शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा डिजिटल इंडियाचा दावा येथे पडला खोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:53 IST

डहाणू तालुक्यातील घोळ चिकणपाडा व सारणी कांढोलपाडा येथे आजही वीज नाही. त्यामुळे येथील नागरिकांना प्रकाशासाठी मिनमिणत्या चिमणीचा आधार घ्यावा लागत आहे.

शशिकांत ठाकूर कासा : डहाणू तालुक्यातील घोळ चिकणपाडा व सारणी कांढोलपाडा येथे आजही वीज नाही. त्यामुळे येथील नागरिकांना प्रकाशासाठी मिनमिणत्या चिमणीचा आधार घ्यावा लागत आहे.सरकारकडून देशातील सर्व खेड्यापाड्यात वीज पोहचली असल्याचा दावा करत असले तरी डहाणू तालुक्यातील अजून गाव पाडे विजेविना आहेत. त्यामुळे सरकारचा दावा पुर्णपणे फोल ठरतो आहे. तालुक्यातील कासा ग्रामपंचायत हद्दीतील घोळ चिकण पाडा व सारणी ग्रामपंचायत हद्दीतील कांढोल पाडा हे मुंबई अहमदाबाद महामार्गापासून अवघ्या २ की मी अंतरावर आहेत. चिकणपाडा येथे सुमारे शंभर कुटुंबे तर कांढोलपाडा येथे ५० आदिवासी कुटुंबे पिढ्यानिपढ्या राहत आहेत. मात्र, या कुटुंबाने अद्याप विजेचा प्रकाश पाहायला न मिळाल्याचे भयाण वास्तव आहे. पाच वर्षांपूर्वी घोळ चिकणपाडा येथे वीज जोडणीचे काम सुरू करण्यात आले त्यासाठी विजेचे खांब उभारण्यात आले मात्र, ही कामे अर्धवट करुन महावितरणचे कर्मचारी गायब झाल्याचे रखमा खरपडे सांगतात. उभारलेल्या या खांबावर वीजेच्या ताराच नाहीत. तर सारणी कांढोलपाडा येथे वारंवार महावितरण कडे मागणी करूनही जोडणी मिळालेली नाही.रेशन दुकानातून दोन ते तीन लिटर मिळणाऱ्या रॉकेलवर त्यांना महिना काढावा लागतो. या चिमणीच्या अंधुक प्रकाशतच येथील आदिवासी कुटूंबांना आपली सर्व कामे पार पाडावी लागतात. तर शाळकरी विद्यार्थी चिमणीच्या प्रकाशतच अभ्यास करतात. जिथे विजेचा पत्ताच नाही तेथे पंखा, टीव्ही, इस्त्री, मोबाइल आदी प्रमुख गरजा बनलेल्या वस्तूंच्या वापराची कल्पना ही कुटुंबे करू शकत नाहीत.