शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

७ हजार हेक्टरवरील पिके नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:53 IST

कृषी विभागाची राज्याकडे ६ कोटींची मागणी : ३० हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पुराचा फटका

पालघर : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुराने या जिल्ह्यातील सुमारे तीस हजार शेतकऱ्यांंच्या सात हजार हेक्टर लागवडीखालील कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस व त्यामुळे आलेल्या पुरामध्ये या क्षेत्रावरील भातपीक, बागायती आदीं क्षेत्र अनेक दिवस पाण्याखाली राहिल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी क्षेत्राने पूर्ण केले आहेत. नुकसानग्रस्त शेतकºयांंना भरपाई देण्यासाठी ६ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यात एकूण १ लाख ६ हजार ३६४ हेक्टर क्षेत्र हे लागवडीचे क्षेत्र असून त्यापैकी १ लाख १ हजार ००१ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे. भात पीक लागवडी साठी एकूण ७६ हजार ३८८ क्षेत्रा पैकी ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. तर ११ हजार २०५ हेक्टर क्षेत्रा पैकी ११ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रावर नागली च्या पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. ह्या प्रत्यक्ष एकूण लागवडीच्या क्षेत्रातील ७ हजार २२० हेक्टर क्षेत्रातील भातपीक, नागली व अन्य बागायती क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक के बी तरकसे यांनी लोकमत ला दिली.

जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून पंचनाम्यानुसार शेतकºयांंच्या या नुकसान भरपाईच्या मागणीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित केला असल्याचे तरकसे यांनी सांगितले. यासाठी शासनाकडे सुमारे ६ कोटींची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये कोरडवाहू भात पिकांच्या नुकसानीपोटी शेतकºयांंना ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टरी तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ८०० रु पये प्रति हेक्टरी भरपाई शेतकºयांंना मिळणार आहे. ज्या शेतकºयांंनी पिक विमा योजना चा लाभ घेतलेला आहे. अशा शेतकºयांंना पिक विमा योजनेअंतर्गत भरपाई देण्यात येणार असून पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकºयांंनाही त्यांची भरपाई नेमून दिलेल्या नुकसानीच्या प्रमाणात देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक भात पिकांचे नुकसान झाले आहे. बागायती क्षेत्राचे यामध्ये काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान वाडा तालुक्यातील असून या तालुक्यातील लागवडीखालील असलेल्या क्षेत्रापैकी ४ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. वसई तालुक्यातील १ हजार, जव्हार तालुक्यातील १ हजार, मोखाडा तालुक्यातील ७०० व पालघर विक्र मगड आधी तालुक्यांमधील २०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे.रक्कम पुढील महिन्यातया सर्व तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या क्षेत्राचे पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केलेले असून हे पंचनामे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत पुण्याच्या कृषी आयुक्तांच्या कार्यालयात पाठविण्यात आलेले आहे कृषी आयुक्त यांचा अहवाल राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला असून यासाठी जिल्ह्यात झालेल्या नुकसान भरपाईसाठी ६ कोटींची मागणी करण्यात आलेली आहे. ही रक्कम पुढील महिन्यात जिल्ह्याला मिळणे अपेक्षित आहे.