शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कासात महावितरणची अनागोंदी

By admin | Updated: September 10, 2015 23:44 IST

डहाणू तालुक्यातील ग्रामीणभागात महावितरणच्या अनागोंदी व गलथान कारभार सुरू आहे. वीजग्राहकांना प्रत्येक महिन्याला रिडींग न घेता अवाच्यासव्वा काही ग्राहकांना बिले आकारण्यात येत आहेत.

-  शशिकांत ठाकूर,  कासाडहाणू तालुक्यातील ग्रामीणभागात महावितरणच्या अनागोंदी व गलथान कारभार सुरू आहे. वीजग्राहकांना प्रत्येक महिन्याला रिडींग न घेता अवाच्यासव्वा काही ग्राहकांना बिले आकारण्यात येत आहेत. माजी मंत्री शंकर नम यांना घरगुती वापराच्या मीटरसाठी ६८ हजार ७०० रू. बिल मागील महिन्यात आले आहे. दर महिन्यास सरासरी २ हजार रु. बिल भरूनही वर्ष अखेरीस कमी करून ६३ हजार ७०० रू. इतके बिल देण्यात आले. मात्र दुसरीकडे मिटर न वापरता वीजचोरी व आकडे टाकून वीज घेणाऱ्यांवर कोणतीही कारवाई महावितरण करतांना दिसत नाही.कासा परिसरात घरगुती वापरासाठी काही ग्राहकांना महिन्याची १० ते १५ हजार अशी बिले अंदाजे दिली जात आहेत. नम यांना दिलेले बिल हे मिटर रिडींग वेळोवेळी न घेता प्रत्येक महिन्याला अंदाजे बिल महावितरणाने दिले व शेवटी एकदम बिल दिले. परंतु वर्षाच्या प्रत्येक महिन्यास त्यांना सरासरी १३० युनिट वीज वापरत असल्याचे तर मे महिन्यात मात्र एकदम ६,८४२ युनिट वीज वापर दाखविला आहे. आदिवासी व गरीब ग्राहकांनाही महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे व चुकीमुळे मीटर रिडींग न घेता भरमसाठ बेहिशेबी बिले दिली जात असल्याने त्यांना भरणे अशक्य होते. परिणामी अशा ग्राहकांची वीजजोडणी तोडले जाते. त्यामुळे कासा भागातील महावितरणच्या कारभाराबाबत शंकर नम यांनी वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली असून यामध्ये लवकर सुधारणा न झाल्यास ग्राहक वितरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढतील असे पुढे त्यांनी सांगितले.या भागातील वीजबिले ही घरोघरी न पोहचविता कोणा एकाकडे गावात दिली जातात. त्यामुळे ती प्रत्येक ग्राहकाकडे नेहमी वीजबिल भरणा तारखेच्या नंतर पोहोचतात त्यामुळे प्रत्येक महिन्याला ग्राहकांना नाहक अधिक रक्कम भरावी लागते. या मीटर रिडींग व वीजबिले वाटपाचा ठेका खाजगी संस्थांना दिल्याचे त्यांनी सांगितले.आदिवासी व ग्रामीण भागातील गावामध्ये वर्षभरातून एकदम वीजलाईन दुरूस्ती केली जात नाही. तर बऱ्याच गावपाड्यावर वीजवाहक तार व खांब जीर्ण व नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात बहुतेक दिवस वीजगायब असते. तर इतर दिवशीही वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो. तसेच गेल्या १० दिवसापासून वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. दरम्यान याबाबत चारोटी वीजकार्यालयातील शाखा अभियंता दळवी यांच्याशी संपर्क साधला असता वेळोवेळी मीटर व फोटोरीडींग न घेतल्याने एकदम जास्त बिले येत असल्याचे सांगितले.