शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एकात्मिक शेतीपद्धतीतून सावरला अनेक कुटुंबांचा डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 00:00 IST

महिलांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

अनिरुद्ध पाटील

बोर्डी : आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढवता येते, हा आदर्श तारा मोहन चौधरी यांनी घालून दिला आहे. त्यामुळे परिसरातील अनेक महिला शेतकरी एकात्मिक शेती पद्धती करत आहेत. या कार्याबद्दल शासनाचा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांनी तारा चौधरी यांना आदर्श महिला शेतकरी म्हणून गौरविण्यात आले आहे. 

डहाणू तालुक्यातील किन्हवली या अतिदुर्गम भागातील आदिवासी महिला तारा चौधरी यांचे जेमतेम ७ वीपर्यंत शिक्षण झाले आहे. मोहन चौधरींशी विवाहबद्ध झाल्यानंतर घर,  संसार आणि शेतीकाम यातच दिवस जायचा.  डोंगर-उतारावर ६ एकर शेती, पारंपरिक पद्धतीने भातशेती, त्यातून मिळणारे अत्यल्प उत्पन्न, घर चालवण्यासाठी अपुरे होते.  त्यानंतर पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती करावी असे ठरवले. यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. यामध्ये भाताच्या कर्जत-३, कर्जत-७ या सुधारित जातींचा वापर केला. डोंगर उतारावर केशर जातीच्या आंब्याची, वेंगुर्ला-४, ६ या काजूची शास्त्रीय पद्धतीने लागवड केली. ५ गुंठा क्षेत्रात मोगरा लागवड केली.  भातशेतीनंतर वांगी, मिरची,  टोमॅटो आणि वेलवर्गीय भाजीपाला घेऊ लागले.   

उत्पादन खर्च वगळून भाजीपाला आणि मोगरा पिकातून महिन्याला १५,५००/-, शेळीपालन व्यवसायातून प्रतिमहा १३,०००/- रुपये, मत्स्य व्यवसायातून वर्षाकाठी रु. ८८,०००/-, फळझाडातून रुपये १,००,०००/- मिळू लागले. आलेल्या उत्पन्नातून स्थानिक तसेच सुधारित जातींच्या गाई, शेती अवजारे खरेदी केल्या. त्यातून थोडे पैसे मिळू लागले. शेणाच्या वापरासाठी घरी बायोगॅस घेतला. इंधन खर्चात बचत झाली. श्रम कमी होण्यास मदत झाली. दरम्यान, मुलांना चांगले शिक्षण देता आले. मुलगा सर्जन झाला. मुलगी पदवीधर झाली. पूर्वी शेतीतून घरी खाण्यापुरते भात पिकत होते.  मोलमजुरी आणि नवरा रिक्षा चालवत होता, त्यातून रुपये ३२,८००/- एवढे वार्षिक उत्पन्न होते,  आता कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनामुळे एकात्मिक शेतीतून वार्षिक उत्पन्न रुपये ५,३०,०००/- मिळू लागले आहे. 

पूरक व्यवसायांची जोडबदलत्या हवामानात फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेळीपालनसारखा पूरक व्यवसाय चालू केला. ६० स्थानिक जातीच्या शेळ्यांची जोपासना केली. त्यासाठी लसीकरण, त्यांचे खाद्य व्यवस्थापन, इत्यादीचे प्रशिक्षण घेतले.  चारा पिकासाठी फुले जयवंत,  को-४ या सुधारित जातीचे ठोंब लावून लागवड केल्याने मुबलक हिरवा चारा मिळू लागला. शेतामध्ये शेततळे बांधले. अशा प्रकारे आदर्श असे एकात्मिक शेतीचे मॉडेल उभारल्याने वर्षभर रोजगार मिळाला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार