शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

मोखाड्यात भीषण पाणीटंचाई, ९ गावे १९ पाडे यांना १० टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 03:05 IST

पालघर जिल्ह्यात पाणी टंचाईने सवेधनशील असलेल्या मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे तालुक्यातील ४५ गावपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

रविंद्र साळवेमोखाडा : पालघर जिल्ह्यात पाणी टंचाईने सवेधनशील असलेल्या मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे तालुक्यातील ४५ गावपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ९ गावे १९ पाडे यांना १० टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे यामधील पेंडिंग ७ गावे १० पाड्यांच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून यामधील पोशेरा, नावळे पाडा, बेरिस्ते, चिकाडीचापाडा, धामणी पाडा, पिंपळगाव, मडक्याचीमेट, डोंगरवाडी उधळे या गाव पाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून आहेत.मागणी केल्यानंतर चोवीस तासात टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देणे या सरकारी धोरणाला प्रशासनाकडून बगल दिली जात आहे. यामुळे येथे दहा ते पंधरा दिवस उलटूनही टॅँकरद्वारे पाणी पुरवठ्याची वाट आदिवासींना पहावी लागत आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण करावी लागत आहे.प्रत्येक वर्षी मोखाडा तालुक्यात जानेवारी सरताच पाणी टंचाईला सुरूवात होते. तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या शंभराच्या घरात पोहचते आहे. पाणी पुरवठा विभागाने ८८ गाव पाड्यांचा आराखडा शासनाला सादर केला आहे. शासनाच्या धोरणानूसार टंचाई ग्रस्त गाव-पाडयांनी टँकर द्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केल्यास, तेथील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी त्यांची तातडीने पाहणी करून, टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, तशी तातडीची कार्यवाही प्रशासनाकडून केली जात नाही.शासनाच्या ३ फेब्रुवारी १९९९ च्या निर्णयानुसार दरडोई २० लीटर पाणी ग्रामीण भागाला निश्चित करण्यात आले आहे. परंतु याची अंमलबजावणी होत नसल्याने दरवर्षीच पाण्यासाठी वणवण करावी लागते.>अधिग्रहणाचे अधिकार तहसिलदारांना द्यामोखाड्यातून टंचाई ग्रस्त गाव-पाडयाकडून मागणी झाल्यास, तातडीने टॅँकर मंजुरीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातात.ही प्रक्रीया विलंबाची असल्याने टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्याची मागणी जिल्हा परिषद गट नेते प्रकाश निकम यांनी केली आहे.