शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

रेल्वे पुलासाठी सेनेचे भीक मांगो; विरोधी पक्षनेत्या किरण चेंदवणकर यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:05 IST

वसई पूर्व -पश्चिम भागाला जोडणाऱ्या येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाण पुलाच्या करोडो रुपयांच्या निधीसाठी आणि हा पूल तत्काळ दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी येथे शुक्रवारी सकाळी शिवसेनेने भीक मांगो आंदोलन केले.

वसई : वसई पूर्व -पश्चिम भागाला जोडणाऱ्या येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाण पुलाच्या करोडो रुपयांच्या निधीसाठी आणि हा पूल तत्काळ दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी येथे शुक्रवारी सकाळी शिवसेनेने भीक मांगो आंदोलन केले.यावेळी शेकडो शिवसैनिकांनी आपल्या नेते मंडळीसहीत रस्त्यावरील पादचारी व वाहनचालकांकडे भीक मागितली आणि संबंधित प्रशासनांच्या प्रति निषेध व्यक्त करीत जो पर्यंत संपूर्ण निधी जमा होत नाही तोपर्यंत शिवसेना या निधीसाठी रस्त्यावर भीक मांगो आंदोलन सुरूच ठेवेल, असा निर्धार महापालिकेतील सेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी व्यक्त केला.दरम्यान अंधेरी पुलाच्या भीषण दुर्घटनेनंतर वसई अंबाडी स्थित रेल्वे पूल हा दुरु स्तीच्या नावाखाली दोन महिन्यापूर्वी बंद करण्यात आला, त्यामुळे याठिकाणी आता वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावे लागत आहे. परिणामी दोन महिने उलटले तरीही अद्याप रेल्वे आणि इतर जबाबदार यंत्रणांकडून या पुलाच्या डागडुजीबाबत कुठलीही हालचाल होत नाही.या पुलाच्या दुरु स्तीसाठी १ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे मात्र हा निधी उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासन ,सार्वजनिक बांधकाम विभाग, एम एम आर डी .ए आणि वसई विरार शहर महापालिका या सर्व यंत्रणांनी नकार दिला आहे, यामुळे ही दुरु स्ती नेमकी कोण करणार याबाबत वसईत सर्वत्र संभ्रम निर्माण झाला असल्याने या पुलाच्या डागडुजीसाठी अनोखं भीक मांगो करण्यात आले, यावेळी विनायक निकम, निलेश तेंडुलकर ,प्रवीण म्हाप्रळकर ,मिलिंद खानोलकर ,विवेक पाटील तसेच शेकडो शिवसैनिक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते. माणिकपूर पोलिसांनी याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडलें. परंतु दरम्यान दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा तासंन्तास लागल्या होत्या.गैरसोय झाली तरी कुणीतरी या स्वरुपात का असेना या प्रश्नावर आवाज उठवला याबद्दल जनतेते काहीसे समाधान व्यक्त केले जात होते.वाहतूककोंडी वाढलीजुलै महिन्यात अनिश्चित कालावधीसाठी हा पूल बंद करण्यात येत असल्याबाबत रेल्वे प्रशासनाने माणिकपूर पोलीस ठाण्याला कळवले होते.नवीन पुलावर मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.कारण या दोंन्ही उड्डाणपूलांच्या तोंडावर पूर्व व पश्चिम येथे सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. आता या पुलाच्या डागडुगीचा खर्च कोटीच्या घरात आहे. तो कोण उचलणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण महापालिकेने याबाबत हात आखडता घेतला आहे.

दुरुस्तीचा १.४० कोटी खर्च करायचा कोणी? यावरून माजला आहे वादंगनालासोपारा : वसईतील ३८ वर्षे जुना अंबाडी रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीस धोकादायक झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे.मात्र अजुनही या पुलाच्या डागडुजीस मुहूर्त सापडत नसल्यामुळे या पुलाशेजारील नवीन उड्डाणपूलावर ट्रॅफिक जाम होऊ लागला आहे.याचा मोठा फटका या मार्गावरून प्रवास करणा-या नागरिकांना बसतो आहे. या पुलाच्या डागडुजीसाठी १ कोटी ४० लाखाचा खर्च आहे.अंधेरी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर वसईतील अंबाडी पूल धोकादायक असल्याचे लक्षात आल्यामुळे रेल्वे प्रशासनाने तो जुलै महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून अनिश्चित कालावधीसाठी बंद केला होता. या उड्डाणपूलाचे संरक्षण कठडे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत.त्यावरून अनेक केबल्स, पाईप नेण्यात आलेले आहेत. डांबरीकरणामुळे ६ इंच जाडीचा थर या पुलावर जमा झाला आहे.त्यामुळे त्यावर अतिरिक्त भार पडत होता. अवजड वाहने जात असताना तो हादरत असल्यामुळे लोक जीव मुठीत घेऊन त्यावरून ये-जा करीत असत. मात्र सुदैवाने गेल्या वर्षी या पूलाशेजारी दुसरा पूल उभारल्याने या पूलावरील अतिरिक्त वाहतुकीचा भार कमी झाला होता.या पूलाची डागडुजी रेल्वे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे अपेक्षित असतांना या पूलाकडे अनेक वर्ष दुर्लक्ष केले गेले होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार