शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

पाणी असूनही डहाणूतील ३० गावपाडे तहानलेलेच

By admin | Updated: October 15, 2015 01:22 IST

पालघर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील डहाणू-बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे.

शौकत शेख, डहाणूपालघर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील डहाणू-बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. डहाणूच्या ३० गावांना तसेच खेड्यापाड्यांना रोज शुद्ध पाणी देण्याऐवजी पाच, सहा, आठ दिवसांआड अपुरा पाणीपुरवठा होतो आहे. सणासुदीच्या दिवसांत पाण्यासाठी महिलांचे हाल होत आहेत. परिणामी नागरिकांवर विहीर, हातपंपांचे दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ आल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डहाणू तालुक्याच्या साखरे धरणात पाण्याचा मुबलक साठा आहे. परंतु, या धरणावर सर्वप्रथम अधिकार असलेल्या या पंचक्रोशीतील गावे तसेच आदिवासीपाडे यांना आजही पुरेसे व वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ती तहानलेलीच आहेत. येथील सूर्या, कवडास धरणांचे पाणी मुंबई, वसई, विरार भागात रोज दिले जाते. परंतु, भूमिपुत्रांना चार, आठ दिवसांआड पाणी मिळते. डहाणूच्या सागरीकिनाऱ्यावर वसलेल्या ३० गावांना पुरेशा प्रमाणात स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने शासनाने १९९६ मध्ये बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना सुरू करून घराघरांत पिण्याचे पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली. परंतु, या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने येथील मुख्य जलवाहिनी सातत्याने फुटू लागली व येथे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. तर, २००६ मध्ये ही योजना कालबाह्य झाल्याने बाडा-पोखरण पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. परंतु, निधीअभावी सदर प्रस्ताव शासनदरबारी धूळखात पडला होता. परंतु, आमदार राजेंद्र गावित तसेच आनंद ठाकूर यांच्या प्रयत्नाला यश येऊन डहाणू आणि पालघर तालुक्यांतील आदिवासीबहुल बाडा-पोखरणसह ३० गावांच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी शासनाच्या पाणीपुरवठा तसेच स्वच्छता विभागाने नोव्हेंबर २०१३ ला मंजुरी दिली. ४३ कोटी २८ लाख ३९ हजार रुपयांच्या निधीस मान्यता देऊन हे काम एका खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आले. अनेक महिन्यांपासून कामालाही सुरुवात झाली. परंतु, कामाला गती नसल्याने हे काम वेळेवर पूर्ण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बाडा-पोखरण योजनेची जलवाहिनी वाणगाव, साखरे भागात सातत्याने फुटत असल्याने दुरुस्तीनंतर मातीमिश्रित गढूळ पाणी येत असल्याची तक्रार चिंचणी, वरोर, वाढवण, ओसार, बहाड डहाणू भागातील हजारो नागरिकांनी केली आहे.