शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

आदिवासींचा सर्वांगीण विकास करु!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:10 IST

जव्हार, मोखाड्यामध्ये पंडित यांचा दौरा : वीज अन् नेटवर्कची समस्या मुख्यमंत्र्याकडे मांडणार

हुसेन मेमन 

जव्हार : जव्हार, मोखाड्यातील दौरा करताना काही समाधानकारक बाबी समोर आल्या. मात्र, येथील नेटवर्कचा मुद्दा अतिशय गंभीर असून कनेक्टिव्हीटीच जर नसेल तर इथली आणि शहरी भागातील दरी कधीच भरुन निघणार नाही. वीज आणि नेटवर्क भरपूर असल्याशिवाय या भागाचा विकास होणार नाही. यामुळे आॅनलाईन केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणार तसेच, रोजगार आरोग्याच्या समस्या आश्रमशाळांची दुरवस्था या सर्व समस्याच्या सोडवणुकीसाठी मी कटिबद्ध असून या सर्व अडचणी लवकरच मुख्यमंत्र्यासमोर मांडणार आहे, असे प्रतिपादन आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे राज्यस्तरीय अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी जव्हार व मोखाडा येथे केले.

पंडित यांनी या आढावा दौऱ्यात चौफेर योजनाचा आढावा घेत येथे राबविण्यात आलेल्या सर्व योजनांची माहिती घेतली. तसेच मुख्यत: प्रत्येक विभागातील रिक्त पदांची माहिती घेत ही पदे भरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख बाब म्हणजे बºयाचशा योजना सध्या आॅनलाईन असल्याने दिरंगाई होताना दिसत आहे. यामुळे प्रामुख्याने या ठिकाणी नेटवर्किंगचे जाळे असणे गरजेचे असल्याची भावना पंडित यांनी व्यक्त केली. कारण रेशन रोजगार हमीचे पगार अशा लोकांच्या जीवनाशी निगडित सर्व योजनांचा संबंध नेटवर्कशी असल्यामुळे भारत आणि र्इंडीयाची दरी वाढतच जाईल, अशी भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली तर वनविभागाच्या हुकुमशाही कारभाराबाबतही नाराजी व्यक्त केली.यावेळी पंडित यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. तेथील सौर पॅनल रिक्त पक्ते याबाबत कार्यवाही करण्याचे सांगितले तर मोखाडा शासकीय विश्राम गृहमध्ये सर्व विभागांचा आढावा घेतला त्यानंतर शाळाबाह्य मुलींच्या कस्तुरबा बालिका विद्यालयाला भेट देवून तेथील सर्व परिस्थितीची माहिती घेतली.याशिवाय इमारत दुरु स्तीसाठी तत्काळ पाउले उचलण्याचे आदेशही यावेळी दिले तद्नंतर शेलमपाडा येथील अंगणवाडीला भेट दिली आणि तेथील जिल्हा परिषदेच्या पडलेल्या शाळेचेही पाहणी दौºयाच्या शेवटी सूर्यमाळ आश्रमशाळेची पाहणी करत पंडित यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. येथील नवीन आश्रमशाळा इमारतीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजला असून जिल्हाधिकारी यांनी कार्यवाहीचे आदेश देवूनही कारवाई न झाल्याने पंडित यांनी तीव्र नारजी व्यक्त केली. या संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले तर सूर्यमाळ प्रमाणेच पळसुंडा आश्रमशाळेचेही काम रखडले असल्याचा मुद्दा यावेळेस समोरआला.प्रमुख अधिकाºयांची उपस्थितीयासर्व आढावा दौºयात विविध विभागातील सर्व योजनांची माहिती घेवून ती सोडवून आदिवासींच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत दै.लोकमतशी बोलताना व्यक्त केले. यावेळी साहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत भारती, तहसीलदार शेटे, कृषी अधिकारी बी.डी. सूर्यवंशी, उपविभाग अभियंता दिलीप बाविस्कर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नियोजन समिती सदस्य संतोष चोथे, शिवसेना विक्रमगड विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद कदम, सभापती प्रदीप वाघ तसेच सर्व खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTrible Development Schemeआदिवासी विकास योजना