शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आधारनोंदणी करार संपला : जनतेचे प्रचंड हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:20 IST

केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या आधार नोंदणीचा करार संपल्याने, महिना भरापासून राज्यातील आधारनोंदणी केंद्रे्र बंद आहेत.यामुळे या तालुक्यातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

- हुसेन मेमन  जव्हार : केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या आधार नोंदणीचा करार संपल्याने, महिना भरापासून राज्यातील आधारनोंदणी केंद्रे्र बंद आहेत.यामुळे या तालुक्यातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.आधार नोंदणीसाठी बंगळूर येथील खाजगी कंपनीस कंत्राट देण्यात आले होते, त्यानुसार महाआॅनलाईन साठी सी.एम.एस. आणि आभा कंपनीतर्फे विद्यार्थ्यांसह नागरिकांची आधार नोंदणी केली जात होती, मात्र या कंपनीचा राज्य स्तरावरील करार संपून महिना लोटला असला तरी, नवीन करार न झाल्याने आधार नोंदणीचे काम जिल्ह्यासह राज्यभर बंद आहे. विध्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक , शेतकरी यांचे प्रचंड हाल होत आहेत. आधारकार्ड केंद्र कधी सुरू होईल याचे उत्तरच कुणी देत नाही, यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.शासनाच्या नवीन आदेशानुसार बाळाच्या जन्मापासून ते वयोवृध्दानपर्यंत आधारकार्डची शासनाने सक्ती केली आहे. आधार कार्डचा नंबर सर्वच शासकीय, बँक, शैक्षणिक या बाबींसाठी आवश्यक आहे. या तालुक्यातील जनतेला कोणत्याही लहान-मोठया बाबींसाठी जव्हार शहरात यावे लागते, परंतु आधारकार्ड केंद्र बंद असल्याने त्यांची उगीचच पायपीट होत आहे. हे केंद्र लवकरात लवकर सुरु करावे अशी जनतेची मागणी आहे.आधारकार्ड देणारी यंत्रणा सुरळीत नसतांना आधार सक्तीचे करण्याच्या शासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे येथील आदिवासीबांधवाना खूपच त्रास सहन करावा लागतो, बँकेत खाते उघडण्यापासून तर दाखल्यापर्यंत आधार लागत आहे, त्यामुळे आधार केंद्र लवकरात लवकर सुरू करावेत. - दीपक कांगण, जव्हार