शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

७ हजार हेक्टरवरील पिके नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:53 IST

कृषी विभागाची राज्याकडे ६ कोटींची मागणी : ३० हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पुराचा फटका

पालघर : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुराने या जिल्ह्यातील सुमारे तीस हजार शेतकऱ्यांंच्या सात हजार हेक्टर लागवडीखालील कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस व त्यामुळे आलेल्या पुरामध्ये या क्षेत्रावरील भातपीक, बागायती आदीं क्षेत्र अनेक दिवस पाण्याखाली राहिल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी क्षेत्राने पूर्ण केले आहेत. नुकसानग्रस्त शेतकºयांंना भरपाई देण्यासाठी ६ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यात एकूण १ लाख ६ हजार ३६४ हेक्टर क्षेत्र हे लागवडीचे क्षेत्र असून त्यापैकी १ लाख १ हजार ००१ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे. भात पीक लागवडी साठी एकूण ७६ हजार ३८८ क्षेत्रा पैकी ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. तर ११ हजार २०५ हेक्टर क्षेत्रा पैकी ११ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रावर नागली च्या पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. ह्या प्रत्यक्ष एकूण लागवडीच्या क्षेत्रातील ७ हजार २२० हेक्टर क्षेत्रातील भातपीक, नागली व अन्य बागायती क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक के बी तरकसे यांनी लोकमत ला दिली.

जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून पंचनाम्यानुसार शेतकºयांंच्या या नुकसान भरपाईच्या मागणीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित केला असल्याचे तरकसे यांनी सांगितले. यासाठी शासनाकडे सुमारे ६ कोटींची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये कोरडवाहू भात पिकांच्या नुकसानीपोटी शेतकºयांंना ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टरी तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ८०० रु पये प्रति हेक्टरी भरपाई शेतकºयांंना मिळणार आहे. ज्या शेतकºयांंनी पिक विमा योजना चा लाभ घेतलेला आहे. अशा शेतकºयांंना पिक विमा योजनेअंतर्गत भरपाई देण्यात येणार असून पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकºयांंनाही त्यांची भरपाई नेमून दिलेल्या नुकसानीच्या प्रमाणात देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक भात पिकांचे नुकसान झाले आहे. बागायती क्षेत्राचे यामध्ये काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान वाडा तालुक्यातील असून या तालुक्यातील लागवडीखालील असलेल्या क्षेत्रापैकी ४ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. वसई तालुक्यातील १ हजार, जव्हार तालुक्यातील १ हजार, मोखाडा तालुक्यातील ७०० व पालघर विक्र मगड आधी तालुक्यांमधील २०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे.रक्कम पुढील महिन्यातया सर्व तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या क्षेत्राचे पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केलेले असून हे पंचनामे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत पुण्याच्या कृषी आयुक्तांच्या कार्यालयात पाठविण्यात आलेले आहे कृषी आयुक्त यांचा अहवाल राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला असून यासाठी जिल्ह्यात झालेल्या नुकसान भरपाईसाठी ६ कोटींची मागणी करण्यात आलेली आहे. ही रक्कम पुढील महिन्यात जिल्ह्याला मिळणे अपेक्षित आहे.