शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

पाणी असूनही डहाणूतील ३० गावपाडे तहानलेलेच

By admin | Updated: October 15, 2015 01:22 IST

पालघर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील डहाणू-बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे.

शौकत शेख, डहाणूपालघर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील डहाणू-बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. डहाणूच्या ३० गावांना तसेच खेड्यापाड्यांना रोज शुद्ध पाणी देण्याऐवजी पाच, सहा, आठ दिवसांआड अपुरा पाणीपुरवठा होतो आहे. सणासुदीच्या दिवसांत पाण्यासाठी महिलांचे हाल होत आहेत. परिणामी नागरिकांवर विहीर, हातपंपांचे दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ आल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डहाणू तालुक्याच्या साखरे धरणात पाण्याचा मुबलक साठा आहे. परंतु, या धरणावर सर्वप्रथम अधिकार असलेल्या या पंचक्रोशीतील गावे तसेच आदिवासीपाडे यांना आजही पुरेसे व वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ती तहानलेलीच आहेत. येथील सूर्या, कवडास धरणांचे पाणी मुंबई, वसई, विरार भागात रोज दिले जाते. परंतु, भूमिपुत्रांना चार, आठ दिवसांआड पाणी मिळते. डहाणूच्या सागरीकिनाऱ्यावर वसलेल्या ३० गावांना पुरेशा प्रमाणात स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने शासनाने १९९६ मध्ये बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना सुरू करून घराघरांत पिण्याचे पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली. परंतु, या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने येथील मुख्य जलवाहिनी सातत्याने फुटू लागली व येथे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. तर, २००६ मध्ये ही योजना कालबाह्य झाल्याने बाडा-पोखरण पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. परंतु, निधीअभावी सदर प्रस्ताव शासनदरबारी धूळखात पडला होता. परंतु, आमदार राजेंद्र गावित तसेच आनंद ठाकूर यांच्या प्रयत्नाला यश येऊन डहाणू आणि पालघर तालुक्यांतील आदिवासीबहुल बाडा-पोखरणसह ३० गावांच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी शासनाच्या पाणीपुरवठा तसेच स्वच्छता विभागाने नोव्हेंबर २०१३ ला मंजुरी दिली. ४३ कोटी २८ लाख ३९ हजार रुपयांच्या निधीस मान्यता देऊन हे काम एका खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आले. अनेक महिन्यांपासून कामालाही सुरुवात झाली. परंतु, कामाला गती नसल्याने हे काम वेळेवर पूर्ण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बाडा-पोखरण योजनेची जलवाहिनी वाणगाव, साखरे भागात सातत्याने फुटत असल्याने दुरुस्तीनंतर मातीमिश्रित गढूळ पाणी येत असल्याची तक्रार चिंचणी, वरोर, वाढवण, ओसार, बहाड डहाणू भागातील हजारो नागरिकांनी केली आहे.