शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पेंडक्याचीवाडीला पाणीटँकर मिळेना

By admin | Updated: March 12, 2017 02:13 IST

धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पेंडक्याचीवाडी येथील आदिवासी बांधवाना डिसेंबरपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना

- रविंद्र साळवे, मोखाडा

धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पेंडक्याचीवाडी येथील आदिवासी बांधवाना डिसेंबरपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना देखील जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अजूनपर्यत टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही.चारशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावपाड्याला दरवर्षीच पाणीटंचाई निर्माण होत असते. यामुळे येथील भूमीपुत्राना डिसेंबरपासून घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. येथील महिला पुरुषांना विहिरीवरच मुक्काम ठोकून रात्रभर नंबर लाऊन विहिरीत उतरून पाणी भरावे लागते. टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मोखाडा तहसील कार्यलयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेला आहे परंतु अद्याप तो मंजूर झालेला नाही. उन्हाळाच्या शेतीच्या कामात गुंतलेल्या बांधवाना हातचे काम टाकून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने कुणी टँकर देता का टँकर अशी म्हणण्याची वेळ या बांधवा वर येऊन ठेपली आहे. शासन निर्णयानुसार पाणीपुरवठ्याचा विषय जीवनावश्यक बाब असल्याने २४ तासांत त्याबाबतचा निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र, शासनाच्या उदासिन धोरणामुळे तारीख पे तारीख अशीच टॅँकर मागणीच्या प्रस्तावाची अवस्था झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना एखादा पाणी बळी गेल्यावर जाग येईल का? (वार्ताहर)जलयुक्त शिवार योजनेत ही वाडी कधी समाविष्ट करणार? पाणी टंचाईग्रस्त झाल्याने दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करावा लागणाऱ्या गावपाड्यांची जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत निवड करायची आहे. त्यामुळे या ठिकाणी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ अशा विविध योजना राबवून येथील भूजल पातळी वाढवूना पाणी टंचाई आटोक्यात आणता येईल. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पेंडक्याचीवाडीत गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून त्याला जलयुक्त शिवार योजनेमध्ये समाविष्ट केलेले नाही. त्यामुळे तात्काळ हे गाव पाडे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करण्यात यावीत अशी मागणी रामदास बरफ यांनी केली आहे. ती जिल्हाधिकारी कधी पूर्ण करणार?