शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

वसई विरारमधील पाऊस व पुरामुळे नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 03:23 IST

वसई-विरारमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून फ्रीज, टिव्ही, दुचाकी वाहने, कार, फर्निचर आदी वस्तू तसेच जीवनावश्यक बाबी यांचे मोठे नुकसान झाले.

विरार : वसई-विरारमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून फ्रीज, टिव्ही, दुचाकी वाहने, कार, फर्निचर आदी वस्तू तसेच जीवनावश्यक बाबी यांचे मोठे नुकसान झाले. पाऊस गेल्यानंतर देखील अनेक परिसरातील सोसायटी मध्ये पाणी होते. तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांचे तर हाल झाले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बिछाने, अन्न-धान्याची नासाडी झाली. जवळपास वसई विरार मधील ३०० बिल्डींगमध्ये पाणी जाऊन त्यातील रहिवाशांचे ५० हजार ते दोन लाखापर्यंतचे नुकसान झाले. त्यामुळे पालिकेने त्यांना भरपाई देण्याचे ठरवले आहे.घरात ४ दिवस पाणी असल्याने फ्रीज खराब झाला, तर मुलीच्या लग्नासाठी घेतलेला सोफा देखील पाण्यात भिजून खराब झाला. घरातले किंमती सामान आता निकामी झाल्याने ते भंगारमध्ये विकण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर घरातील लग्न देखील आता पुढे ढकलावे लागणार आहे असे किशोर पंडित यांनी सांगितले. बॉक्समध्ये पाणी गेल्याने मीटर पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यामुळे नवीन मीटर लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, तोपर्यत अनेक नागरिकांना अंधारातच खितपत पडावे लागणार आहे असे जयेश जोशी यांनी सांगितले.>नुकसान लाखोंचे, भरपाई मात्र काही हजारांची मिळणारवसई तालुक्यात काही कोटींच्या वर नुकसान झाले असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तहसीलदार नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे करत आहे. नागरिकांना पाच हजार, दहा हजार भरपाई दिली जाणार आहे. मात्र लाखोंचे नुकसान झाले असतांना त्याची भरपाई पाच आणि दहा हजारात कशी होणार? हा विचार कोणी केला नाही. मध्यमवर्गीयांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्याचप्रमाणे, पंचनाम्यासाठी लोकांनी घराबाहेर ठेवलेल्या सामानाला आता दुर्गंधी येणे सुरु झाले आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे, यावर उपाय करावेत असे, गोसावी म्हणाले.