शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सुशिक्षित बेरोजगारांना स्थानिक ठिकाणीच हवे काम; बेरोजगारांसह स्थानिकांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 23:55 IST

औद्योगिक वसाहतीला परवानगी द्या,विक्रमगड हा आदिवासी लोकवस्तीचा तालुका असून या भागातील विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटलेला आहे.

राहुल वाडेकरविक्रमगड : पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यांचा खुंटलेला विकास आणि गरिबी, दारिद्र्य, अज्ञान, सुशिक्षितांची बेरोजगारी दूर करण्यासाठी या ग्रामीण तालुक्यांच्या भागात शासनाने औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीची परवानगी द्यावी, अशी मागणी बेरोजगारांकडून कित्येक वर्षांपासून केली जात आहे.

विक्रमगड हा आदिवासी लोकवस्तीचा तालुका असून या भागातील विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटलेला आहे. या तालुक्यात मोठा रोजगार नसल्याने गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. दारिद्र्य, बेरोजगारी, काम नसल्याने कुटुंबावर येणारी उपासमारी आदी समस्या या ठिकाणच्या लोकांच्या आहेत. या ग्रामीण तालुक्यात बेरोेजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून कामाच्या शोधात अनेक कुटुंबे वेगवेगळ्या शहरांच्या ठिकाणी आपल्या मुलाबाळांसह स्थलांतरित होत असतात. पावसाळ्यातील चार महिन्यांचा शेतीचा हंगाम सोडला तर इतर आठ महिन्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांना व मजुरांच्या हाताला काम देणारा छोटा व मोठा कोणताही उद्योग, औद्योगिक क्षेत्र, कंपन्या नाहीत. शिवाय, या भागात पुरेसे रब्बी पीक होत नसल्याने व शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची योग्यरीत्या अंमलबजावणी होत नसल्याने व रोजगार हमीच्या कामांवरील मजुरी मजुरांना परवड नसल्याने येथील कुटुंबांना कामाच्या शोधात शहरांकडे स्थलांतर व्हावे लागते. अशातच या गरीब कुटुंबांतील मुलांची अशिक्षितपणामुळे अनेकदा फसगतही होताना दिसते. अशा परिस्थितीत जर शासनाने येथे एमआयडीसीच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या कच्च्या मालाप्रमाणे औद्योगिक वसाहतींना परवानगी दिली, बेरोजगारांना प्रशिक्षण दिले, तर बेरोजगार तसेच येथील अन्य बांधवांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम उपलब्ध होऊन बेरोजगारी, दारिद्र्य, अशिक्षितपणा दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

विक्रमगड तालुक्यात उच्चशिक्षित असे अनेक तरुण बेरोजगार आहेत व त्यांना स्थानिक पातळीवर काम हवे आहे. त्यामुळे या भागात नवीन उद्योग यायला हवे आहेत. -ज्ञानेश्वर जाधव, सुशिक्षित बेरोजगार, विक्रमगड

टॅग्स :MIDCएमआयडीसी