शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

वसई-विरारमध्ये नाराजी, धरणांत पाणीसाठा पुरेसा, तरीही पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 23:51 IST

Vasai-Virar : एकीकडे वसई-विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाणीसाठा समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र पालिका क्षेत्रात पाण्याचे दुर्मिक्ष्य असल्याचे दिसत आहे.

- आशिष राणे

वसई : वाढता कोरोना, त्यात एप्रिलचा कडकडीत महिना आणि सोबत उन्हाळा आला की बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे वास्तव सर्वत्र पाहायला मिळते; परंतु उर्वरित भागांत जरी पाणीटंचाई भासत असली तरी वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार आणि उसगाव धरणात जूनअखेरपर्यंतचा पाण्याचा साठा शिल्लक आहे, तर जिल्ह्यातील सूर्याच्या धामणी धरणात वर्षभर पुरेल इतका समाधानकारक पाणीसाठा असतानाही वसई-विरारच्या काही भागांत पाणीटंचाई असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.एकीकडे वसई-विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाणीसाठा समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र पालिका क्षेत्रात पाण्याचे दुर्मिक्ष्य असल्याचे दिसत आहे. याविरोधात काही दिवसांपूर्वी पालिकेवर हंडा मोर्चाही काढण्यात आला होता. दरम्यान, वसई-विरारकरांना पाणीपुरवठा करणारी पालघर व वसई तालुक्यात एकूण तीन धरणे असून, यापैकी धामणी (सूर्या ) धरणात आजच्या घडीला ४६ टक्के इतका मुबलक पाणीसाठा आहे, तर पालिकेच्या पेल्हार धरणात ३७ टक्के आणि उसगाव धरणात ४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यापर्यंत तरी पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही असेच या धरणांतील शिल्लक पाणीसाठ्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

सदोष जल वितरण व्यवस्थेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अर्थातच नुसत्या योजना नकोत तर तांत्रिकदृष्ट्या कोणतीही योजना परिपूर्ण झाली नाही. पालिका प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर केल्यास नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.- सुदेश चौधरी, माजी स्थायी समिती सभापती

पेल्हार व उसगाव धरणात जूनअखेरपर्यंत पुरेल इतका साठा आहे, तर धामणी (सूर्या) धरणात वर्षभर पुरेल इतका साठा आहे. तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावे. कारण कोरोनामुळे सतत हात धुवावे लागत असल्याने पाण्याचा जास्त वापर होत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने होणे गरजेचे आहे.- सुरेंद्र ठाकरे, पाणीपुरवठा अभियंता, वसई 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार