शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

बिगर आदिवासी उभारणार निर्णायक लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:27 IST

वाडा : ९ जून २०१४ रोजी तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी काढलेल्या अध्यादेशानुसार महाराष्ट्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्रात येणाऱ्या ...

वाडा : ९ जून २०१४ रोजी तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी काढलेल्या अध्यादेशानुसार महाराष्ट्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्रात येणाऱ्या १३ जिल्ह्यात गांव पातळीवर काम करणाºया वर्ग ३ व वर्ग ४ च्या विविध पदांसाठी आदिवासी समाजाला नोक-यांमध्ये १०० टक्के आरक्षण देण्यात आले.

भारतीय घटनेच्या कोणत्याही कलम अथवा निकषामध्ये न बसणा-या या अद्यादेशामुळे १३ जिल्ह्यातील बिगर आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला आहे, त्याविरोधात २०१४ पासून बिगर आदिवासी समाज न्यायालयीन तसेच रस्त्यावरील लढाई लढत आहे, परंतु शासनाकडून बिगर आदिवासी समाजाला शासनाने कोणताही दिलासा दिलेला नाही. शासन विविध निर्णय घेऊन सन २०१४ ते २०१८ या कालावधीत आदिवासी समाजासाठी १०० टक्के आरक्षीत केलेल्या १८ पदांच्या भरतीसाठी व सद्यस्थितीत या जिल्ह्यात काम करीत असलेल्या बिगर आदिवासी कर्मचाºयांच्या बदल्यासाठी जाहिराती व शासन निर्णय प्रसिद्ध करीत आहे. शासनाच्या अध्यादेशाविरोधात बिगर आदिवासींचा लढा सुरु असताना दि. २७ आॅगस्ट २०१८ रोजी ज्या अनूसूचित क्षेत्रात बिगर आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा जास्त आहे अशा क्षेत्रातील १०० टक्के रिक्त पदे स्थानिक अनूसूचित जमातीतील उमेदवारांमधूनच भरण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी विविध खात्यांच्या १० सचिवांची समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या समितीने तीन महिन्याच्या आत आपला अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु हा पुनर्विचार समितीचा निर्णय म्हणजे शासनाने केलेला एक फार्स ठरला. कारण अशा प्रकारचा कुठलाही सर्व्हे झाल्याचे दिसले नाही. उलट एकीकडे बिगर आदिवासी समाजाला पुर्न विचाराचे गाजर दाखविण्यात आले व दुसºया बाजूला भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या गेल्यात. कर्मचाºयांचे बदल्यांचे विकल्प भरण्यास सुरवात केली आहे. शासनाच्या या दुटप्पी धोरणा विरोधात बिगर आदिवासी समाजामध्ये संताप उसळला आहे.अन्यायाच्या विरोधात उभारणार आता निर्णायक लढाया अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात निर्णायक लढा उभारण्याची बिगर आदिवासी समाजात भावना तयार झाली आहे. या आधी ही गेल्या चार वर्षामध्ये ठाणे, पालघर जिल्ह्यात बिगर आदिवासी समाजाने मोर्चे, धरणे, उपोषणे, मुंडण आदी आंदोलने केली आहेत. शिवाय न्यायालयीन लढाही तो सध्या देत आहे.