वसई : दोन हजार कोटींंचे बजेट असलेल्या वसई-विरार महापालिकेतील १ हजार २४२ कर्मचारी घरभाडे भत्त्यापासून वंचित राहीले असून, त्यांना ताबडतोब तोम मंजूर करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसई विरार शहराची लोकसंख्या १७ लाखांच्या वर गेली आहे. झपाट्याने वाढत जाणाऱ्या या शहरातील इतर वस्तूंबरोबर घरभाडेही वाढत चालले आहे. मात्र, या पालिकेतील कर्मचारी ३० टक्के घरभाडे भत्त्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे पे-स्लीपवर पगाराची रक्कम कमी दिसते. त्यामुळे त्यांना स्वत:चे घर कर्जाने घ्यायचे म्हटले तर पुरेसे कर्ज मिळत नाही. अशा अवघड परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागत आहे.उल्हासनगर महापालिका वसई-विरारच्या तुलनेत मुंबईपासून लांब आहे. तसेच तिचे अंदाजपत्रक सातशे कोटींचे आहे. याउलट मुंबईला लागून असलेल्या वसई-विरारचे अंदाजपत्रक दोन हजार कोंटींचे आहे. त्यामुळे या पालिकेचा एक्स वर्गात समावेश करून येथील कर्मचाऱ्यांना ३० टक्के घरभाडे देण्यात यावे. अशी मागणी चोरघे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यावर काय निर्णय होतो याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)- १६ डिसेंबरच्या निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत दराने घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे. सुधारीत वर्गीकरणात उल्हासनगर महापालिकेला एक्स दर्जा देऊन तिच्या कर्मचाऱ्यांना ३० टक्के घरभाडेभत्ता देण्यात आला आहे.
घरभाडे भत्त्यापासून कर्मचारी वंचित
By admin | Updated: February 3, 2017 02:17 IST