शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख कोटींची बुलेट ट्रेन नको: त्यापेक्षा ३५ हजार कोटी खर्चून डहाणू ते विरार रेल्वे चौपदरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 06:50 IST

डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या रेल्वेसमस्या कायम

- पंकज राऊतबोईसर : डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या लाखो प्रवाशांची उपनगरीय (लोकल ) सेवा ही जीवनदायी असून या मार्गावरील अनेक समस्या लोकसभेच्या अनेक निवडणुका आल्या व गेल्या तरी अजूनही कायम असून त्या लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाकडून गांभीर्याने वेळच्या वेळी सोडविल्या न गेल्याने त्याचा प्रचंड मानसिक त्रास आज चाकरमनी, महिला व वयोवृद्ध, अपंग तसेच कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. म्हणूनच पालघर जिल्ह्याला बुलेट ट्रेनची नव्हे तर वैतरणा ते डहाणू, विरार दरम्यानच्या लोकलसेवेच्या समस्या सोडविण्याची गरज आहे.

आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आजी - माजी खासदार (जे निवडणूक रिंगणात आहेत) त्याच बरोबर इतर ही उमेदवार आम्ही व आमच्या पक्षाने, संघटनेने डहाणू - विरार दरम्याच्या रेल्वे प्रवाशांचे काही सोडविलेल्या प्रश्नांबरोबरच आम्ही हि कामे केली ती कामे केली असे सांगून स्वत:ची पाठ थोपवून घेऊन मागील प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही लवकरच सोडवू अशी (प्रत्येक निवडणुकीत देणारी) आश्वासन या वेळीही नेहमीप्रमाणे पुन्हा देतील.

मागील अनेक निवडणुकीत मतदारांनी सर्वच पक्षांना संधी देऊनही रेल्वेचे प्रश्न का सुटले नाहीत. पूर्वी हा मतदार संघ डहाणू व उत्तर मुंबई या दोन मतदार संघात विभागला होता लोकसभेच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला असता डहाणू मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा पाच वेळा तर एक वेळा शंकर नम निवडून आले होते, दोन वेळा भाजपा -सेना युतीचे चिंतामण वनगा, तर एक वेळा माकपचे लहानु कोम यांना मतदारांनी संधी दिली होती तर उत्तर मुंबईतून पाच वेळा भाजपाचे राम नाईक एक वेळा काँग्रेसचे (परंतु बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकुरांनी पाठिंबा दिलेले) उमेदवार अभिनेते गोविंदा निवडून आले होते. २००९ साली लोकसभेचा पालघर हा (अनुसूचित जमाती करीता राखीव) मतदार संघ नव्याने निर्माण करण्यात आला, पुनर्रचनेनंतर प्रथम बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव, २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे चिंतामण वनगा व पोटनिवडणुकीत भाजपचेच राजेंद्र गावित निवडून आले होते. म्हणजेच आताच्या निवडणुकीतील जवळ जवळ सर्वच पक्षांना येथील भोळ्याभाबड्या मतदारांनी कधी सलग तर कधी आलटून पालटून संधी दिली होती. तरीही त्यातला एकही जण रेल्वेच्या या समस्या सोडवू शकलेला नाही.

प्रवाशांच्या नशिबी अठरा वर्षे ‘वनवास’ कुणामुळे आला? तो संपणार तरी कधी? मग आज प्रत्येक जण विकासाच्या व रेल्वे प्रश्नांबाबत बोलतात मग अजूनही प्रश्न, समस्या व अडचणी का सुटल्या गेल्या नाहीत याचे उत्तर प्रचारा दरम्यान मत मागणारे उमेदवार ,त्यांचे पक्ष व कार्यकर्ते मतदारांना देतील का ?असा प्रश्न त्रस्त रेल्वे प्रवासी विचारत आहेत.डहाणू रोडपर्यंत उपनगरी क्षेत्र जाहीर झाल्यानंतर तब्बल 18 वर्षांनी प्रत्यक्षात लोकल सेवा सुरु झाली एवढ्या प्रतिर्घ कालावधी लोकल सेवा सुरु करण्या करिता लागला याला रेल्वे प्रशासनाने अनेक अडचणीचे घोडे दामटवून वेळ काढूपणा केला आहे. खंबिर नेतृत्वा अभावीच हे घडले आहे.डहाणू पासून वैतरणा पर्यंतच्या रेल्वे स्थानकावरून प्रतिदिन सुमारे (सरासरी) एक लाख दहा हजार प्रवासी प्रवास करतात परंतु प्रवाशांना अनेक प्रश्न, समस्या, अडचणी व गैरसोयींना तोंड देऊन प्रचंड मानिसक त्रास सहन करून व जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन