शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

रसिलाच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी

By admin | Updated: August 30, 2015 21:36 IST

तालुक्यातील साकूर येथील जव्हार आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत असलेल्या शासकीय मुलींच्या निवासी आश्रमशाळेतील रसिला तेलंग या इयत्ता चौथींत

जव्हार : तालुक्यातील साकूर येथील जव्हार आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत असलेल्या शासकीय मुलींच्या निवासी आश्रमशाळेतील रसिला तेलंग या इयत्ता चौथींत शिकणाऱ्या विद्यार्थिंनीच्या २८ जुलै रोजी झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा श्रमजिवी संघटनेकडून देण्यात आला आहे.संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रिंजड यांनी रविवारी पदाधिकाऱ्यांसह साकूर आश्रमशाळेला भेट देऊन तिच्या पालकांची भेट घेतली. त्यावेळी आदिवासी विकास मंत्र्यांच्याच मतदारसंघात आदिवासी विद्यार्थिनीचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला हे माहीत असूनही, विष्णू सवरा यांनी ‘प्रशासनाने रसिला हिस रुग्णालयात नेले होते. परंतु उपचरादरम्यान तिचा मृत्यू झाला. यात प्रशासनाची चूक नाही. तरीही चौकशी करून दोषींवर कारवाई करू’ असे उत्तर देणे संतापजनक आहे, असे ते म्हणाले. घटना घडली तेव्हा सहायक प्रकल्प अधिकारी गुजर हे रजेवर होते, दुसरे सहायक प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे हे ट्रेनिंगसाठी पुण्याला गेल्याचे सलामे यांनी सांगितले. यामुळे कार्यालयात प्रमुख असलेले पी.बी. देसाई हे रसिलाची प्रकृती चिंताजनक असतांनाही जव्हार येथेच होते. त्यांनी वेळीच उपचारासाठी प्रयत्न केले असते तर रसिलाचा जीव वाचला असता असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. देसाई यांनी हलगर्जीपणा केला म्हणून त्यांच्यावर जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही. तोपर्यंत जव्हार कार्यालयासमोर श्रमजिवी संघटनेतर्फे आंदोलन केले जाणार असल्याचे सांगितले. आश्रमशाळा पुरेसे अधिकारी आणि कर्मचार नसल्याने असे मृत्यू घडतात असे ते म्हणाले. (वार्ताहर)