शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

उपसभापतींनीच केले अतिक्रमण

By admin | Updated: April 26, 2017 00:00 IST

वसई पंचायत समितीच्या उपसभापतींनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सरकारी गुर चरण जागेवर अतिक्रमण करून घर बांधले असून

शशी करपे / वसईवसई पंचायत समितीच्या उपसभापतींनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सरकारी गुर चरण जागेवर अतिक्रमण करून घर बांधले असून त्याला घरपट्टी लावण्यासाठी ग्रामपंचायतीनेही बेकायदा ठराव केल्याचे उजेडात आले आहे. त्याचबरोबर शर्तीची जमीन विकल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सत्पाळा येथील सर्व्हे क्रमांक ५० ही सरकारी गुरेचरण जागा सन १९४३ ला आंद्रुळ सोवार सोज यांना दहा वर्षांसाठी दिली होती. हा हुकुम रद्द झाल्यानंतर ती व्हीलेज पंचायत वटार यांच्याकडे मॅनेजमेंटसाठी दिली होती. मात्र, या जागेवर तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य तथा वसई पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनी अतिक्रमण करून घर बांधल्याची तक्रार लक्ष्मण पंडित भोई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या जागेवरील झोपडीवजा घराला घरपट्टी लावण्यासाठी आपल्या लेटरपॅडचा वापर करून एक अर्ज ठाकूर यांनी ग्रामपंचायतीकडे सादर केला होता. त्यावर कोणतीही चौकशी न करता या अनधिकृत घराला २४ डिसेंबर १२ च्या सभेत ५/८ च्या ठरावाने घरपट्टी लावण्यात आली होती. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. घरपट्टी लावताना मात्र, त्यावर अनधिकृतचा शिक्का मारण्यात आलेला नाही. त्यामुळे शास्ती बुडवण्यात आल्याचेही उजेडात आले आहे. ठाकूर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सरकारी जमीन बळकावली आणि त्यावर अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना पदावरून त्वरीत दूर करण्यात यावे. बेकायदा घरपट्टी लावणाऱ्या ठरावाला मान्यता देणाऱ्या सर्व सदस्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भोई यांनी केली आहे. सर्व्हे क्रमांक १३४, हिस्सा क्रमांक १/१ पैकी १/५ या क्षेत्रात खाजग जमीन आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण करण्यास मनाई आहे. तसा उल्लेख ७/१२ उताऱ्यावर आहे, असे असताना ठाकूर यांनी त्या जागेवर ग्रामपंचायतीच्या ३१ जुलै २०१४ च्या सभेत ठराव क्रमांक ५/१० अन्वये स्वत:च्या नावाने घरपट्टी लावल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. सदर जागा नारायण हरी पाटील यांच्या नावे आहे. मात्र वारस तक्त्यात भालचंद्र नारायण पाटील यांचे नाव नसतांना त्यांच्या नावाने ६ फेब्रुवारी २००९ रोजीचे जमीन विकत घेत असल्याचे संमतीपत्र तयार केले आहे. संमतीपत्रात इतर वारसदारांची संमती न घेता स्वत: विकत घेतल्याची कागदपत्रे तयार केली. त्यानंतर ही जमीन ठाकूर यांनी लक्ष्मण चेलंगी यांना विकूनही टाकली. ती शर्तीची असताना ठाकूर यांनी बेकायदेशीर खरेदी-विक्री केल्याची तक्रार आहे.