शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

दीड लाख कोटींची बुलेट ट्रेन नको: त्यापेक्षा ३५ हजार कोटी खर्चून डहाणू ते विरार रेल्वे चौपदरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 06:50 IST

डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या रेल्वेसमस्या कायम

- पंकज राऊतबोईसर : डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या लाखो प्रवाशांची उपनगरीय (लोकल ) सेवा ही जीवनदायी असून या मार्गावरील अनेक समस्या लोकसभेच्या अनेक निवडणुका आल्या व गेल्या तरी अजूनही कायम असून त्या लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाकडून गांभीर्याने वेळच्या वेळी सोडविल्या न गेल्याने त्याचा प्रचंड मानसिक त्रास आज चाकरमनी, महिला व वयोवृद्ध, अपंग तसेच कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. म्हणूनच पालघर जिल्ह्याला बुलेट ट्रेनची नव्हे तर वैतरणा ते डहाणू, विरार दरम्यानच्या लोकलसेवेच्या समस्या सोडविण्याची गरज आहे.

आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आजी - माजी खासदार (जे निवडणूक रिंगणात आहेत) त्याच बरोबर इतर ही उमेदवार आम्ही व आमच्या पक्षाने, संघटनेने डहाणू - विरार दरम्याच्या रेल्वे प्रवाशांचे काही सोडविलेल्या प्रश्नांबरोबरच आम्ही हि कामे केली ती कामे केली असे सांगून स्वत:ची पाठ थोपवून घेऊन मागील प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही लवकरच सोडवू अशी (प्रत्येक निवडणुकीत देणारी) आश्वासन या वेळीही नेहमीप्रमाणे पुन्हा देतील.

मागील अनेक निवडणुकीत मतदारांनी सर्वच पक्षांना संधी देऊनही रेल्वेचे प्रश्न का सुटले नाहीत. पूर्वी हा मतदार संघ डहाणू व उत्तर मुंबई या दोन मतदार संघात विभागला होता लोकसभेच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला असता डहाणू मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा पाच वेळा तर एक वेळा शंकर नम निवडून आले होते, दोन वेळा भाजपा -सेना युतीचे चिंतामण वनगा, तर एक वेळा माकपचे लहानु कोम यांना मतदारांनी संधी दिली होती तर उत्तर मुंबईतून पाच वेळा भाजपाचे राम नाईक एक वेळा काँग्रेसचे (परंतु बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकुरांनी पाठिंबा दिलेले) उमेदवार अभिनेते गोविंदा निवडून आले होते. २००९ साली लोकसभेचा पालघर हा (अनुसूचित जमाती करीता राखीव) मतदार संघ नव्याने निर्माण करण्यात आला, पुनर्रचनेनंतर प्रथम बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव, २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे चिंतामण वनगा व पोटनिवडणुकीत भाजपचेच राजेंद्र गावित निवडून आले होते. म्हणजेच आताच्या निवडणुकीतील जवळ जवळ सर्वच पक्षांना येथील भोळ्याभाबड्या मतदारांनी कधी सलग तर कधी आलटून पालटून संधी दिली होती. तरीही त्यातला एकही जण रेल्वेच्या या समस्या सोडवू शकलेला नाही.

प्रवाशांच्या नशिबी अठरा वर्षे ‘वनवास’ कुणामुळे आला? तो संपणार तरी कधी? मग आज प्रत्येक जण विकासाच्या व रेल्वे प्रश्नांबाबत बोलतात मग अजूनही प्रश्न, समस्या व अडचणी का सुटल्या गेल्या नाहीत याचे उत्तर प्रचारा दरम्यान मत मागणारे उमेदवार ,त्यांचे पक्ष व कार्यकर्ते मतदारांना देतील का ?असा प्रश्न त्रस्त रेल्वे प्रवासी विचारत आहेत.डहाणू रोडपर्यंत उपनगरी क्षेत्र जाहीर झाल्यानंतर तब्बल 18 वर्षांनी प्रत्यक्षात लोकल सेवा सुरु झाली एवढ्या प्रतिर्घ कालावधी लोकल सेवा सुरु करण्या करिता लागला याला रेल्वे प्रशासनाने अनेक अडचणीचे घोडे दामटवून वेळ काढूपणा केला आहे. खंबिर नेतृत्वा अभावीच हे घडले आहे.डहाणू पासून वैतरणा पर्यंतच्या रेल्वे स्थानकावरून प्रतिदिन सुमारे (सरासरी) एक लाख दहा हजार प्रवासी प्रवास करतात परंतु प्रवाशांना अनेक प्रश्न, समस्या, अडचणी व गैरसोयींना तोंड देऊन प्रचंड मानिसक त्रास सहन करून व जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन