही व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते. त्यांनी भाजपची ताकद नसतानाही आम्ही त्यांना ४० जागा दिल्या परंतु त्या पक्षाचे काही उमेदवारी अर्ज फेटाळले गेले. तर बविआच्या प्रमुख उमेदवाराविरूद्ध असलेल्या भाजपच्या उमेदवाराने अचानक माघार घेतली. या घडामोडीमुळे भाजपने आमच्याबरोबर लबाडी केली असे स्पष्ट वक्त व्य केले होते. त्याच व्यासपीठावरून भाजप व सेना नेत्यांनी ठाकूरांवर विखारी टीका केली. जिल्हापरिषदेमध्ये आपण हातात हात घालून काम करीत आहोत हे पालकमंत्री सवरा व भाजपचे नेते सोयीस्करपणे विसरले. तर भाजपने दोनदा तोंडघशी पाडल्यानंतरही सेना नेते युतीच्या हाती सत्ता सोपवा असे सांगत होते. हा विरोधाभास लक्षात घेता राज्यात युतीचे सरकार असले तरी, जिल्ह्यात या दोघांमध्ये योग्य तो समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रामदास कदमांच्या या टीकेला आमदार ठाकूर कसे उत्तर देतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)