शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणीकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
5
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
6
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
8
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
9
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
10
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
11
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
13
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
14
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
15
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
16
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
17
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
18
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
19
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
20
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

उपसभापतींनीच केले अतिक्रमण

By admin | Updated: April 26, 2017 00:00 IST

वसई पंचायत समितीच्या उपसभापतींनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सरकारी गुर चरण जागेवर अतिक्रमण करून घर बांधले असून

शशी करपे / वसईवसई पंचायत समितीच्या उपसभापतींनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सरकारी गुर चरण जागेवर अतिक्रमण करून घर बांधले असून त्याला घरपट्टी लावण्यासाठी ग्रामपंचायतीनेही बेकायदा ठराव केल्याचे उजेडात आले आहे. त्याचबरोबर शर्तीची जमीन विकल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सत्पाळा येथील सर्व्हे क्रमांक ५० ही सरकारी गुरेचरण जागा सन १९४३ ला आंद्रुळ सोवार सोज यांना दहा वर्षांसाठी दिली होती. हा हुकुम रद्द झाल्यानंतर ती व्हीलेज पंचायत वटार यांच्याकडे मॅनेजमेंटसाठी दिली होती. मात्र, या जागेवर तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य तथा वसई पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनी अतिक्रमण करून घर बांधल्याची तक्रार लक्ष्मण पंडित भोई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या जागेवरील झोपडीवजा घराला घरपट्टी लावण्यासाठी आपल्या लेटरपॅडचा वापर करून एक अर्ज ठाकूर यांनी ग्रामपंचायतीकडे सादर केला होता. त्यावर कोणतीही चौकशी न करता या अनधिकृत घराला २४ डिसेंबर १२ च्या सभेत ५/८ च्या ठरावाने घरपट्टी लावण्यात आली होती. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. घरपट्टी लावताना मात्र, त्यावर अनधिकृतचा शिक्का मारण्यात आलेला नाही. त्यामुळे शास्ती बुडवण्यात आल्याचेही उजेडात आले आहे. ठाकूर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सरकारी जमीन बळकावली आणि त्यावर अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना पदावरून त्वरीत दूर करण्यात यावे. बेकायदा घरपट्टी लावणाऱ्या ठरावाला मान्यता देणाऱ्या सर्व सदस्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भोई यांनी केली आहे. सर्व्हे क्रमांक १३४, हिस्सा क्रमांक १/१ पैकी १/५ या क्षेत्रात खाजग जमीन आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण करण्यास मनाई आहे. तसा उल्लेख ७/१२ उताऱ्यावर आहे, असे असताना ठाकूर यांनी त्या जागेवर ग्रामपंचायतीच्या ३१ जुलै २०१४ च्या सभेत ठराव क्रमांक ५/१० अन्वये स्वत:च्या नावाने घरपट्टी लावल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. सदर जागा नारायण हरी पाटील यांच्या नावे आहे. मात्र वारस तक्त्यात भालचंद्र नारायण पाटील यांचे नाव नसतांना त्यांच्या नावाने ६ फेब्रुवारी २००९ रोजीचे जमीन विकत घेत असल्याचे संमतीपत्र तयार केले आहे. संमतीपत्रात इतर वारसदारांची संमती न घेता स्वत: विकत घेतल्याची कागदपत्रे तयार केली. त्यानंतर ही जमीन ठाकूर यांनी लक्ष्मण चेलंगी यांना विकूनही टाकली. ती शर्तीची असताना ठाकूर यांनी बेकायदेशीर खरेदी-विक्री केल्याची तक्रार आहे.