शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

ठक्करबाप्पा योजनेची प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकाऱ्यांकडे

By admin | Updated: March 12, 2017 02:14 IST

जव्हार आदिवासी विकास विभागातील सर्वात मोठी योजना असलेल्या ठक्करबाप्पा योजनेच्या अंमलबजावणीचे आजवर अप्पर आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांच्याकडे

जव्हार आदिवासी विकास विभागातील सर्वात मोठी योजना असलेल्या ठक्करबाप्पा योजनेच्या अंमलबजावणीचे आजवर अप्पर आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांच्याकडे असलेले अधिकार काढून घेण्यात आले असून ते ६ मार्चपासून सदस्य, सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या कार्यालयात ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना आता पारदर्शक होणार असल्याने या योजनेच्या नावाखाली टक्केवारीचा हिशोब मांडून अनेकांनी तुंबडया भरल्या होत्या. मात्र आता सरकारच्या या निर्णयाने त्यांचे धाबे दणाणले आहेत. ही योजना राबवितांना ५० टक्क्याहून अधिक आदिवासी लोकवस्ती असलेल्या वस्त्या, पाडयांमध्ये आवश्यक कामांची खात्री करुन त्याचा प्रकल्प अहवाल तयार करुन त्यास अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घ्यावी लागत होती.तसेच याला प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडे होते. परिणामी या कामांच्या सर्व कार्यवाहीमध्ये मोठया प्रमाणात टक्केवारीचा भ्रष्टाचार होत होता. अशा अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचेही उघड झाले होते. अशीच कामाची टक्केवारी घेतांना एका प्रकल्प अधिकाऱ्याला लाचलूचपत विभागाने अटकही केली होती. यामुळे ही योजना निव्वळ काही अधिकाऱ्यांना चरण्याचे कुरण बनले होते. तर या योजनेतील कामांच्या मंजुरीसाठी अनेक ठेकेदारांचीही या कार्यालयात गर्दी नेहमीच बघायला मिळत होती.भ्रष्टचाराच्या प्रकरणांनी गाजलेल्या ठक्करबाप्पा आदिवासी सुधारणा विस्तारित कार्यक्र म योजने अंतर्गत होणाऱ्या कामाची प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांची दुकाने बंद होणार आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ठक्करबाप्पा योजना पारदर्शक झाल्याबाबत समाधान व्यक्त होत असून राज्य सरकारच्या या निर्णयाचे जनतेकडून स्वागत होत आहे. (वार्ताहर)निर्णय कितपत उपयुक्त ठरणार ?जिल्हाधिकाऱ्यांकडे आधीच प्रचंड कार्यभार आहे. त्याला तोंड देता-देता त्यांच्या नाकीनऊ येत आहेत. अशा स्थितीत आता त्यांच्याकडे हा नवा कार्यभार सोपविला तर त्याला ते कितपत न्याय देऊ शकतील असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्याचे कोणते उत्तर प्रशासनाकडे आहे.