शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरळ भरतीविरोधात कामबंद, ऐन दिवाळीत रेशनवर खडखडाट, सेवाज्येष्ठतेनुसार हवी संधी : पुरवठा विभागाचे कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:44 IST

मागील तीन ते चार वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले.

पालघर: मागील तीन ते चार वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले. यावेळी पुरवठा निरीक्षक सरळसेवेने भरली जात असल्याच्या निषेधार्थ पुरवठा विभागातील कर्मचारी ह्या आंदोलनात सहभागी झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर गरिबांच्या घरातील चूल मात्र थंड पडणार आहे.भारतीय अन्न महामंडळाची बोरिवली आणि भिवंडी येथे दोन गुदामे असून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील आठ तालुक्यात धान्य वितरित केले जाते. जिल्ह्यात मंजूर रास्तभाव धान्य दुकाने पालघर मध्ये (२१८), तर कार्यरत रास्तभाव धान्य दुकानांची संख्या (१४४) इतकी आहे. डहाणूमध्ये अनुक्र मे २०७ आणि १५९, वसई मध्ये १७९ आणि १४८, तलासरी मध्ये ६९ आणि ६२, वाडा मध्ये १५७ आणि १३६, जव्हार मध्ये ९९ आणि ८०, मोखाडामध्ये ६५ आणि ५६, विक्र मगड मध्ये ९२ आणि ८१ अशी एकूण १०८६ व ८६६ रास्तभाव दुकाने आहेत. जिल्ह्यात अंत्योदय योजने अंतर्गत ९७ हजार ८५ कुटुंबे शिधापत्रिका धारक (रेशन कार्ड धारक) असून त्यांना तांदूळ २३ हजार ९०९ क्विंटल तर गहू ९ हजार ५९० क्विंटल धान्याचे वाटप होते.तर १४ लाख २३ हजार ५३६ प्राधान्य कुटुंबिय शिधापत्रिकाधारक असून त्यांना तांदूळ ४२ हजार ७०६ क्विंटल, गहू २८ हजार ४७० क्विंटल धान्याचे वाटप केले जाते.सरळ सेवेच्या उमेदवारांची भरती झाल्या नंतर महसूल विभागाची पदे प्रस्थापित करण्यात यावेत असेही निर्देशीत करण्यात आले होते. त्या अनुषंगाने राज्यातील महसूल कर्मचाºयांनी सन २००८ मध्ये ४ ते ५ दिवस कामबंद आंदोलन केले होते. त्यावर पुरवठा विभागाच्या निर्देशकाना तत्कालीन महसूलमंत्र्यांनी निर्देश देवून पुरवठा विभागाच्या आस्थापनेवरील स्वतंत्र पदे भरती करू नये असे निर्देश दिले होते. स्वतंत्र पुरवठा विभागाची आस्थापना करून भरती केल्यास कर्मचारी मोठ्या प्रमाणात प्रत्यार्पित होऊन बरेच पदावनत व अतिरिक्त ठरून नोकरीपासून वंचित राहतील. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :Strikeसंप