शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

बिगर आदिवासी उभारणार निर्णायक लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:27 IST

वाडा : ९ जून २०१४ रोजी तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी काढलेल्या अध्यादेशानुसार महाराष्ट्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्रात येणाऱ्या ...

वाडा : ९ जून २०१४ रोजी तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी काढलेल्या अध्यादेशानुसार महाराष्ट्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्रात येणाऱ्या १३ जिल्ह्यात गांव पातळीवर काम करणाºया वर्ग ३ व वर्ग ४ च्या विविध पदांसाठी आदिवासी समाजाला नोक-यांमध्ये १०० टक्के आरक्षण देण्यात आले.

भारतीय घटनेच्या कोणत्याही कलम अथवा निकषामध्ये न बसणा-या या अद्यादेशामुळे १३ जिल्ह्यातील बिगर आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला आहे, त्याविरोधात २०१४ पासून बिगर आदिवासी समाज न्यायालयीन तसेच रस्त्यावरील लढाई लढत आहे, परंतु शासनाकडून बिगर आदिवासी समाजाला शासनाने कोणताही दिलासा दिलेला नाही. शासन विविध निर्णय घेऊन सन २०१४ ते २०१८ या कालावधीत आदिवासी समाजासाठी १०० टक्के आरक्षीत केलेल्या १८ पदांच्या भरतीसाठी व सद्यस्थितीत या जिल्ह्यात काम करीत असलेल्या बिगर आदिवासी कर्मचाºयांच्या बदल्यासाठी जाहिराती व शासन निर्णय प्रसिद्ध करीत आहे. शासनाच्या अध्यादेशाविरोधात बिगर आदिवासींचा लढा सुरु असताना दि. २७ आॅगस्ट २०१८ रोजी ज्या अनूसूचित क्षेत्रात बिगर आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा जास्त आहे अशा क्षेत्रातील १०० टक्के रिक्त पदे स्थानिक अनूसूचित जमातीतील उमेदवारांमधूनच भरण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी विविध खात्यांच्या १० सचिवांची समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या समितीने तीन महिन्याच्या आत आपला अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु हा पुनर्विचार समितीचा निर्णय म्हणजे शासनाने केलेला एक फार्स ठरला. कारण अशा प्रकारचा कुठलाही सर्व्हे झाल्याचे दिसले नाही. उलट एकीकडे बिगर आदिवासी समाजाला पुर्न विचाराचे गाजर दाखविण्यात आले व दुसºया बाजूला भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या गेल्यात. कर्मचाºयांचे बदल्यांचे विकल्प भरण्यास सुरवात केली आहे. शासनाच्या या दुटप्पी धोरणा विरोधात बिगर आदिवासी समाजामध्ये संताप उसळला आहे.अन्यायाच्या विरोधात उभारणार आता निर्णायक लढाया अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात निर्णायक लढा उभारण्याची बिगर आदिवासी समाजात भावना तयार झाली आहे. या आधी ही गेल्या चार वर्षामध्ये ठाणे, पालघर जिल्ह्यात बिगर आदिवासी समाजाने मोर्चे, धरणे, उपोषणे, मुंडण आदी आंदोलने केली आहेत. शिवाय न्यायालयीन लढाही तो सध्या देत आहे.