शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

दलालांना माल न विकण्याचा निर्णय

By admin | Updated: February 26, 2017 02:28 IST

दलालांकडून शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने २०० शेतकऱ्यांनी बाडापोखरण वासगाव येथे सभा घेऊन दलालांना माल न देण्याचा निर्णय घेतला.

- शौकत शेख,  डहाणू

दलालांकडून शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने २०० शेतकऱ्यांनी बाडापोखरण वासगाव येथे सभा घेऊन दलालांना माल न देण्याचा निर्णय घेतला. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळला आहे. डहाणूतील वरोर, वाढवण, बाडापोखरण, तिडयाळे, ऐना, रणकोळ, कासा, सायवन, वानगाव, खंबाळे, आसनगाव, चंडीगाव, धूमकेत, अभ्राण, बावडा वाणगाव, कोलवली आदी भागातील शेतकरी भोपळा, भेंडी, मिरची, वांगी, कोथिंबीर, दुधी आदीचे उत्पादन घेतात. मात्र त्याला रास्त भाव मिळत नसून दलालांकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते आहे. मिरचिला मुंबईला २८ रु पये प्रतिकिलो भाव मिळत असतांना दलाल मात्र शेतकऱ्यांकडून ती केवळ १८ रुपये किलोने खरेदी करीत आहेत. त्यामुळे शुक्रवारी शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. त्यामुळे दलालांकडून जोपर्यंत शेतमालाला रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत त्यांना माल विकायचा नाही असे शेतकऱ्यांनी ठरविले आहे. डहाणू तालुक्यातील जंगलपट्टी तसेच बंदरपट्टी भागातील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य पिक असून पावसाच्या लहरीपणामुळे गेली काही वर्षे भातपिक घेण्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. तसेच त्याला तालुक्याबाहेर विशेष भावही मिळत नसल्याने खर्च झालेले पैसेही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळाला आहे. हा भाजीपाला दलाल डहाणू, बोईसर, चिंचणी यांसारख्या बागायतीतून मातीमोल दराने खरेदी करु न तो जास्त किमतींना बाजारात विकत आहेत. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे डहाणूच्या दुर्गम भागातील शेकडो गावातील हजारो लोकांना मिरची खुडणे, गोण्या भरणे त्या ट्रकमध्ये चढविणे इत्यादि रोजगार मिळतो. तो आता बंद होण्याची शक्यता आहे.