शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मनपातील २९ गावे वगळण्याप्रकरणी शासनाच्या भूमिकेबाबत नाराजी

By admin | Updated: October 3, 2015 23:59 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेतील २९ गावे वगळण्याप्रकरणी आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. महानगरपालिकेऐवजी आता याचिकाकर्त्यांनी राज्य शासनाला

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील २९ गावे वगळण्याप्रकरणी आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. महानगरपालिकेऐवजी आता याचिकाकर्त्यांनी राज्य शासनाला लक्ष्य केले आहे. राज्य शासनाने तीन वेळा मुदत मागितली. न्यायालयाने ती दिल्यानंतरही शासनाने पुन्हा मुदत मागितल्यामुळे राज्य शासनावर विविध सामाजिक संस्थांनी टीकेची झोड उठवली आहे. न्यायालयाच्या कामकाजामध्ये शासन हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.महानगरपालिकेतील २९ गावे वगळू नये, याकरिता आमदार हितेंद्र ठाकूर, आ. क्षितिज ठाकूर व आमदार विलास तरे यांनी राज्य शासनाकडे प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये महानगरपालिकेचा ‘ड’ श्रेणीतून ‘क’ श्रेणीमध्ये समावेश झाला आहे. वसई-विरारमधील उर्वरित २१ ग्रामपंचायत क्षेत्रासाठी विशेष प्राधिकरण म्हणून शासनाने मनपाला अधिकार बहाल केले आहेत. या सर्व गावांतील विकासकामांवर गेल्या साडेपाच वर्षांत शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, याकडे शासनाने न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. या घडामोडीनंतर उच्च न्यायालयाने शासनाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. शासनाच्या भूमिकेमुळे याचिकाकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत हा उच्च न्यायालयाच्या कामकाजात शासनाचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे. निर्भय जनमंच या संस्थेच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असताना शासनाने पुन्हा मुदतवाढ मागणे हा कामकाजामध्ये हस्तक्षेप असल्याचा आरोप मनवेल तुस्कानो यांनी केला आहे. (प्रतिनिधी)