शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

मोखाड्यात रोजगार, थकीत मजुरी नाही

By admin | Updated: March 31, 2017 05:24 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात ४८ हजार कोटींची भरघोस तरतूद केली असा प्रचंड गाजावाजा केला असला तरी राज्यातील रोजगार हमी

रवींद्र साळवे / मोखाडाकेंद्रीय अर्थसंकल्पात ४८ हजार कोटींची भरघोस तरतूद केली असा प्रचंड गाजावाजा केला असला तरी राज्यातील रोजगार हमी योजनेचे पार तीन तेरा वाजले आहेत. मोखाड्यासारख्या दारिद्र्याने गांजलेल्या कुपोषणग्रस्त तालुक्यातील आदिवासी मजुरांना रोजगार हमीद्वारे काम देण्यात आणि त्यांची थकीत मजुरी देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. या तालुक्यात महिन्याला सरासरी ४ मनुष्य दिवससुद्धा काम उपलब्ध झालेले नाही असे धक्कादायक सत्य समोर आले आहे.मोखाड्यातील जॉबकार्ड धारकांची संख्या १५ हजार ४६७ इतकी आहे तर प्रत्यक्ष काम करू शकणाऱ्या मजुरांची संख्या २४ हजार ५२३ इतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कामाची गरज असताना डिसेंबर २०१६ मध्ये ३ हजार ६३८, जानेवारीत ११ हजार ५६५ आणि फेब्रुवारीत १४ हजार ३३९ इतक्या व्यक्तींना काम मिळू शकले. याचा अर्थ डिसेंबरमध्ये १०० पैकी अवघ्या १४ मजुरांना, जानेवारीत १०० पैकी ४७ मजुरांना तर फेब्रुवारीत १०० पैकी फक्त ५८ मजुरांना काम मिळू शकले. त्या पेक्षा धक्कादायक असे की हे काम महिन्यातून केवळ सरासरी ४ दिवसाचं मिळू शकले ही वस्तुस्थिती आहे.मोखाडा तालुका अतिदुर्गम भाग असल्याने त्या ठिकाणी सतत विजेचा लपंडाव असतो. रोहयोची सर्व कामं ही आॅनलाइन प्रणालीवर आधारित असल्याने या वीज नसल्याचा मोठा फटका या कामाला सहन करावा लागतो. असे असताना शासनाने या भागात इन्व्हर्टर उपलब्ध करून दिलेले नाहीत. श्रमजीवीने याबाबत आवाज उठवला तर तहसील कार्यालयात इन्व्हर्टर आला मात्र पंचायत समितीमध्ये अजूनही त्याचा पत्ता नाही. परिणामी मजुरांनी केलेल्या कामाच्या मस्टर्सची आॅनलाइन नोंद जानेवारी महिन्यापासून प्रलंबित आहे. रोजगार सेवक हा रोहयोचा कणा आहे. मात्र तरीही या रोजगार सेवकांना सरकार तुटपुंजे वेतन देते आणि ते सुद्धा आॅक्टोबर २०१६ पासून देण्यात आलेले नाही. त्यांना प्रवास भत्ता, आहार भत्ता देण्याची तरतूद असतानाही निधी नसल्याचे कारण सांगत ते ही दिलेले नाही. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डेटा एन्ट्री आॅपरेटर, सहायक प्रकल्प अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना देखील गेल्या चार महिन्यापासून त्यांचे तुटपुंजे वेतनही दिलेले नाही. निधी नसल्याचे कारण सांगत जुलै २०१६ पासून मजुरांची मजुरी देखील प्रलंबित आहे. विवेक पंडित यांनी केलेल्या जव्हार, मोखाडा दौऱ्यात या धक्कादायक गोष्टी समोर आल्या. शासनाने रोजगार हमी योजना गुंडाळून ठेवण्याचा घाट घातला असून ग्रामीण भागातील गरिबांना उपासमारीची खाईत ढकलले आहे. हे सर्व सरकार जाणीवपूर्वक करत आहे असा स्पष्ट आरोप त्यांनी केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आजपर्यंत कधीही आदिवासी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रोहयोचा आढावा घेऊन प्रत्यक्ष तालुक्यात जाऊन त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. पुढचे तीन दिवस रोजगार हमी वरील कामाची मागणी करण्यासाठी आणि जनजागृतीसाठी श्रमजीवी संघटना जाहीर अभियान राबवत आहे. ही वस्तुस्थिती उघड झाल्यावर आता जिल्हा प्रशासन आणि सरकार काय करते? याकडे सगळ््यांचे लक्ष लागले आहे.परिस्थिती न सुधारल्यास कायदा हातीया अभियानात प्रशासनाने सहभागी होऊन किमान पुढील तीन महिने तरी जास्तीत जास्त कामे देऊन ही परिस्थिती सुधारावी असे आवाहन पंडित यांनी केले आहे. तसे न झाल्यास प्रशासन अजूनही गंभीर नाही असे समजावे लागेल, आणि त्यानंतर आदिवासी कायदा हातात घेतील, असा इशारा त्यांनी दिला.तसे झाल्यास श्रमजीवी संघटनेला जबाबदार धरू नये असेही श्रमजिवी संघटनेने स्पष्ट केले आहे.