शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

रेल्वे पुलासाठी सेनेचे भीक मांगो; विरोधी पक्षनेत्या किरण चेंदवणकर यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:05 IST

वसई पूर्व -पश्चिम भागाला जोडणाऱ्या येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाण पुलाच्या करोडो रुपयांच्या निधीसाठी आणि हा पूल तत्काळ दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी येथे शुक्रवारी सकाळी शिवसेनेने भीक मांगो आंदोलन केले.

वसई : वसई पूर्व -पश्चिम भागाला जोडणाऱ्या येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाण पुलाच्या करोडो रुपयांच्या निधीसाठी आणि हा पूल तत्काळ दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी येथे शुक्रवारी सकाळी शिवसेनेने भीक मांगो आंदोलन केले.यावेळी शेकडो शिवसैनिकांनी आपल्या नेते मंडळीसहीत रस्त्यावरील पादचारी व वाहनचालकांकडे भीक मागितली आणि संबंधित प्रशासनांच्या प्रति निषेध व्यक्त करीत जो पर्यंत संपूर्ण निधी जमा होत नाही तोपर्यंत शिवसेना या निधीसाठी रस्त्यावर भीक मांगो आंदोलन सुरूच ठेवेल, असा निर्धार महापालिकेतील सेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी व्यक्त केला.दरम्यान अंधेरी पुलाच्या भीषण दुर्घटनेनंतर वसई अंबाडी स्थित रेल्वे पूल हा दुरु स्तीच्या नावाखाली दोन महिन्यापूर्वी बंद करण्यात आला, त्यामुळे याठिकाणी आता वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावे लागत आहे. परिणामी दोन महिने उलटले तरीही अद्याप रेल्वे आणि इतर जबाबदार यंत्रणांकडून या पुलाच्या डागडुजीबाबत कुठलीही हालचाल होत नाही.या पुलाच्या दुरु स्तीसाठी १ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे मात्र हा निधी उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासन ,सार्वजनिक बांधकाम विभाग, एम एम आर डी .ए आणि वसई विरार शहर महापालिका या सर्व यंत्रणांनी नकार दिला आहे, यामुळे ही दुरु स्ती नेमकी कोण करणार याबाबत वसईत सर्वत्र संभ्रम निर्माण झाला असल्याने या पुलाच्या डागडुजीसाठी अनोखं भीक मांगो करण्यात आले, यावेळी विनायक निकम, निलेश तेंडुलकर ,प्रवीण म्हाप्रळकर ,मिलिंद खानोलकर ,विवेक पाटील तसेच शेकडो शिवसैनिक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते. माणिकपूर पोलिसांनी याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडलें. परंतु दरम्यान दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा तासंन्तास लागल्या होत्या.गैरसोय झाली तरी कुणीतरी या स्वरुपात का असेना या प्रश्नावर आवाज उठवला याबद्दल जनतेते काहीसे समाधान व्यक्त केले जात होते.वाहतूककोंडी वाढलीजुलै महिन्यात अनिश्चित कालावधीसाठी हा पूल बंद करण्यात येत असल्याबाबत रेल्वे प्रशासनाने माणिकपूर पोलीस ठाण्याला कळवले होते.नवीन पुलावर मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.कारण या दोंन्ही उड्डाणपूलांच्या तोंडावर पूर्व व पश्चिम येथे सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. आता या पुलाच्या डागडुगीचा खर्च कोटीच्या घरात आहे. तो कोण उचलणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण महापालिकेने याबाबत हात आखडता घेतला आहे.

दुरुस्तीचा १.४० कोटी खर्च करायचा कोणी? यावरून माजला आहे वादंगनालासोपारा : वसईतील ३८ वर्षे जुना अंबाडी रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीस धोकादायक झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे.मात्र अजुनही या पुलाच्या डागडुजीस मुहूर्त सापडत नसल्यामुळे या पुलाशेजारील नवीन उड्डाणपूलावर ट्रॅफिक जाम होऊ लागला आहे.याचा मोठा फटका या मार्गावरून प्रवास करणा-या नागरिकांना बसतो आहे. या पुलाच्या डागडुजीसाठी १ कोटी ४० लाखाचा खर्च आहे.अंधेरी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर वसईतील अंबाडी पूल धोकादायक असल्याचे लक्षात आल्यामुळे रेल्वे प्रशासनाने तो जुलै महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून अनिश्चित कालावधीसाठी बंद केला होता. या उड्डाणपूलाचे संरक्षण कठडे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत.त्यावरून अनेक केबल्स, पाईप नेण्यात आलेले आहेत. डांबरीकरणामुळे ६ इंच जाडीचा थर या पुलावर जमा झाला आहे.त्यामुळे त्यावर अतिरिक्त भार पडत होता. अवजड वाहने जात असताना तो हादरत असल्यामुळे लोक जीव मुठीत घेऊन त्यावरून ये-जा करीत असत. मात्र सुदैवाने गेल्या वर्षी या पूलाशेजारी दुसरा पूल उभारल्याने या पूलावरील अतिरिक्त वाहतुकीचा भार कमी झाला होता.या पूलाची डागडुजी रेल्वे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे अपेक्षित असतांना या पूलाकडे अनेक वर्ष दुर्लक्ष केले गेले होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार