शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

ढोळकी विहीर डागडुजीच्या प्रतीक्षेत, जलस्रोत बंद होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:23 IST

विहिरीतील दुर्गंधी आणि शेवाळेयुक्त पाणी पिण्यास योग्य न राहिल्याने ढाढरे, डोंगरवाडी,उंबरवाडीतील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे.

- रवींद्र सोनावळे शेणवा : निकृष्ट बांधकाम, तुटलेले कठडे, सभोवती झाडे - झुडुपे, साचलेला गाळ त्यातच झाडांचा पालापाचोळा पडून जलस्रोत बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या विहिरीतील दुर्गंधी आणि शेवाळेयुक्त पाणी पिण्यास योग्य न राहिल्याने ढाढरे, डोंगरवाडी,उंबरवाडीतील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. तर ढाढरे ओहोळालगत असणारी ढोळकी विहीर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अजूनही डागडूजीच्या प्रतीक्षेत आहे.शहापूर तालुक्यात सर्वत्र पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असताना पाण्याच्या स्रोतांचे जतन आणि संवर्धन करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसते. ढाढरे गावानजीकच्या ओहोळालगतच्या अवघ्या दहा फूट खोल असणाऱ्या तसेच पाण्याचे स्रोत असून मुबलक पाणी असणाºया विहिरीकडे केलल्या दुर्लक्षामुळे येथील पाणीच पिण्यायोग्य राहिलेले नाही. विहिरीचे कठडे तुटले आहेत.परिणामी विहिरीचे पाणी गाळ साचून दूषित होत आहे. भर मे महिन्यातही पाणीसाठा असलेल्या या विहिरीकडे प्रशासनाने लक्ष दिले असते तर शेजारील गावकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकले असते. शिवाय कठडे तुटलेल्या या विहिरीत एखादा मनुष्य किंवा प्राणी पडून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीने या विहिरीची दुरु स्ती करणे गरजेचे आहे. केवळ दुरु स्ती-देखभालीअभावी पाणी असूनही पिऊ शकत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत.पंचायत समितीने तात्काळ या विहिरीचा पंचनामा करु न पुढील कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.शहापूर तालुक्यात अनेक ठिकाणी गाळ साचून व मानवी चुकांमुळे नैसिर्गक जलस्रोत दूषित झाले आहेत किंवा लुप्त पावले आहेत. अशा ठिकाणी पाणीटंचाईच्या काळात तात्पुरता उपाय म्हणून टँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.>पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतींच्या मदतीने दुषित व बंद पडलेले पाणीस्त्रोत शोधून त्यांचे पुनरु ज्जीवन करण्याची गरज आहे.- महेंद्र भेरे,सामाजिक कार्यकर्तेढोळकी विहिरीची डागडुजी केल्यास पाणी टंचाईचे प्रमाण कमी होईल. तसेच जलस्रोताचे संवर्धन केल्यास मुबलक पाणी उपलब्ध होईल.- कमळू मेंगाळ, अरविंद देशमुख, ग्रामस्थ डोंगरवाडी, ढाढरे>विहिरींमध्ये पाणी कमी असल्याने शेवाळे अधिक प्रमाणात जमा होते. त्यामुळे झºयांचे प्रमाणही कमी होते. मात्र, त्यासाठी ग्रामपंचायतीने विहिरींची स्वच्छता करणे आवश्यक आहे. - एम.बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग