शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

मोखाड्यात भीषण पाणीटंचाई, ९ गावे १९ पाडे यांना १० टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 03:05 IST

पालघर जिल्ह्यात पाणी टंचाईने सवेधनशील असलेल्या मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे तालुक्यातील ४५ गावपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

रविंद्र साळवेमोखाडा : पालघर जिल्ह्यात पाणी टंचाईने सवेधनशील असलेल्या मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे तालुक्यातील ४५ गावपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ९ गावे १९ पाडे यांना १० टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे यामधील पेंडिंग ७ गावे १० पाड्यांच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून यामधील पोशेरा, नावळे पाडा, बेरिस्ते, चिकाडीचापाडा, धामणी पाडा, पिंपळगाव, मडक्याचीमेट, डोंगरवाडी उधळे या गाव पाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून आहेत.मागणी केल्यानंतर चोवीस तासात टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देणे या सरकारी धोरणाला प्रशासनाकडून बगल दिली जात आहे. यामुळे येथे दहा ते पंधरा दिवस उलटूनही टॅँकरद्वारे पाणी पुरवठ्याची वाट आदिवासींना पहावी लागत आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण करावी लागत आहे.प्रत्येक वर्षी मोखाडा तालुक्यात जानेवारी सरताच पाणी टंचाईला सुरूवात होते. तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या शंभराच्या घरात पोहचते आहे. पाणी पुरवठा विभागाने ८८ गाव पाड्यांचा आराखडा शासनाला सादर केला आहे. शासनाच्या धोरणानूसार टंचाई ग्रस्त गाव-पाडयांनी टँकर द्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केल्यास, तेथील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी त्यांची तातडीने पाहणी करून, टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, तशी तातडीची कार्यवाही प्रशासनाकडून केली जात नाही.शासनाच्या ३ फेब्रुवारी १९९९ च्या निर्णयानुसार दरडोई २० लीटर पाणी ग्रामीण भागाला निश्चित करण्यात आले आहे. परंतु याची अंमलबजावणी होत नसल्याने दरवर्षीच पाण्यासाठी वणवण करावी लागते.>अधिग्रहणाचे अधिकार तहसिलदारांना द्यामोखाड्यातून टंचाई ग्रस्त गाव-पाडयाकडून मागणी झाल्यास, तातडीने टॅँकर मंजुरीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातात.ही प्रक्रीया विलंबाची असल्याने टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्याची मागणी जिल्हा परिषद गट नेते प्रकाश निकम यांनी केली आहे.