शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

जि. प. नोकरीसाठी ओबीसी-एससी उमेदवारांच्या सर्वाधिक जागा राखीव

By admin | Updated: January 23, 2016 02:44 IST

जिल्ह्यातील इतार मागासवर्गीय (ओबीसी) व अनुसूचित जाती (एससी) उमेदवारांसाठी ठाणे जिल्हा परिषदेत होणाऱ्या सरळसेवा भरतीमध्ये सर्वाधिक जागा

सुरेश लोखंडे,  ठाणेजिल्ह्यातील इतार मागासवर्गीय (ओबीसी) व अनुसूचित जाती (एससी) उमेदवारांसाठी ठाणे जिल्हा परिषदेत होणाऱ्या सरळसेवा भरतीमध्ये सर्वाधिक जागा राखीव ठेवल्याचे १९ जानेवारीच्या राज्य शासन निर्णयाव्दारे उघड झाले आहे. यामुळे विविधांगांनी लाभदायक ठरलेले ठाणे जिल्हा विभाजन या दोन प्रवर्गांसाठी देखील सुखद धक्का देणारे ठरले आहे. तर खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी दोन्ही जि.प.च्या भरतीसाठी ४८ टक्के आरक्षण केले आहे.विभाजन झाल्यानंतरही ठाणे व पालघर या दोन्ही जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा भरतीची बिंदू नामावली आतापर्यंत एकच होती. यामुळे जिल्हा परिषदेतील रिक्त जागांची संख्या निश्चित करणे शक्य होत नव्हते. या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय लागू केला आहे. याद्वारे ठाणेसह पालघर जिल्हा परिषदेच्या सरळसेवा भरतीसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण लागू केले आहे. ठाणे जि.प.च्या भरतीत या आधी ओबीसी उमेदवारांसाठी केवळ नऊ टक्के आरक्षण होते ते आता १९ टक्के केले आहे. तर पालघर जि.प.त या प्रवर्गासाठी नऊ टक्के जागा राखीव ठेवल्या आहत. या प्रमाणेच एसी उमदेवारांसाठी ठाणे जि.प.मध्ये आधीच्या आठ टक्के ऐवजी १३ टक्के जागा सरळसेवा भरतीसाठी लागू केल्या आहेत. तर पालघर जि.प.साठी ही संख्या आठ टक्के निश्चित केली आहे. यामुळे आधीच्या आरक्षरणाच्या तुलनेत ठाणे जि.प.मध्ये ओबीसींना १० टक्के तर एससी प्रवर्गास पाच टक्के जादा जागा राखीव पदाचा लाभ विभाजनामुळे मिळाला आहे. विभाजनानंतर मूळ ठाणे जिल्ह्यातून आदिवासी बहुल तालुके वगळण्यात आले. यामुळे ठाणे जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्या (एसटी) ५.२६ टक्के आहे. यामुळे एसटी प्रवर्गासाठी या आधी ठाणे जि. प.च्या सरळसेवा भरतीचे आरक्षण २२ टक्केवरून सात टक्के केले आहे. तर पालघर जिल्ह्याची आदिवासी लोकसंख्या ३७.३९ टक्के असल्यामुळे या पालघर जि.प.च्या भरतीत एसटी उमेदवारांसाठी सर्वाधिक २२ टक्के पद भरतीचेआरक्षण लागू केले आहे.या दोन्ही जिल्हा परिषदांच्या सरळसेवा भरतीचे उर्वरित प्रवर्गाच्या आरक्षणाची टक्केवारी दोन्हीकडे सारखीच निश्चित केली आहे. यामध्ये वि.जा.-अ तीन टक्के, भ.ज.-ब २.५ टक्के, भ.ज.-क ३.५ टक्के भ.ज.-ड दोन टक्के, विमाप्र.-दोन टक्के, अािण खुल्या प्रवर्गासाठी ४८ टक्के जागा या सरळसेवेच्या भरतीसाठी लागू केल्या आहेत.