शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
4
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
5
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
6
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
7
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
8
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
9
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
10
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
11
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
12
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
14
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
15
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
16
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
17
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
18
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
19
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
20
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की

नायगाव-खोचिवडेकरांची वणवण

By admin | Updated: April 27, 2017 23:46 IST

नायगाव खोचिवडे परिसरातील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. पाणी पुरवठा योजनेतून पाणी साठयासाठी उभारलेल्या जलकुंभालाही

विरार : नायगाव खोचिवडे परिसरातील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. पाणी पुरवठा योजनेतून पाणी साठयासाठी उभारलेल्या जलकुंभालाही पाण्याची प्रतिक्षा करावी लागते आहे.पाणी पुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेल्या जलकुंभांची अवस्था देखभाल दुरूस्तीविना दयनिय झाली आहे.शिवाय त्याला भेगाही पडल्या आहेत. त्यात योजनाच कार्यान्वीत न झाल्यामुुळे स्थानिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.या गावातील सोसायट्यां टँकरमार्फत पाणी मिळवून आपली तहान भागवत आहेत. मात्र, ग्रामस्थांनी रस्त्यावर, मुख्य वहिवाटीवर ओटे, पायऱ्या बांधून दगड मांडल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी टँकरचे पाणीही ग्रामस्थांच्या नशीबी राहिलेले नाही.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ६९ गावांसाठी असलेल्या पाणी योजनेत खोचिवडे गावाचा समावेश करण्यात आला होता.त्यानुसार काही वर्षांपूर्वी जलकुंभही उभारण्यात आले होते.मात्र,तेंव्हापासून जलकुंभालाच पाणी मिळाले नसल्यामुळे ते आता भेगाळलेल्या अवस्थेत पाण्याची वाट पाहत उभे आहे.या योजनेच्या जलवाहिन्याही धूळ खात पडल्या आहेत. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय असलेली मासेमारीही मासळीच्या तुटवड्यामुळे धोक्यात आली आहे.त्यामुळे या व्यवसायाबरोबरच छोट्या-मोठ्या नोकऱ्या करून मच्छिमार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित आहेत.पाण्याच्या टंचाईमुळे नोकरी करावी की पाण्याचा शोध घ्यावा.असा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा राहिला आहे. त्यामुळे दरवर्षी उद्भवणाऱ्या या पाणी संकटावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय वैती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.(वार्ताहर)