शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

कासात महावितरणची अनागोंदी

By admin | Updated: September 10, 2015 23:44 IST

डहाणू तालुक्यातील ग्रामीणभागात महावितरणच्या अनागोंदी व गलथान कारभार सुरू आहे. वीजग्राहकांना प्रत्येक महिन्याला रिडींग न घेता अवाच्यासव्वा काही ग्राहकांना बिले आकारण्यात येत आहेत.

-  शशिकांत ठाकूर,  कासाडहाणू तालुक्यातील ग्रामीणभागात महावितरणच्या अनागोंदी व गलथान कारभार सुरू आहे. वीजग्राहकांना प्रत्येक महिन्याला रिडींग न घेता अवाच्यासव्वा काही ग्राहकांना बिले आकारण्यात येत आहेत. माजी मंत्री शंकर नम यांना घरगुती वापराच्या मीटरसाठी ६८ हजार ७०० रू. बिल मागील महिन्यात आले आहे. दर महिन्यास सरासरी २ हजार रु. बिल भरूनही वर्ष अखेरीस कमी करून ६३ हजार ७०० रू. इतके बिल देण्यात आले. मात्र दुसरीकडे मिटर न वापरता वीजचोरी व आकडे टाकून वीज घेणाऱ्यांवर कोणतीही कारवाई महावितरण करतांना दिसत नाही.कासा परिसरात घरगुती वापरासाठी काही ग्राहकांना महिन्याची १० ते १५ हजार अशी बिले अंदाजे दिली जात आहेत. नम यांना दिलेले बिल हे मिटर रिडींग वेळोवेळी न घेता प्रत्येक महिन्याला अंदाजे बिल महावितरणाने दिले व शेवटी एकदम बिल दिले. परंतु वर्षाच्या प्रत्येक महिन्यास त्यांना सरासरी १३० युनिट वीज वापरत असल्याचे तर मे महिन्यात मात्र एकदम ६,८४२ युनिट वीज वापर दाखविला आहे. आदिवासी व गरीब ग्राहकांनाही महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे व चुकीमुळे मीटर रिडींग न घेता भरमसाठ बेहिशेबी बिले दिली जात असल्याने त्यांना भरणे अशक्य होते. परिणामी अशा ग्राहकांची वीजजोडणी तोडले जाते. त्यामुळे कासा भागातील महावितरणच्या कारभाराबाबत शंकर नम यांनी वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली असून यामध्ये लवकर सुधारणा न झाल्यास ग्राहक वितरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढतील असे पुढे त्यांनी सांगितले.या भागातील वीजबिले ही घरोघरी न पोहचविता कोणा एकाकडे गावात दिली जातात. त्यामुळे ती प्रत्येक ग्राहकाकडे नेहमी वीजबिल भरणा तारखेच्या नंतर पोहोचतात त्यामुळे प्रत्येक महिन्याला ग्राहकांना नाहक अधिक रक्कम भरावी लागते. या मीटर रिडींग व वीजबिले वाटपाचा ठेका खाजगी संस्थांना दिल्याचे त्यांनी सांगितले.आदिवासी व ग्रामीण भागातील गावामध्ये वर्षभरातून एकदम वीजलाईन दुरूस्ती केली जात नाही. तर बऱ्याच गावपाड्यावर वीजवाहक तार व खांब जीर्ण व नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात बहुतेक दिवस वीजगायब असते. तर इतर दिवशीही वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो. तसेच गेल्या १० दिवसापासून वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. दरम्यान याबाबत चारोटी वीजकार्यालयातील शाखा अभियंता दळवी यांच्याशी संपर्क साधला असता वेळोवेळी मीटर व फोटोरीडींग न घेतल्याने एकदम जास्त बिले येत असल्याचे सांगितले.