शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कर्मचाऱ्यांना ३ महिने पगार नाही

By admin | Updated: July 30, 2015 00:29 IST

जिल्हा परिषदेंतर्गत ७ तालुक्यांतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंते व कर्मचारी यांना मे २०१५ पासून पगार दिलेला नाही. तीन महिन्यांपासून त्यांच्यावर उपासमारीची पाळी

पालघर : जिल्हा परिषदेंतर्गत ७ तालुक्यांतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंते व कर्मचारी यांना मे २०१५ पासून पगार दिलेला नाही. तीन महिन्यांपासून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. विद्युत, पाणी आदींची कार्यालयीन देयके प्रलंबित असल्याने या सर्व कार्यालयांचा कारभार बंद पडण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सात तालुक्यांतील अभियंते, नियमित आस्थापनांवरील मजूर तसेच तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत कर्मचारी यांचे पगार वेळेवर होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावरून कुठलीही कार्यवाही होत नाही. या गलथानपणामुळे मे २०१५ पासून आजतागायत पगाराचे पैसे मिळाले नाहीत. तसेच कार्यालयांचा कारभार चालविण्याच्या दृष्टीने विविध लेखाशीर्षांतर्गत निधी उपलब्ध होत नसल्याने विद्युत देयके, पाणी, इंधन देयके, कार्यालयीन खर्चाची देयके प्रलंबित आहेत. त्यामुळे कार्यालयीन कारभार कसा व किती दिवस या परिस्थितीत चालवायचा, असा प्रश्न अधिकारी, कर्मचारी विचारत आहेत.पालघर जिल्हा परिषद प्रशासनाकडून आकृतीबंध मंजूर करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पाठपुरावाही सुरू असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी लोकमतला सांगितले होते. परंतु, आकृतीबंधच मंजूर होत नसल्याने व यासाठी किती कालावधी लागेल, याबाबत निश्चित डेडलाइन नसल्याने सगळे अधांतरी आहे. या सर्व अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने पालकमंत्री विष्णू सवरा यांनी अधिकाऱ्यांनी चालविलेल्या आकृतीबंध पाठपुराव्याच्या प्रयत्नांना हवी तशी जोड मिळत नसल्याने जिल्ह्याचा कारभार सुरळीत चालविण्याच्या दृष्टीने अनेक अडथळे निर्माण होत आहेत. (वार्ताहर)