शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
4
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
5
IND vs SA 2nd Test : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! पहिल्या डावात द.आफ्रिकेची मोठी धावसंख्या
6
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
7
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
8
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
9
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
10
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
11
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
12
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
13
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
14
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
16
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
17
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
18
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
19
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
20
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक शेतीपद्धतीतून सावरला अनेक कुटुंबांचा डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 00:00 IST

महिलांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

अनिरुद्ध पाटील

बोर्डी : आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढवता येते, हा आदर्श तारा मोहन चौधरी यांनी घालून दिला आहे. त्यामुळे परिसरातील अनेक महिला शेतकरी एकात्मिक शेती पद्धती करत आहेत. या कार्याबद्दल शासनाचा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांनी तारा चौधरी यांना आदर्श महिला शेतकरी म्हणून गौरविण्यात आले आहे. 

डहाणू तालुक्यातील किन्हवली या अतिदुर्गम भागातील आदिवासी महिला तारा चौधरी यांचे जेमतेम ७ वीपर्यंत शिक्षण झाले आहे. मोहन चौधरींशी विवाहबद्ध झाल्यानंतर घर,  संसार आणि शेतीकाम यातच दिवस जायचा.  डोंगर-उतारावर ६ एकर शेती, पारंपरिक पद्धतीने भातशेती, त्यातून मिळणारे अत्यल्प उत्पन्न, घर चालवण्यासाठी अपुरे होते.  त्यानंतर पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती करावी असे ठरवले. यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. यामध्ये भाताच्या कर्जत-३, कर्जत-७ या सुधारित जातींचा वापर केला. डोंगर उतारावर केशर जातीच्या आंब्याची, वेंगुर्ला-४, ६ या काजूची शास्त्रीय पद्धतीने लागवड केली. ५ गुंठा क्षेत्रात मोगरा लागवड केली.  भातशेतीनंतर वांगी, मिरची,  टोमॅटो आणि वेलवर्गीय भाजीपाला घेऊ लागले.   

उत्पादन खर्च वगळून भाजीपाला आणि मोगरा पिकातून महिन्याला १५,५००/-, शेळीपालन व्यवसायातून प्रतिमहा १३,०००/- रुपये, मत्स्य व्यवसायातून वर्षाकाठी रु. ८८,०००/-, फळझाडातून रुपये १,००,०००/- मिळू लागले. आलेल्या उत्पन्नातून स्थानिक तसेच सुधारित जातींच्या गाई, शेती अवजारे खरेदी केल्या. त्यातून थोडे पैसे मिळू लागले. शेणाच्या वापरासाठी घरी बायोगॅस घेतला. इंधन खर्चात बचत झाली. श्रम कमी होण्यास मदत झाली. दरम्यान, मुलांना चांगले शिक्षण देता आले. मुलगा सर्जन झाला. मुलगी पदवीधर झाली. पूर्वी शेतीतून घरी खाण्यापुरते भात पिकत होते.  मोलमजुरी आणि नवरा रिक्षा चालवत होता, त्यातून रुपये ३२,८००/- एवढे वार्षिक उत्पन्न होते,  आता कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनामुळे एकात्मिक शेतीतून वार्षिक उत्पन्न रुपये ५,३०,०००/- मिळू लागले आहे. 

पूरक व्यवसायांची जोडबदलत्या हवामानात फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेळीपालनसारखा पूरक व्यवसाय चालू केला. ६० स्थानिक जातीच्या शेळ्यांची जोपासना केली. त्यासाठी लसीकरण, त्यांचे खाद्य व्यवस्थापन, इत्यादीचे प्रशिक्षण घेतले.  चारा पिकासाठी फुले जयवंत,  को-४ या सुधारित जातीचे ठोंब लावून लागवड केल्याने मुबलक हिरवा चारा मिळू लागला. शेतामध्ये शेततळे बांधले. अशा प्रकारे आदर्श असे एकात्मिक शेतीचे मॉडेल उभारल्याने वर्षभर रोजगार मिळाला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार