शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक सांडपाण्यामुळे नालासोपारा खाडी प्रदूषित, मासेमारी, शेती, मीठ उत्पादनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 06:04 IST

वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच थेट सोडले जात असल्याने नालासोपारा खाडी प्रदुषित झाली आहे.

- शशी करपेवसई - वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच थेट सोडले जात असल्याने नालासोपारा खाडी प्रदुषित झाली आहे. त्यामुळे यापरिसरातील भूमीपूत्रांच्या पारंपारिक शेती, बागायती, मासेमारी व मीठ उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.वसईत वालीव, गोखीवरे, नवघर, सातीवली, चिंचपाडा या परिसरातील औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर रासायिनक कारखाने आहेत. या कारखान्यातील रासायिनक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नालासोपारा खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे खाडीतील पाणी काळे व फेसाळलेले असून विषारी बनले असून त्यावर तवंग जमा झाले आहे. नालासोपारा खाडीलगत असलेले गावकरी या पाण्यावर शेती, मासेमारी व मीठ उत्पादन करतात. पण, खाडीतील पाणी प्रदुषित झाल्याने भूमीपूत्रांच्या पारंपारिक मासेमारी व मीठ उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. खाडीतील मासे प्रदुषणामुळे मरू लागले आहेत. त्यांच्या प्रजनानावर परिणाम होऊन मासे कमी झाले आहेत. विषारी पाण्यामुळे खाडीलगतच्या भातशेती व बागायतीवर परिणाम झाला आहे. तसाच परिणाम मीठ उत्पादनावरही होऊ लागला आहे. त्यामुळे उपजिवीकेचे साधन नष्ट होत असल्याने भूमीपूत्र चिंतेत असल्याची तक्रार जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय वैती यांनी वसई विरार महापालिका आयुक्तांकडे केली आहे.प्रदूषणामुळे भूमिपुत्रांचा रोजगार संकटातमहापालिकेने स्वच्छता अभियानात भाग घेऊन शहर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यात नालासोपारा खाडी स्वच्छता मोहिम हाती घेतली नाही. रासायनिक अत्याचारामुळे आरोग्य व पर्यावरणालाही हानी होत आहे.नालासोपारा खाडीलगत असलेले गावकरी या पाण्यावर शेती, मासेमारी व मीठ उत्पादन करतात. पण, खाडीतील पाणी प्रदुषित झाल्याने भूमीपूत्रांच्या पारंपारिक मासेमारी व मीठ उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणVasai Virarवसई विरार