शहरं
Join us  
Trending Stories
1
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
2
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
3
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
4
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
5
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
6
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
8
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
9
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
10
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
11
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
12
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
13
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
14
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
15
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
16
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
17
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

नायगाव-खोचिवडेकरांची वणवण

By admin | Updated: April 27, 2017 23:46 IST

नायगाव खोचिवडे परिसरातील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. पाणी पुरवठा योजनेतून पाणी साठयासाठी उभारलेल्या जलकुंभालाही

विरार : नायगाव खोचिवडे परिसरातील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. पाणी पुरवठा योजनेतून पाणी साठयासाठी उभारलेल्या जलकुंभालाही पाण्याची प्रतिक्षा करावी लागते आहे.पाणी पुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेल्या जलकुंभांची अवस्था देखभाल दुरूस्तीविना दयनिय झाली आहे.शिवाय त्याला भेगाही पडल्या आहेत. त्यात योजनाच कार्यान्वीत न झाल्यामुुळे स्थानिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.या गावातील सोसायट्यां टँकरमार्फत पाणी मिळवून आपली तहान भागवत आहेत. मात्र, ग्रामस्थांनी रस्त्यावर, मुख्य वहिवाटीवर ओटे, पायऱ्या बांधून दगड मांडल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी टँकरचे पाणीही ग्रामस्थांच्या नशीबी राहिलेले नाही.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ६९ गावांसाठी असलेल्या पाणी योजनेत खोचिवडे गावाचा समावेश करण्यात आला होता.त्यानुसार काही वर्षांपूर्वी जलकुंभही उभारण्यात आले होते.मात्र,तेंव्हापासून जलकुंभालाच पाणी मिळाले नसल्यामुळे ते आता भेगाळलेल्या अवस्थेत पाण्याची वाट पाहत उभे आहे.या योजनेच्या जलवाहिन्याही धूळ खात पडल्या आहेत. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय असलेली मासेमारीही मासळीच्या तुटवड्यामुळे धोक्यात आली आहे.त्यामुळे या व्यवसायाबरोबरच छोट्या-मोठ्या नोकऱ्या करून मच्छिमार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित आहेत.पाण्याच्या टंचाईमुळे नोकरी करावी की पाण्याचा शोध घ्यावा.असा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा राहिला आहे. त्यामुळे दरवर्षी उद्भवणाऱ्या या पाणी संकटावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय वैती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.(वार्ताहर)