शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

सततच्या कारवाईमुळे रेती व्यावसायिकांचा बेमुदत बंद

By admin | Updated: October 24, 2015 23:18 IST

गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या रेती व्यावसायिकांनी सतत होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला आहे. रेती वाहतुकीचे परवाने ज्यांच्याकडे नाहीत, अशांवर

वसई : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या रेती व्यावसायिकांनी सतत होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला आहे. रेती वाहतुकीचे परवाने ज्यांच्याकडे नाहीत, अशांवर महसूल विभागातर्फे दंड आकारण्यात येत असल्यामुळे या व्यावसायिकांनी बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे. बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट असतानाच रेतीचा पुरवठा बंद झाल्यामुळे वसई, विरार, ठाणे, पालघर परिसरातील बांधकाम व्यवसाय पूर्णपणे कोसळण्याची चिन्हे आहेत. पर्यावरणाच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयाने वसई, पालघर, भिवंडी भागात होणाऱ्या रेती उत्खनन व्यवसायावर निर्बंध टाकले आहेत. त्यामुळे गेली ४ वर्षे रेती व्यवसाय मंदीच्या सावटाखाली आहे. दरम्यान, महसूल विभागाने अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची पथके निर्माण केली आहेत. दिवसा महसूल व पोलीस अधिकारी यांचा ससेमिरा मागे लागतो म्हणून व्यावसायिक रात्रीच्या वेळी रेतीची वाहतूक करीत असतात. सदर बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने रेतीस्थळ परिसर व मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पथके तैनात केली. गेल्या ३ महिन्यांत महसूल विभागाने रेतीस्थळावर साचलेला रेतीचा साठा व अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांवर कारवाई करून कोट्यवधी रुपयांचा दंड आकारला आहे. त्यामुळे रेती व्यावसायिकांनी आता बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे. बंदच्या दबाव अस्त्रामुळे महसूल प्रशासनावर काय परिणाम होतो हे पहाणे औत्सूक्याचे ठरेल. (प्रतिनिधी)