शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

सरळ भरतीविरोधात कामबंद, ऐन दिवाळीत रेशनवर खडखडाट, सेवाज्येष्ठतेनुसार हवी संधी : पुरवठा विभागाचे कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:44 IST

मागील तीन ते चार वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले.

पालघर: मागील तीन ते चार वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले. यावेळी पुरवठा निरीक्षक सरळसेवेने भरली जात असल्याच्या निषेधार्थ पुरवठा विभागातील कर्मचारी ह्या आंदोलनात सहभागी झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर गरिबांच्या घरातील चूल मात्र थंड पडणार आहे.भारतीय अन्न महामंडळाची बोरिवली आणि भिवंडी येथे दोन गुदामे असून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील आठ तालुक्यात धान्य वितरित केले जाते. जिल्ह्यात मंजूर रास्तभाव धान्य दुकाने पालघर मध्ये (२१८), तर कार्यरत रास्तभाव धान्य दुकानांची संख्या (१४४) इतकी आहे. डहाणूमध्ये अनुक्र मे २०७ आणि १५९, वसई मध्ये १७९ आणि १४८, तलासरी मध्ये ६९ आणि ६२, वाडा मध्ये १५७ आणि १३६, जव्हार मध्ये ९९ आणि ८०, मोखाडामध्ये ६५ आणि ५६, विक्र मगड मध्ये ९२ आणि ८१ अशी एकूण १०८६ व ८६६ रास्तभाव दुकाने आहेत. जिल्ह्यात अंत्योदय योजने अंतर्गत ९७ हजार ८५ कुटुंबे शिधापत्रिका धारक (रेशन कार्ड धारक) असून त्यांना तांदूळ २३ हजार ९०९ क्विंटल तर गहू ९ हजार ५९० क्विंटल धान्याचे वाटप होते.तर १४ लाख २३ हजार ५३६ प्राधान्य कुटुंबिय शिधापत्रिकाधारक असून त्यांना तांदूळ ४२ हजार ७०६ क्विंटल, गहू २८ हजार ४७० क्विंटल धान्याचे वाटप केले जाते.सरळ सेवेच्या उमेदवारांची भरती झाल्या नंतर महसूल विभागाची पदे प्रस्थापित करण्यात यावेत असेही निर्देशीत करण्यात आले होते. त्या अनुषंगाने राज्यातील महसूल कर्मचाºयांनी सन २००८ मध्ये ४ ते ५ दिवस कामबंद आंदोलन केले होते. त्यावर पुरवठा विभागाच्या निर्देशकाना तत्कालीन महसूलमंत्र्यांनी निर्देश देवून पुरवठा विभागाच्या आस्थापनेवरील स्वतंत्र पदे भरती करू नये असे निर्देश दिले होते. स्वतंत्र पुरवठा विभागाची आस्थापना करून भरती केल्यास कर्मचारी मोठ्या प्रमाणात प्रत्यार्पित होऊन बरेच पदावनत व अतिरिक्त ठरून नोकरीपासून वंचित राहतील. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :Strikeसंप