शहरं
Join us  
Trending Stories
1
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
2
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
3
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
4
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
5
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
6
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
7
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
8
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
9
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
10
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
11
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
12
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
13
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
14
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
15
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
16
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
17
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
18
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
19
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
20
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
Daily Top 2Weekly Top 5

कुंद वातावरणामुळे रोगाचे सावट

By admin | Updated: November 26, 2015 01:25 IST

आठवडाभर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून अधूनमधून पाऊस पडत असल्याने भाजीपाला, कडधान्ये व फळिपकांवर रोगाचे सावट असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

वाडा : आठवडाभर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून अधूनमधून पाऊस पडत असल्याने भाजीपाला, कडधान्ये व फळिपकांवर रोगाचे सावट असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत. वाडा तालुक्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतात विहीर किंवा कुपनलिका मारून शेतकरी भाजीपाला, कडधान्ये तसेच फळपिकांचे उत्पादन घेत असतात. मात्र गेल्या आठवडाभर ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून रिमझिम पाऊस पडत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. भाजीपाला, कडधान्ये, फळपीक यांच्यावर रोग पडला असून औषध फवारणी करूनही रोगाचे उच्चाटन होत नाही. घोणसई येथील शेतकरी सुरेश पाटील, नितीन चौधरी यांनी एक एकर जागेत गवार भाजीपाला पिकाची तसेच काकडीची लागवड केली आहे मात्र, सध्याच्या वातावरणामुळे रोगाचे सावट पसरले आहे. औषधे फवारणी करूनही रोगाचे उच्चाटन होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आंबा व काजू या फळांचा मोहरही ढगाळ वातावरणामुळे हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तर वाडा तालुक्यातील भाजीपाला, कडधान्ये, व फळपिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे वाडा तालुकाध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.