शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांचा सुकाळ तरी पाण्याचा दुष्काळ !

By admin | Updated: April 24, 2017 02:14 IST

या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने गेल्या पंधरा वर्षांत करोडो खर्चून शेकडो बंधारे बांधले तरी त्यात निकृष्ट बांधकामामुळे

वसंत भोईर / वाडाया तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने गेल्या पंधरा वर्षांत करोडो खर्चून शेकडो बंधारे बांधले तरी त्यात निकृष्ट बांधकामामुळे पाणी अजिबात साठत नसून भूजलाची पातळीही वाढलेली नाही. त्यामुळे हा पैसा अक्षरश: पाण्यात गेला आहे. त्यातूनच बंधाऱ्यांचा सुकाळ आणि पाण्याचा दुष्काळ अशी परस्परविरोधी स्थिती तालुक्यात आहे. निसर्गाने दिलेल्या पाचही बारमाही नद्यांत मुबलक पाणी साठा आहे. त्यावर गेल्या पंधरा वर्षांत शेकडो बंधारे बांधले आहेत. मात्र निकृष्ट बांधकाम, बंधाऱ्यासाठी योग्य जागा न निवडणे व टक्केवारीमुळे बंधारे कोरडे पडलेले आहेत.तालुक्याला पंचनद्यांचे वरदान लाभले आहे. तानसा, वैतरणा, पिंजाळ, गारगावी, देहर्जा या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. मात्र नियोजनाचा अभाव असल्याने मार्च महिन्यात या नद्या कोरड्या पडत आहेत. गेल्या वर्षी तालुक्यात आदिवासी योजनेतून पाच बंधारे तर सर्वसाधारण योजनेतून सतरा बंधारे बांधण्यात आले. मात्र ते हीे मार्च महिन्यातच कोरडे पडले आहेत. तानसा नदीवर तानसा फार्म येथे गेल्या वर्षी ५५ लाख खर्च करून बांधलेला बंधारा कोरडा पडला आहे. पंधरा वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने काही कोटी रु पये खर्च करून मेट, कोंढला, अलमान, पीक, गुहीर व सांगे येथे कोकण बंधारे बांधले त्यांचे काम निकृष्ट आहे. यावर्षी गांध्रे (९ लाख २३ हजार) कोंढले (९ लाख) खरीवली ( १३ लाख) आवंढे (७ लाख) सोनशिव (९ लाख १३ हजार) ऐनशेत (१० लाख १७ हजार) पिंपरोली (१० लाख ६८ हजार) व तुसे येथील बंधाऱ्याची दुरूस्ती अशी कामे प्रस्तावित असून ती सुरू आहेत.