शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मुद्रा योजनेला बॅँकांचेच ‘ग्रहण’, एन.पी.एचे कारण पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:23 IST

राष्ट्रीयकृत बँकांच्या असहकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी असा गाजावाजा करण्यात आलेली मुद्रा कर्ज योजना फोल ठरत असून बँकांकडे कर्ज मागण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील बेरोजगार तरु णांना बँकेतून कर्ज दिले जात नसल्याने त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे.

-हितेन नाईक, निखिल मेस्त्री पालघर : जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या असहकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी असा गाजावाजा करण्यात आलेली मुद्रा कर्ज योजना फोल ठरत असून बँकांकडे कर्ज मागण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील बेरोजगार तरु णांना बँकेतून कर्ज दिले जात नसल्याने त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे.या योजनेअंतर्गतचा लाभ घेण्यासाठी बँकांकडे संबंधित पुरेसे कागदपत्रे घेऊन गेलेल्या बेरोजगार तरु णांना बँका कर्ज देत नसल्यामुळे त्यांची घोर निराशा होत असून एकही लोकप्रतिनिधी ह्याबाबत बँकांना जाब विचारत नसल्याने तरु णांना नाउमेद होत आहे. ३१ डिसेंबर २०१७ अखेरीस जिल्ह्यात ६ हजार २४२ लाभार्थीना केवळ ५२.०१ कोटी इतकेच कर्ज वाटप केलेले आहे. आश्चर्याची बाब अशी की या कर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयकृत बँकांपैकी १९ बँकानीच अशाप्रकारे कर्ज उपलब्ध करून देण्यात रस दाखिवलेला आहे. त्यातही जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणजे बँक आॅफ महाराष्ट्रचा सर्वात मोठा वाटा आहे. या बँकेने सर्वाधिक म्हणजे १४ कोटी ४७ लाख इतके मुद्रा कर्ज वाटप केलेले आहे. तर खाजगी बँका-वित्तीय संस्था चे सर्वाधिक लाभार्थी (३०१५) तर त्याखालोखाल देना बँकचे लाभार्थी (१०८४) एवढे असले तरी या बँकांनी केलेले कर्जवाटप अनुक्र मे १०.२० कोटी व ४.६४ कोटी एवढेच आहे.मुद्रा योजनेअंतर्गत लाभार्थ्यास शिशु-किशोर-तरु ण अशा तीन गटातून नवीन व्यवसायासाठी व व्यवसाय वृद्धीसाठी ५० हजारापासून ते १० लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. कोणत्याही हमी शिवाय हे कर्ज सहजरित्या उपलब्ध करून दिली जाणारी योजना अशी मोठं मोठे जाहिरातिचे बॅनर लावून शासन पातळी वरून गाजावाजा केला जात आहे. मात्र, येथील बँका ती राबविण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत गेलेल्या लाभार्थ्यांना तारण हवे, वेगवेगळी कागदपत्रे हवीत, हमी देणारे हवेत आदी कारणे सांगून धुडकावून लावत आहेत.अशा प्रकारची कर्ज देऊन आमची शाखा एन.पी. ए. (नॉन परफॉर्मींग एसेट्स) झाली असल्याची कारणेही बँका देताना दिसत आहेत. गेल्यावेळीही कोकण विभागात या योजनेअंतर्गतची पालघर जिल्ह्याची एकंदरीत कामिगरी खूपच निराशाजनक असल्याचे कोकण माहिती व जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या एका माहितीपत्रकातून स्पष्ट होत आहे.