शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

ऐन मार्चमध्ये वसई-विरारला वाढली पाणी टँकरची मागणी! दरातही झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 23:48 IST

बहुतांश ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा

प्रतीक ठाकूरविरार : मार्च महिना अर्धा संपत नाही तोच वसई-विरारच्या शहरी भागांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. परिणामी टँकरने पाणी विकत घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याने टँकरची मागणी आणि त्याच्या दरातही वाढ झाली आहे.

वसई-विरार शहरातील नागरिकांना पालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो; परंतु काही ठिकाणच्या भागात पालिकेतर्फे पुरविले जाणारे पाणी अपुऱ्या प्रमाणात येत आहे, तर काही भागांत अजूनही पाणी उपलब्ध झालेले नाही. येथील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी टँकरची मागणी वाढत आहे.

वसई-विरार शहरात एक हजारांहून अधिक टँकर आहेत. हे टँकर विरार पूर्व-पश्चिम, नालासोपारा पूर्व, वसई पूर्व, नायगाव यासह विविध ठिकाणच्या भागात पाणीपुरवठा करतात. जेथे एका टँकरची गरज होती त्या ठिकाणी दोन टँकर मागवावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. जे टँकर १ हजार २०० रुपयांना मिळत होते; तेच टँकर आता १५०० ते १७०० रुपयाने विकले जाऊ लागले आहेत. काही ठिकाणी दोन हजारांहून अधिक रक्कम त्यासाठी मोजावी लागत आहे. जेथे पाणी उपसा होतो; अशा ठिकाणच्या विहिरी व बोअरवेल यांची भूजल पातळी खालावली आहे. आधीच कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने जे पाणी विक्री करतात; तेथे पाण्याचे दर वाढतात. त्यामुळे टँकरचे दरही वाढले असल्याचे टँकरमालकांनी सांगितले.

ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करा !महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८९ मधील कामण, चिंचोटी, देवदल, गिदराई (सातिवली) या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गिदराईपाडा येथील ग्रामस्थांनी नळकनेक्शनसाठी पैसे भरूनही नळकनेक्शन दिले जात नाही. कामण दलित वस्ती योजना एक वर्षापासून बंद आहे. येथील लघुपाटबंधारे (ग्रामपंचायत काळातील) पाणीपुरवठा योजना बंद आहे. कामण, चिंचोटी, देवदळ येथे दोन महिन्यांपासून रस्ते खोदून जलवाहिनी टाकली आहे. परंतु पाणीपुरवठा केला जात नाही. पालिकेने येथील पाणीप्रश्न मार्गी लावा; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी पालिकेला दिला आहे.

टॅग्स :Waterपाणी