शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

सरळ भरतीविरोधात कामबंद, ऐन दिवाळीत रेशनवर खडखडाट, सेवाज्येष्ठतेनुसार हवी संधी : पुरवठा विभागाचे कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:44 IST

मागील तीन ते चार वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले.

पालघर: मागील तीन ते चार वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले. यावेळी पुरवठा निरीक्षक सरळसेवेने भरली जात असल्याच्या निषेधार्थ पुरवठा विभागातील कर्मचारी ह्या आंदोलनात सहभागी झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर गरिबांच्या घरातील चूल मात्र थंड पडणार आहे.भारतीय अन्न महामंडळाची बोरिवली आणि भिवंडी येथे दोन गुदामे असून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील आठ तालुक्यात धान्य वितरित केले जाते. जिल्ह्यात मंजूर रास्तभाव धान्य दुकाने पालघर मध्ये (२१८), तर कार्यरत रास्तभाव धान्य दुकानांची संख्या (१४४) इतकी आहे. डहाणूमध्ये अनुक्र मे २०७ आणि १५९, वसई मध्ये १७९ आणि १४८, तलासरी मध्ये ६९ आणि ६२, वाडा मध्ये १५७ आणि १३६, जव्हार मध्ये ९९ आणि ८०, मोखाडामध्ये ६५ आणि ५६, विक्र मगड मध्ये ९२ आणि ८१ अशी एकूण १०८६ व ८६६ रास्तभाव दुकाने आहेत. जिल्ह्यात अंत्योदय योजने अंतर्गत ९७ हजार ८५ कुटुंबे शिधापत्रिका धारक (रेशन कार्ड धारक) असून त्यांना तांदूळ २३ हजार ९०९ क्विंटल तर गहू ९ हजार ५९० क्विंटल धान्याचे वाटप होते.तर १४ लाख २३ हजार ५३६ प्राधान्य कुटुंबिय शिधापत्रिकाधारक असून त्यांना तांदूळ ४२ हजार ७०६ क्विंटल, गहू २८ हजार ४७० क्विंटल धान्याचे वाटप केले जाते.सरळ सेवेच्या उमेदवारांची भरती झाल्या नंतर महसूल विभागाची पदे प्रस्थापित करण्यात यावेत असेही निर्देशीत करण्यात आले होते. त्या अनुषंगाने राज्यातील महसूल कर्मचाºयांनी सन २००८ मध्ये ४ ते ५ दिवस कामबंद आंदोलन केले होते. त्यावर पुरवठा विभागाच्या निर्देशकाना तत्कालीन महसूलमंत्र्यांनी निर्देश देवून पुरवठा विभागाच्या आस्थापनेवरील स्वतंत्र पदे भरती करू नये असे निर्देश दिले होते. स्वतंत्र पुरवठा विभागाची आस्थापना करून भरती केल्यास कर्मचारी मोठ्या प्रमाणात प्रत्यार्पित होऊन बरेच पदावनत व अतिरिक्त ठरून नोकरीपासून वंचित राहतील. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :Strikeसंप