शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

ढोळकी विहीर डागडुजीच्या प्रतीक्षेत, जलस्रोत बंद होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:23 IST

विहिरीतील दुर्गंधी आणि शेवाळेयुक्त पाणी पिण्यास योग्य न राहिल्याने ढाढरे, डोंगरवाडी,उंबरवाडीतील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे.

- रवींद्र सोनावळे शेणवा : निकृष्ट बांधकाम, तुटलेले कठडे, सभोवती झाडे - झुडुपे, साचलेला गाळ त्यातच झाडांचा पालापाचोळा पडून जलस्रोत बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या विहिरीतील दुर्गंधी आणि शेवाळेयुक्त पाणी पिण्यास योग्य न राहिल्याने ढाढरे, डोंगरवाडी,उंबरवाडीतील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. तर ढाढरे ओहोळालगत असणारी ढोळकी विहीर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अजूनही डागडूजीच्या प्रतीक्षेत आहे.शहापूर तालुक्यात सर्वत्र पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असताना पाण्याच्या स्रोतांचे जतन आणि संवर्धन करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसते. ढाढरे गावानजीकच्या ओहोळालगतच्या अवघ्या दहा फूट खोल असणाऱ्या तसेच पाण्याचे स्रोत असून मुबलक पाणी असणाºया विहिरीकडे केलल्या दुर्लक्षामुळे येथील पाणीच पिण्यायोग्य राहिलेले नाही. विहिरीचे कठडे तुटले आहेत.परिणामी विहिरीचे पाणी गाळ साचून दूषित होत आहे. भर मे महिन्यातही पाणीसाठा असलेल्या या विहिरीकडे प्रशासनाने लक्ष दिले असते तर शेजारील गावकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकले असते. शिवाय कठडे तुटलेल्या या विहिरीत एखादा मनुष्य किंवा प्राणी पडून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीने या विहिरीची दुरु स्ती करणे गरजेचे आहे. केवळ दुरु स्ती-देखभालीअभावी पाणी असूनही पिऊ शकत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत.पंचायत समितीने तात्काळ या विहिरीचा पंचनामा करु न पुढील कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.शहापूर तालुक्यात अनेक ठिकाणी गाळ साचून व मानवी चुकांमुळे नैसिर्गक जलस्रोत दूषित झाले आहेत किंवा लुप्त पावले आहेत. अशा ठिकाणी पाणीटंचाईच्या काळात तात्पुरता उपाय म्हणून टँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.>पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतींच्या मदतीने दुषित व बंद पडलेले पाणीस्त्रोत शोधून त्यांचे पुनरु ज्जीवन करण्याची गरज आहे.- महेंद्र भेरे,सामाजिक कार्यकर्तेढोळकी विहिरीची डागडुजी केल्यास पाणी टंचाईचे प्रमाण कमी होईल. तसेच जलस्रोताचे संवर्धन केल्यास मुबलक पाणी उपलब्ध होईल.- कमळू मेंगाळ, अरविंद देशमुख, ग्रामस्थ डोंगरवाडी, ढाढरे>विहिरींमध्ये पाणी कमी असल्याने शेवाळे अधिक प्रमाणात जमा होते. त्यामुळे झºयांचे प्रमाणही कमी होते. मात्र, त्यासाठी ग्रामपंचायतीने विहिरींची स्वच्छता करणे आवश्यक आहे. - एम.बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग