शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सूर्याच्या उजव्या कालव्याला पाणीगळतीचे ग्रहण; कालव्याची झाली दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 23:50 IST

शेतीला अपुरा पाणीपुरवठा; गळतीमुळे शेवटच्या टोकाकडील शेतकरी अडचणीत

कासा : डहाणू तालुक्यात सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी धरण आणि कवडास बंधारा येत असून त्यापैकी कवडास बंधाऱ्यातून, कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र दुरवस्थेमुळे उजव्या कालव्यातून ठिकठिकाणी पाणीगळती होत असून शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो.

सारणी गावाजवळ उजव्या कालव्याच्या दुरवस्थेमुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे दिसते आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे कालव्याला या ठिकाणी मोठ्या चिरा (भेगा) गेल्या असून त्यातून गळती होणारे पाणी हे डहाणू- जव्हार या मार्गावर पसरलेले पाहावयास मिळते. डहाणू - जव्हार या मार्गावर प्रवास करणाºया अनेक बाईकस्वारांचे रस्त्यावरील या पाण्यामुळे अपघात झाले आहेत. तसेच उर्से, म्हसाड, साये, आंबिस्ते, आंबिवली आदी ठिकाणी कालव्यातून तसेच गेट तुटल्याने मोठ्या प्रमाणावर गळती होते. असे असले तरी पाटबंधारे विभागाचे मात्र या बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे.

आदिवासी भागातील पाण्याची गरज भागविण्यासाठी शासनाने या कालव्याची निर्मिती केली. मुख्य कालवा ८० किमीचा असून त्याअंतर्गत इतर छोट्या कालव्याची लांबी तीनशे ते साडेतीनशे किमी असून त्यांच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी पाणी पुरवठा होतो. परंतु या कालव्याची दुरुस्ती न केल्याने व गाळ न काढल्याने त्यांचीअवस्था दयनीय झाली आहे. शेती सिंचनातून वर्षापोटी शासनाला लाखो रुपयांचा शेती सिंचन महसूल जमा होतो. एवढे उत्पन्न मिळत असूनही या कालव्याची दुरुस्ती व गाळ काढण्यात का आला नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

या कालव्याच्या दुरवस्थेबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा पाटबंधारे विभागाला निवेदनही दिले आहे. परंतु याबाबत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. या कालव्यांमधून होणाºया गळतीमुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे पिकावर परिणाम होत असून पाण्याअभावी पिके करपतात. शेतकºयांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.कालव्याची ठिकठिकाणी पडझड झाली असून त्यामुळे पाणी वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. आम्ही याबाबत अनेकदा पाटबंधारे विभागाला कळविले आहे, परंतु याबाबत मात्र कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. - सुरेश जाधव, शेतकरी