शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कुंद वातावरणामुळे रोगाचे सावट

By admin | Updated: November 26, 2015 01:25 IST

आठवडाभर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून अधूनमधून पाऊस पडत असल्याने भाजीपाला, कडधान्ये व फळिपकांवर रोगाचे सावट असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

वाडा : आठवडाभर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून अधूनमधून पाऊस पडत असल्याने भाजीपाला, कडधान्ये व फळिपकांवर रोगाचे सावट असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत. वाडा तालुक्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतात विहीर किंवा कुपनलिका मारून शेतकरी भाजीपाला, कडधान्ये तसेच फळपिकांचे उत्पादन घेत असतात. मात्र गेल्या आठवडाभर ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून रिमझिम पाऊस पडत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. भाजीपाला, कडधान्ये, फळपीक यांच्यावर रोग पडला असून औषध फवारणी करूनही रोगाचे उच्चाटन होत नाही. घोणसई येथील शेतकरी सुरेश पाटील, नितीन चौधरी यांनी एक एकर जागेत गवार भाजीपाला पिकाची तसेच काकडीची लागवड केली आहे मात्र, सध्याच्या वातावरणामुळे रोगाचे सावट पसरले आहे. औषधे फवारणी करूनही रोगाचे उच्चाटन होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आंबा व काजू या फळांचा मोहरही ढगाळ वातावरणामुळे हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तर वाडा तालुक्यातील भाजीपाला, कडधान्ये, व फळपिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे वाडा तालुकाध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.