शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

इमर्जन्सी भारनियमनामुळे डायमेकिंग व्यवसाय मरणपंथाला

By admin | Updated: October 10, 2015 23:23 IST

एका बाजूला हजारो मेगावॅट वीजनिर्मिती करणारे तारापूर अणुशक्ती केंद्र तर दुसऱ्या बाजूला उभे असलेले थर्मल पॉवर स्टेशन असे दोन महत्त्वाकांक्षी वीज प्रकल्प असतानादेखील

डहाणू : एका बाजूला हजारो मेगावॅट वीजनिर्मिती करणारे तारापूर अणुशक्ती केंद्र तर दुसऱ्या बाजूला उभे असलेले थर्मल पॉवर स्टेशन असे दोन महत्त्वाकांक्षी वीज प्रकल्प असतानादेखील डहाणूच्या पंचक्रोशीतील गावांत नेहमीच अंधाराचे साम्राज्य असल्याने घरोघरी चालणारा डायमेकिंगसारखा व्यवसाय मरणपंथाला लागला असून भूमिपुत्रांना अन्य क्षेत्रांत रोजगार शोधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये वीज महावितरणबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली असून येथील हजारो नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.डहाणूच्या सागरीकिनाऱ्यावरील चिंचणी, वरोर, वानगाव, साखरे या फिडरअंतर्गत दिवसातून अनेक वेळा तर बोईसर येथून येणाऱ्या १३२, १३३ केव्हीमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने येथील तीस ते चाळीस गावांत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. परिणामी, विजेवर अवलंबून असलेल्या डायमेकर्स, लघुउद्योजक, शेतकरी, बागायतदार तसेच लहानमोठे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. सकाळ झाल्यापासून विजेचा लपंडाव त्यातच दररोज तीनचार तासांच्या भारनियमनामुळे नागरिक वैतागले आहेत. याबाबत, सातत्याने ग्रामपंचायत, जि.प. सदस्य तक्रारी करीत असतानादेखील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बोईसर, पालघर, वसई येथील अधिकारी कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील तीस ते चाळीस गावांत तसेच खेड्यापाड्यांत वीज महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शेकडो लोखंडी खांब जीर्ण व जुनाट झालेले आहे. ठिकठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत असून अनेक ठिकाणी कमकुवत झालेले ट्रान्सफॉर्मर बदलण्याची गरज असताना गेल्या अनेक वर्षांत ते बदललेले नाहीत. दिवसरात्र फ्युज, डीओ, झम्पर इ. उडण्याचे प्रकार घडत असतात. वीजपुरवठा खंडित झाल्यावर स्थानिक नागरिक महावितरणच्या कार्यालयात तक्रार करतात, परंतु वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणीही येत नसल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून फ्युज, डीओ टाकून वीजपुरवठा सुरळीत करावा लागतो. (वार्ताहर)