शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव-खोचिवडेकरांची वणवण

By admin | Updated: April 27, 2017 23:46 IST

नायगाव खोचिवडे परिसरातील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. पाणी पुरवठा योजनेतून पाणी साठयासाठी उभारलेल्या जलकुंभालाही

विरार : नायगाव खोचिवडे परिसरातील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. पाणी पुरवठा योजनेतून पाणी साठयासाठी उभारलेल्या जलकुंभालाही पाण्याची प्रतिक्षा करावी लागते आहे.पाणी पुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेल्या जलकुंभांची अवस्था देखभाल दुरूस्तीविना दयनिय झाली आहे.शिवाय त्याला भेगाही पडल्या आहेत. त्यात योजनाच कार्यान्वीत न झाल्यामुुळे स्थानिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.या गावातील सोसायट्यां टँकरमार्फत पाणी मिळवून आपली तहान भागवत आहेत. मात्र, ग्रामस्थांनी रस्त्यावर, मुख्य वहिवाटीवर ओटे, पायऱ्या बांधून दगड मांडल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी टँकरचे पाणीही ग्रामस्थांच्या नशीबी राहिलेले नाही.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ६९ गावांसाठी असलेल्या पाणी योजनेत खोचिवडे गावाचा समावेश करण्यात आला होता.त्यानुसार काही वर्षांपूर्वी जलकुंभही उभारण्यात आले होते.मात्र,तेंव्हापासून जलकुंभालाच पाणी मिळाले नसल्यामुळे ते आता भेगाळलेल्या अवस्थेत पाण्याची वाट पाहत उभे आहे.या योजनेच्या जलवाहिन्याही धूळ खात पडल्या आहेत. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय असलेली मासेमारीही मासळीच्या तुटवड्यामुळे धोक्यात आली आहे.त्यामुळे या व्यवसायाबरोबरच छोट्या-मोठ्या नोकऱ्या करून मच्छिमार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित आहेत.पाण्याच्या टंचाईमुळे नोकरी करावी की पाण्याचा शोध घ्यावा.असा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा राहिला आहे. त्यामुळे दरवर्षी उद्भवणाऱ्या या पाणी संकटावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय वैती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.(वार्ताहर)