शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

अर्नाळ्यातील सुरुंची बाग धोक्यात

By admin | Updated: June 30, 2017 02:35 IST

गेल्या पाच दिवसांपासून कोसळत असलेला पाऊस आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने अर्नाळा समुद्रकिनारा उध्वस्त होऊन

शशी करपे। लोकमत न्यूज नेटवर्कवसई : गेल्या पाच दिवसांपासून कोसळत असलेला पाऊस आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने अर्नाळा समुद्रकिनारा उध्वस्त होऊन सुरुची अनेक झाडे वाहून गेली आहेत. धूपप्रतिबंधक बंधारा या किनाऱ्यावर नसल्याने हा अनर्थ घडतो आहे.उधाणाचे पाणी प्रचंड वेगाने थेट बागेत घुसते आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बेकायदा रेती उत्खननामुळे किनाऱ्याची धूप होऊ लागली आहे. त्यातच पावसाळ्यात येणाऱ्या मोठ्या उधाणाच्या लाटांनी किनारा वाहून जाऊ लागला आहे. त्यामुळे आता अर्नाळा समुद्रकिनारी उरली सुरली सुरुंची बागही नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.गेल्या तीन दिवसात समुद्रात मोठे उधाण आले आहे. त्यामुळे समुद्र खवळून जवळपास आठ फूट उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. या लाटांनी समुद्रकिनारा उध्वस्त करून थेट सुरुच्या बागेत प्रवेश केला होता. त्यामुळे अनेक मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. लाटांच्या तडाख्याने समुद्रकिनाराच वाहून गेल्याने सुरुच्या बागेतील अनेक झाडे उन्मळून पडण्याच्या मार्गावर आहेत. काही झाडे तर मोठा वारा आला तरी उन्मळून पडतील इतकी धोकादायक बनली आहेत. त्यामुळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेली अर्नाळा समुद्रकिनारची सुरुची बाग नष्ट होणार आहे.दरम्यान, यावेळच्या पावसाळ््यातील उधाणाच्या लाटांनी वसई तालुक्यातील अनेक गावांचा किनारा उध्वस्त केला आहे. त्याचबरोबर धूपप्रतिबंधक बंधारेअतिशय निष्कृष्ट बांधल्याने ते वाहून गेले आहेत.