शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पर्यावरण समितीचे बेमुदत उपोषण सुरू; पाणथळ जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 02:41 IST

सोमवारी सकाळी १० वाजता वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या आंदोलनास सुरुवात करण्यात आली.

वसई : वसई तालुक्यातील विविध भागातील सरकारी तसेच पाणथळ जागेवर अनधिकृत उभी राहिलेली अतिक्र मणे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाकडून हटवण्यात यावीत, या मागणीसाठी पर्यावरण संवर्धन समितीच्या बेमुदत उपोषणास सोमवार, २ डिसेंबरपासून सुरुवात झाली. जोपर्यंत ही अतिक्रमणे काढण्यात येत नाहीत, तोवर हे उपोषण सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्ते मॅकेनजी डाबरे, मॅक्सवेल रोझ आणि समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी दिली आहे.सोमवारी सकाळी १० वाजता वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या आंदोलनास सुरुवात करण्यात आली.दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यावर पर्यावरण समितीच्यावतीने वसई प्रांतांधिकारी स्वप्नील तांगडे आणि वसई तहसीलदार किरण सुरवसे यांना या गंभीर विषयाची आठवण करून देण्यात आली होती. गेल्या आठवड्यातच समितीने वसई प्रांतांना समक्ष भेटून आपण सरकारी जमिनी आणि पाणथळ जागेवरील प्रकल्प, बेकायदेशीर अतिक्रमणे, त्यावर झालेली बांधकामे यावर काही ठोस कारवाई करणार का, अन्यथा पर्यावरण समिती २ डिसेंबरपासून आमरण उपोषणाला बसेल, असा लेखी इशारा दिला होता.त्यावेळी वसई प्रांतांनी लागलीच संबधित महसूल, पोलीस, महावितरण आणि खास करून नियोजन प्राधिकरण म्हणून वसई - विरार महापालिका यांना बैठकीला बोलावून त्यांना याबाबत नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाईची जबाबदारी महापालिकेची असल्याचे स्पष्ट केले होते.मात्र, महसूल व महापालिका प्रशासन विभागाने गेला महिनाभर केवळ आंधळी कोशिंबिरीचा खेळ मांडून याबाबत काहीही कारवाई केली नाही. अखेर सोमवारी वसई पर्यावरण समितीने आपल्या आंदोलनास सुरुवात केली. कोळी युवा शक्ती, वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था पाचूबंदर तसेच वनशक्ती संघटना आदिवासी एकता परिषद अशा तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक संघटना, संस्था आणि त्यांचे शेकडो पदाधिकारी तसचे हजारो कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळी भेट देत आपला जाहीर पाठिंबा दिल्याचे वर्तक यांनी लोकमतला सांगितले.या आंदोलनसंदर्भात दुपारी वसई प्रांत कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते. मात्र प्रांतांचा संपर्क न होऊ शकल्याने याबाबत काहीही माहिती मिळाली नाही.फा. दिब्रिटो यांचा पाठिंबाहरित वसईचे प्रणेते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच या आंदोलनालाही त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे आमच्या या आंदोलनाला अधिक बळ मिळत असल्याची प्रतिक्रि या यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली. कोळी युवा शक्ती, वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था पाचूबंदर तसेच वनशक्ती संघटना आदिवासी एकता परिषद अशा अनेक संघटना, संस्थांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार