शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पुरेसा बंदोबस्त न मिळाल्याने अतिक्रमणविरोधी मोहीम ढूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 23:56 IST

पाचूबंदरच्या चौपाटीवर आणि तिवरांच्या ठिकाणी झालेल्या अतिक्र मणांविरु द्धची महापालिका आणि महसूल यांची बुधवारी होणारी संयुक्त मोहीम अखेर पोलीस बंदोबस्ताअभावी बारगळली.

वसई : पाचूबंदरच्या चौपाटीवर आणि तिवरांच्या ठिकाणी झालेल्या अतिक्र मणांविरु द्धची महापालिका आणि महसूल यांची बुधवारी होणारी संयुक्त मोहीम अखेर पोलीस बंदोबस्ताअभावी बारगळली. पुरेसा बंदोबस्त न मिळाल्यामुळे ही मोहीम राबवता आली नाही. मात्र, ९ मार्चनंतर पोलीस बंदोबस्त उपलब्ध होईल, त्यावेळी ही मोहीम सुरू करून तक्र ारदारांनी निदर्शनास आणलेल्या सर्व अतिक्र मणांवर कारवाई केली जाईल, असे तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले.वसईच्या पाचूबंदर येथील चौपाटीवर आणि लगतच्या मच्छिमारांच्या सार्वजनिक वापराच्या जागेवर काही खासगी इसमांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी मच्छिमारांच्या वापराचे क्षेत्र आक्र सले असून याविरु द्ध वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था गेल्या तीन वर्षांपासूनतक्रारी करत आहे. अतिक्र मणांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे अतिक्र मण करणाऱ्यांचे मनोबल वाढले असून तीन वर्षांपूर्वी केवळ चार अतिक्र मणे असलेल्या ठिकाणी आता चाळीसहून अधिक अतिक्र मणे दिसू लागली आहेत.या शिवाय काहींनी तिवरांवर भराव करून कांदळवनाची नासधूस केली आहे. या प्रकरणी कारवाईच्या बाबतीत महापालिका आणि महसूल या दोन्ही यंत्रणा बराच काळ एकमेकांकडे बोट दाखवत हात झटकण्याचा प्रयत्न करत होत्या. आता दोन्ही यंत्रणांनी संयुक्तपणे मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून ६ मार्च हा दिवस या ठिकाणच्या अतिक्र मणांवर पोलिसांच्या संरक्षणात कारवाई करण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. मात्र, महसूल किंवा पालिका यापैकी कोणीही पाचूबंदरात कारवाईसाठी फिरकले नाही.यासंदर्भात तहसीलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पोलीस बंदोबस्त न मिळाल्यामुळे कारवाई होऊ शकली नाही. आपण स्वत: पोलिसांच्या संपर्कात आहोत. ९ मार्चनंतर पोलीस बंदोबस्त उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर आपण पाचूबंदरातील अतिक्र मणांवर कारवाई करू.’दुसरीकडे, महापालिकेने पाचूबंदरातील अतिक्र मण विरोधी मोहिमेची पूर्ण तयारी केलेली आहे. महापालिकेची माणसे दुपारपर्यंत महसूलमधील कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्यात होती.दहावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे पुरेसे पोलीस बळ उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे मोहीम पुढे ढकलली आहे. पाचूबंदरच्या अतिक्र मणांवर कारावाई होणारच, अशी माहिती प्रभाग समिती ‘आय’चे सहाय्यक आयुक्त वनमाळी यांनी दिली.>तेव्हा जाधव परतले आणि अतिक्रमणे वाढलीपाचूबंदरात तिवर वृक्षांची नासधूस करणाऱ्यांंवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्याच्या कार्यवाहीस आरंभ करण्याचे निर्देश प्रांत अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी दिले आहेत. या कामी प्रांताधिकाºयांनी वसईचे मंडळ अधिकारी जाधव यांना नियुक्त केले आहे. मात्र, जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्र ारदार वसई मच्छीमार संस्थेच्या पदाधिकाºयांंना संशय आहे.कारण गेल्यावर्षी पाचूबंदरात केवळ चार अतिक्र मणे असतानाच पोलिसांसह फौजफाटा घेऊन कारवाईसाठी आलेले जाधव अतिक्र मण करणाºयांंबरोबर ‘अर्थ’पूर्ण बोलणी झाल्यावर कारवाई न करताच परतले होते. त्यानंतर येथे आज चार अतिक्र मणांच्या जागी चाळीसहून अधिक अतिक्र मणे झाली असून आता कारवाई झाली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे संस्थेचे चेअरमन संजय कोळी यांनी सांगितले.