शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत चिकू आपत्ती निवारण बैठक संपन्न, बागायतदार शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 05:40 IST

बोर्डी: चिकू उत्पादक संघाच्यावतीने चिकू आपत्ती निवारण बैठक शुक्र वारी कंक्राडी येथे पार पडली. या वेळी उपस्थित बागायतदारांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करण्याच्या निर्णयाला शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद या कार्यक्र मात संमती देण्यात आली.पालघर जिल्ह्यात साडेसातहजार हेक्टेर चिकू बागायतीचे क्षेत्र असून त्यापैकी साडेचारहजार डहाणू तालुक्याचे आहे. मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी, विविध ...

बोर्डी: चिकू उत्पादक संघाच्यावतीने चिकू आपत्ती निवारण बैठक शुक्र वारी कंक्राडी येथे पार पडली. या वेळी उपस्थित बागायतदारांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करण्याच्या निर्णयाला शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद या कार्यक्र मात संमती देण्यात आली.पालघर जिल्ह्यात साडेसातहजार हेक्टेर चिकू बागायतीचे क्षेत्र असून त्यापैकी साडेचारहजार डहाणू तालुक्याचे आहे. मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी, विविध रोगाचा प्रादुर्भाव आणि हमी भाव आदीच्या अभावामुळे बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हवामानावर आधारित फळपीक विमा चिकू फळाला लागू करण्यात आला आहे. मात्र त्यातील काही अटींमुळे लाभ मिळताना अडचण येत असूनही शासनाकडून मदतीचा हात दिला जात नाही.तथापी सर्वसामान्य बागायतदारांच्या हिताकरीता शुक्र वार, ८ सप्टेंबर रोजी चिकू आपत्ती निवारण बैठक कंक्र ाडी येथे घेण्यात आली.या वेळी जिल्हा कृषी अधिक्षक श्री. आर.जी.पाटील, कर्जत भात संशोधन केंद्राचे चव्हाण, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वनस्पती व कीडरोग शास्त्रज्ञ डॉ. दळवी तसेच पालघर कृषी विभागाचे वनस्पती कीडरोग शास्त्रज्ञ डॉ. मालसे, डॉ. गंगावणे व डॉ. धाने या तज्ञांप्रमाणेच जिल्ह्यातील बागायतदार उपस्थित होते.दुपारच्या सत्रातील सभेला सुरु वात होण्यापूर्वी तज्ज्ञमंडळींसह विनायक बारी, यज्ञेश सावे, देवेंद्र राऊत, अनिल पाटील या बागायतदारांनी तालुक्यातील सरावली, सावटा, जामशेत, कंक्र ाडी या भागातील चिकू बागायतींची पाहणी केली. या वेळी रोगग्रस्त चिकू बागेची स्थिती खूपच भयवाह असल्याचे दिसून आले. सापूर बच्चूभाई बारी यांच्या सरावली येथल्या बागेत एकेका झाडाखाली १०० किलो फळगळती झाल्याचे शेतीनिष्ठ पुरस्कार विजेता शेतकरी देवेंद्र राऊत यांनी सांगितले.या वर्षी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन चिकू बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. बागायती वाचवायची असल्यास शेतकºयांना नुकसानीची भरपाई मिळावी या करीता मुख्यमंत्र्यांसह कृषी आणि महसूल विभागाकडे निवेदन दिले आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार व आमदार यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.- विनायक बारी(अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ)