शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
6
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
7
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
8
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
9
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
10
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
11
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
12
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
13
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
14
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
15
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
16
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
17
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
18
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
19
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
20
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

भूमीपुत्रांना उद्ध्वस्त करणारे प्रकल्प लादू नका - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 02:12 IST

रोजगार नष्ट होऊन स्थानिक भूमीपुत्र उद्ध्वस्त होतील, असे कोणतेही निर्णय सरकारने घेऊ नयेत, तसेच असे प्रकल्पही लादू नये. प्रकल्प राबविताना स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. वाढवण बंदराला असलेला जनतेचा तीव्र विरोध मी राज्य व केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहे, असे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.

पालघर : रोजगार नष्ट होऊन स्थानिक भूमीपुत्र उद्ध्वस्त होतील, असे कोणतेही निर्णय सरकारने घेऊ नयेत, तसेच असे प्रकल्पही लादू नये. प्रकल्प राबविताना स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. वाढवण बंदराला असलेला जनतेचा तीव्र विरोध मी राज्य व केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहे, असे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.केंद्र सरकारची १९९१ची अधिसूचना कायम ठेवण्यात यावी, या संदर्भात डहाणूतील रिलायन्स एनर्जीच्या सभागृहात शनिवारी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते. इंडस्ट्रियल कॉरिडोर, मुंबई-अहमदाबाद महामार्ग, बुलेट ट्रेन हे तीन प्रकल्प डहाणू, पालघरला बाधित करणारे आहेत. त्यांची खरोखरंच जनतेला गरज आहे का? त्यांचा एकच पर्याय निघेल का? याचाही शासनाने गंभीरपणे विचार करावा, असेही ते म्हणाले.विकासाला माझे समर्थन आहे. लोक विकासाचे स्वागत करीत असतात. त्याला कुणीच विरोध करत नाही. मात्र, हे प्रकल्प स्थानिकांना विश्वासात घेऊन राबवा, असेही पवार म्हणाले. फलोत्पादन, मच्छीमारीच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेन, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. या चर्चासत्राला आमदार आनंद ठाकूर, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार