शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जव्हारची नळपाणी योजना मंजूर, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन केले पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 02:41 IST

महाराष्ट सुर्वण जयंती नगरोत्थान महाज़्यान अंतर्गत जव्हार शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास १६ कोटी ७० लाखांची प्रशासकिय मान्यता शुक्र वारी देण्यात आली आहे.

जव्हार - महाराष्ट सुर्वण जयंती नगरोत्थान महाज़्यान अंतर्गत जव्हार शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास १६ कोटी ७० लाखांची प्रशासकिय मान्यता शुक्र वारी देण्यात आली आहे. खडखड धरणातून राखीव पाणी क्षेत्रातून नवीन नळपाणी योजना प्रस्ताव मागील काही वर्षापासुन नगर परिषदे मार्फत मंत्रालयात दाखल करण्यात आले होते, या प्रस्तावाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे.जव्हार नगरपरिषदले १ सप्टेंबर २०१८ रोजी १०० वर्ष पुर्ण झाले म्हणून, दि. १ ते ६ सप्टेंबर पर्यत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी जव्हारच्या नवीन नळपाणी योजना व शहराची हद्दवाढ व इतर विकासात्मक योजनेचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी फडणवीस यांनी सभामंडपातच नळपाणी योजना मंजुर करतो अशी घोषणा केली होती. अखेर त्यांनी १६ कोटी ७० लाख रुपयांची ही योजना मंजूर करून तसे प्रशासकीय आदेश संबधीत विभागांना दिले आहेत.शहराचे विस्तारीकरण व जुनी नळपाणी योजना असल्यामुळे बहुताश भागात पाणी टंचाईची परिस्थिती आहे,. त्यामुळे वाढती लोकसंख्या पाहता नगर परिषदेने तालुक्यातील खडखड धरणातून आरक्षित पाणी साठ्याचे शहरासाठी नवीन नळपाणी योजनेचा १८ कोटींचा प्रस्ताव गेल्या काही वर्षापासुन मंत्रालयात मंजूरी करीता पाठविल होता. मात्र याचा पाठपुरावा नगराध्यक्ष पटेल, उपनगराध्यक्ष पद्मा रजपूत, विरोधीपक्ष नेते दिपक कांगणे, कृणाल उदावंत तसेच इतर सर्व नगरसेवकांनी केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जव्हारकरांचा महत्वाचे पाणी प्रश्न मार्गी लागले आहे. यामुळे जव्हार भागामध्ये दिवाळी आधीच दिवाळसणाचा आनंत असून अनेकांचे पाण्यासे स्वप्न पुर्ण होणार आहे.मंजूर निधीचा तपशीलराज्य शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किमतीच्या ९० टक्के) - १५ कोटी ३ लाख, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहग (प्रकल्प किमतीच्या १० टक्के )- १ कोटी ६७ लाखश्रीमंत यशवंतराव महाराजांनी पाणी पुरवठा योजना संस्थानाच्या निधीतून पुर्ण करून जव्हार वासीयांना जयसागर डॅम बांधून दिली आहे.राज्यात मालकीच्या धरणातून पाणी पुरवठा योजना असणारी एकमेव नगर परिषद आहे. त्यावेळेस राजेंनी जवळ जवळ २००० ते २५०० लोकसंख्या असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करून डॅम तयार केला होता. तो आजतागायात जवळ जवळ २५ हजार लोकसंख्या असलेल्या जव्हारकरांची तहान भागवित आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार