शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मुरबाडमध्ये पाणीटंचाईमु‌ळे लग्न जुळणे कठीण; पाण्यासाठी महिलांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 23:09 IST

पाण्यासाठी महिलांची वणवण : रोजगारही बुडत असल्याची केली तक्रार, टँकरने पुरवठा सुरू

प्रकाश जाधवमुरबाड : खेडेगावात दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या गरिबाची सून होईन, पण घोटभर पाण्यासाठी भटकंती करायला लावणारा श्रीमंत नवरा नको अशी व्यथा पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला व्यक्त करत आहेत. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील पाणीटंचाई असणाऱ्या गावातील तरुण, तरुणींनी जरी उच्च शिक्षण घेतले असले तरी लग्न जुळण्यास अडचणी येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला तालुक्यातील सासणे, पाटगाव, वाघाची वाडी, बाटलीतील वाडी, तोंडली, साकुर्ली, साजई, तुळई, फांगणे, फांगुळ ग्रहात, आंबेमाळ, चिंचवाडी, वाल्हिवरे, थितबी या गावांतील पाणवठ्यांनी तळ गाठला असून गावात इतर सर्व सुविधा असलेल्या तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने १६ तास हे पाण्याच्या शोधात घालवावे लागतात. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार शोधावा की कोरड्या घशाला ओलावा देण्यासाठी पाणी शोधावे या विंवचनेत महिला सापडल्या आहेत.

दिसेल त्या पाणवठ्यावर महिलांचा घोळका दिसतो. सरकारने ग्रामीण आणि डोंगराळ भागात ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे त्या ठिकाणी कोट्यवधींच्या योजना राबविल्या, मात्र त्या योजना स्थानिक पुढाऱ्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचू न दिल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

डिसेंबर ते मे दरम्यान या भागात भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी स्थानिक पातळीवर २४ गावे व ३८ पाडे अशा ६२ गावांचा टंचाई आराखडा तयार करून ५४ गावात आणि पाड्यात विंधन विहिरीचे काम प्रगतीपथावर आहे. टंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी मुरबाड तालुक्यात पाच टँकर पाणीपुरवठा विभागाने तैनात केले असले तरी ते टँकर टंचाईग्रस्त भागात पोहोचत नसल्यामुळे महिलांची भटकंती सुरूच आहे. सर्वत्र कोरोनाचे सावट असताना व भरउन्हात महिला वर्ग आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन पाण्यासाठी भटकंती करत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार