शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

वसई विरारमधील पाऊस व पुरामुळे नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 03:23 IST

वसई-विरारमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून फ्रीज, टिव्ही, दुचाकी वाहने, कार, फर्निचर आदी वस्तू तसेच जीवनावश्यक बाबी यांचे मोठे नुकसान झाले.

विरार : वसई-विरारमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून फ्रीज, टिव्ही, दुचाकी वाहने, कार, फर्निचर आदी वस्तू तसेच जीवनावश्यक बाबी यांचे मोठे नुकसान झाले. पाऊस गेल्यानंतर देखील अनेक परिसरातील सोसायटी मध्ये पाणी होते. तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांचे तर हाल झाले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बिछाने, अन्न-धान्याची नासाडी झाली. जवळपास वसई विरार मधील ३०० बिल्डींगमध्ये पाणी जाऊन त्यातील रहिवाशांचे ५० हजार ते दोन लाखापर्यंतचे नुकसान झाले. त्यामुळे पालिकेने त्यांना भरपाई देण्याचे ठरवले आहे.घरात ४ दिवस पाणी असल्याने फ्रीज खराब झाला, तर मुलीच्या लग्नासाठी घेतलेला सोफा देखील पाण्यात भिजून खराब झाला. घरातले किंमती सामान आता निकामी झाल्याने ते भंगारमध्ये विकण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर घरातील लग्न देखील आता पुढे ढकलावे लागणार आहे असे किशोर पंडित यांनी सांगितले. बॉक्समध्ये पाणी गेल्याने मीटर पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यामुळे नवीन मीटर लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, तोपर्यत अनेक नागरिकांना अंधारातच खितपत पडावे लागणार आहे असे जयेश जोशी यांनी सांगितले.>नुकसान लाखोंचे, भरपाई मात्र काही हजारांची मिळणारवसई तालुक्यात काही कोटींच्या वर नुकसान झाले असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तहसीलदार नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे करत आहे. नागरिकांना पाच हजार, दहा हजार भरपाई दिली जाणार आहे. मात्र लाखोंचे नुकसान झाले असतांना त्याची भरपाई पाच आणि दहा हजारात कशी होणार? हा विचार कोणी केला नाही. मध्यमवर्गीयांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्याचप्रमाणे, पंचनाम्यासाठी लोकांनी घराबाहेर ठेवलेल्या सामानाला आता दुर्गंधी येणे सुरु झाले आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे, यावर उपाय करावेत असे, गोसावी म्हणाले.