शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

भातपिकांना रोगांची लागण; सततच्या पावसामुळे भातशेतीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 05:36 IST

तालुक्यातील कासा, वाणगाव भागात पावसाळ्यात भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.

कासा : तालुक्यात शेतकऱ्यांचा भातशेती हा प्रमुख व्यवसाय आहे. डहाणू तालुक्यातील कासा भागात भातपिकाला रोगाची लागण झाली आहे. ही लागण वेळीच आटोक्यात न आल्यास भातशेतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील कासा, वाणगाव भागात पावसाळ्यात भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. या हळव्या भातशेतीची कापणी आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तर गरव्या भात शेतीची कापणी आॅक्टोबर महिन्याअखेरीस केली जाते. मात्र, सततच्या पावसामुळे शेतजमीन ओलीच रहात असल्याने भात पिकांवर रोगाची लागण झाल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले. सातत्याने झालेल्या पावसामुळे येथील शेतजमीन ओलिताखाली राहिल्याने वेगवेगळ्या प्रकारचे गवत, बांडभूर लवाके असे तणही मोठ्या प्रमाणात होते. तालुक्यात सध्या हळव्या भात शेतीची कापणी काही शेतकºयांनी केली आहे. हळवी भात दाण्यांनी भरली आहेत. मात्र वादळी पावसाने पिके शेतात पडली असून पिकावर बगळ्या आणि तुडतुड्या रोग पडला आहे. काही शेतकºयांचे पूर्ण शेतच पांढरे झाले आहे, त्यामुळे भाताच्या रोपाची वाढ खुंटली आहे.कासा, वाणगाव, सायवन भागातील शेतकरी आदिवासी तसेच गरीब असल्याने बºयाच शेतकºयांकडे फवारणी यंत्रे नाहीत. त्यामुळे या शेतकºयांना शासनाच्या कृषी विभागाकडून फवारणी यंत्रे व औषधे, कीटकनाशके मोफत दरात किंवा अनुदानातून पुरविण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.परतीच्या पावसामुळे भात पिकाचे नुकसानविक्रमगड : तालुक्यात सध्या परतीचा पाऊस आणि आॅक्टोबर महिन्यातील कडक ऊन असे चित्र आहे. कधी मेघगर्जनेसह तर कधी विजेच्या कडकडाटानंतर येणारा पाऊस हा भात पिकाला धोका होऊन नुकसान देणारा ठरत आहे. दोन - तीन दिवसांपासून सायंकाळी पावसाचा जोर असतो. वारा पावसामुळे उभे असलेले हे भात पीक पूर्णपणे झोपून जाण्याची भीती आहे. सध्या भात पीक तयार झाले असून शेतकरी कापणीच्या तयारीत आहे. परंतु दररोज येणाºया पावसामुळे शेतकरी भात कापून ठेवत नाही. परिणामी, शेतकºयांचे दोन्ही कडून नुकसान होते आहे. तालुक्यात ८५६ हेक्टरवर भात शेती केली जाते. भात हे मुख्य पीक असून या भातावर शेतकरी अवलंबून असतो. सध्या हळवा भात पीक कापणी योग्य झाला आहे. परंतु या पावसामुळे भात कापला जात नसल्याचे शेतकरी रणधीर पाटील यानी सांगितले. तालुक्यात भात चांगला आला असला तरी परतीचा पाऊस धोका देतो का अशी अवस्था आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.खाचरात पाणी असल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढलीडहाणू/बोर्डी : भात पीक कापणीच्या हंगामाला दसºयाच्या शुभ मुहूर्तावर प्रारंभ झाला आहे. मात्र खाचरांमध्ये ओलावा तर काही ठिकाणी पाणी असल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे. पिकाचे नुकसान होण्यासह, कापलेल्या भाताला सुक्या जागेवर नेताना अधिकचे मजूर खर्ची होत असून आर्थिक झळ बसत आहे. डहाणू तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते.येथील भात उत्पादक साधारणत: हळवे आणि निमगरव्या वाणांची लागवड करतात. बारमाही पाण्याची सोय असलेले शेतकरी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर धुळपेरणीस प्राधान्य देतात. त्यामुळे दसºयापूर्वीच भात पीक कापणीला येते. या वर्षी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत वारा आणि पाऊस झाल्याने काही भागात उभी पिके आडवी होऊन दाणे भिजले आहेत.तर समुद्रकिनाºयापासून सुमारे १५ किमी अंतरवारील खलाटी आणि त्यापुढील वलाटी क्षेत्रातील खाचरांमध्ये पाणी असून बहुतेक भागात जमिनीत ओलावा आहे. शिवाय ९ ते ११ आॅक्टोबर या काळात परतीच्या पावसा बाबतचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या प्रखर ऊन आणि वातावरणात उष्णता असल्याने जेवढी कापणी उरकता येईल त्याकडे शेतकºयांचा कल आहे.दसºयाचा मुहूर्तावर भात कापणीला सुरु वात करण्यात आली असून सण असल्याने मजुरांची उपलब्धता कमी आहे. पुढील काळात एकाच वेळी या कामाला प्रारंभ होऊन कापणी मजुरांचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे मजुरांचे बुकिंग करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे.या तालुक्यात दसºयाचा मुहूर्त हा भात कापणीकरिता साधला जातो. मात्र एकाच दिवशी हंगामाचा प्रारंभ होत असल्याने मजुरांचा तुटवडा भासू नये म्हणून सणाच्या एक दोन दिवस आधी सुरु वात केली जाते. काही भागात खाचरत पाणी असून बºयाच क्षेत्रातील जमीन ओली आहे. परतीचा पाऊस झाल्यास त्याचा फटका कापणीला आलेल्या पिकाला बसू शकतो.विजय किणी, भात उत्पादक शेतकरी

टॅग्स :palgharपालघर