शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वसई-विरारमध्ये नाराजी, धरणांत पाणीसाठा पुरेसा, तरीही पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 23:51 IST

Vasai-Virar : एकीकडे वसई-विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाणीसाठा समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र पालिका क्षेत्रात पाण्याचे दुर्मिक्ष्य असल्याचे दिसत आहे.

- आशिष राणे

वसई : वाढता कोरोना, त्यात एप्रिलचा कडकडीत महिना आणि सोबत उन्हाळा आला की बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे वास्तव सर्वत्र पाहायला मिळते; परंतु उर्वरित भागांत जरी पाणीटंचाई भासत असली तरी वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार आणि उसगाव धरणात जूनअखेरपर्यंतचा पाण्याचा साठा शिल्लक आहे, तर जिल्ह्यातील सूर्याच्या धामणी धरणात वर्षभर पुरेल इतका समाधानकारक पाणीसाठा असतानाही वसई-विरारच्या काही भागांत पाणीटंचाई असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.एकीकडे वसई-विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाणीसाठा समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र पालिका क्षेत्रात पाण्याचे दुर्मिक्ष्य असल्याचे दिसत आहे. याविरोधात काही दिवसांपूर्वी पालिकेवर हंडा मोर्चाही काढण्यात आला होता. दरम्यान, वसई-विरारकरांना पाणीपुरवठा करणारी पालघर व वसई तालुक्यात एकूण तीन धरणे असून, यापैकी धामणी (सूर्या ) धरणात आजच्या घडीला ४६ टक्के इतका मुबलक पाणीसाठा आहे, तर पालिकेच्या पेल्हार धरणात ३७ टक्के आणि उसगाव धरणात ४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यापर्यंत तरी पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही असेच या धरणांतील शिल्लक पाणीसाठ्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

सदोष जल वितरण व्यवस्थेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अर्थातच नुसत्या योजना नकोत तर तांत्रिकदृष्ट्या कोणतीही योजना परिपूर्ण झाली नाही. पालिका प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर केल्यास नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.- सुदेश चौधरी, माजी स्थायी समिती सभापती

पेल्हार व उसगाव धरणात जूनअखेरपर्यंत पुरेल इतका साठा आहे, तर धामणी (सूर्या) धरणात वर्षभर पुरेल इतका साठा आहे. तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावे. कारण कोरोनामुळे सतत हात धुवावे लागत असल्याने पाण्याचा जास्त वापर होत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने होणे गरजेचे आहे.- सुरेंद्र ठाकरे, पाणीपुरवठा अभियंता, वसई 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार