शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

पेयजलाच्या विहिरीला लागले गढूळ पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 00:07 IST

शहापूर तालुक्याच्या चारही बाजूने पाणीटंचाई गंभीर बनते आहे.

- जनार्दन भेरेभातसानगर : शहापूर तालुक्याच्या चारही बाजूने पाणीटंचाई गंभीर बनते आहे. भातसा, तानसा, वैतरणा या मोठ्या जलाशयांच्या परिसरात पाणीटंचाईमुळे आता गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पिवळी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेले गाव म्हणजे खोर. या गावात जाताना दुचाकीचालकाला रस्ता शोधावा लागतो आहे. अतिशय खराब झालेल्या या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण. गावात असणाऱ्या विहिरींमध्ये पाणी नाही. एवढेच नव्हे तर गावात पाण्याची सोय व्हावी, म्हणून जो हौद खोदायला घेतला आहे, त्यात गढूळ पाणी लागले आहे. हेच पाणी गावकरी पिण्यासाठी वापरत आहेत. गावातील विहिरीला लागून असलेला तलावही कोरडा झाल्याने पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.६० ते ६५ घरे असणाºया या गावाची लोकसंख्या सव्वाशेच्या आसपास आहे. माहुलीच्या पायथ्याशी हे गाव आहे. पहिल्याच पावसात या गावाची पाणीटंचाई मिटते. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत गावातील नागरिकांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे वनीता बच्चू चौधरी यांनी सांगितले.सध्या गावात प्यायला पाणी नसल्याने जी विहीर बांधायला घेतली आहे, त्या विहिरीतील सिमेंटमिश्रित पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करत असल्याचेही वनीता चौधरी सांगतात.या गावात अनेक वर्षांपूर्वी रस्ता झाला होता. मात्र, त्यानंतर रस्त्याची अवस्था वाईट असून दुचाकी चालवताना कसरत करावी लागते.>गावात प्यायला पाणी नसल्याने नागरिक दूरवरून पाणी आणत आहेत. तर, बºयाचवेळा लोक नवीन बांधकाम सुरू असलेल्या विहिरीतील गढूळ पाणी पिण्यासाठी वापरतात.- ढवळू भिका, ग्रामस्थ खोर>आमच्याकडे टँकरने पाणी पुरवण्याचा प्रस्ताव आल्यास पुढील कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात येईल.- एम.बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग