शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

दलालांना माल न विकण्याचा निर्णय

By admin | Updated: February 26, 2017 02:28 IST

दलालांकडून शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने २०० शेतकऱ्यांनी बाडापोखरण वासगाव येथे सभा घेऊन दलालांना माल न देण्याचा निर्णय घेतला.

- शौकत शेख,  डहाणू

दलालांकडून शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने २०० शेतकऱ्यांनी बाडापोखरण वासगाव येथे सभा घेऊन दलालांना माल न देण्याचा निर्णय घेतला. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळला आहे. डहाणूतील वरोर, वाढवण, बाडापोखरण, तिडयाळे, ऐना, रणकोळ, कासा, सायवन, वानगाव, खंबाळे, आसनगाव, चंडीगाव, धूमकेत, अभ्राण, बावडा वाणगाव, कोलवली आदी भागातील शेतकरी भोपळा, भेंडी, मिरची, वांगी, कोथिंबीर, दुधी आदीचे उत्पादन घेतात. मात्र त्याला रास्त भाव मिळत नसून दलालांकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते आहे. मिरचिला मुंबईला २८ रु पये प्रतिकिलो भाव मिळत असतांना दलाल मात्र शेतकऱ्यांकडून ती केवळ १८ रुपये किलोने खरेदी करीत आहेत. त्यामुळे शुक्रवारी शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. त्यामुळे दलालांकडून जोपर्यंत शेतमालाला रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत त्यांना माल विकायचा नाही असे शेतकऱ्यांनी ठरविले आहे. डहाणू तालुक्यातील जंगलपट्टी तसेच बंदरपट्टी भागातील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य पिक असून पावसाच्या लहरीपणामुळे गेली काही वर्षे भातपिक घेण्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. तसेच त्याला तालुक्याबाहेर विशेष भावही मिळत नसल्याने खर्च झालेले पैसेही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळाला आहे. हा भाजीपाला दलाल डहाणू, बोईसर, चिंचणी यांसारख्या बागायतीतून मातीमोल दराने खरेदी करु न तो जास्त किमतींना बाजारात विकत आहेत. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे डहाणूच्या दुर्गम भागातील शेकडो गावातील हजारो लोकांना मिरची खुडणे, गोण्या भरणे त्या ट्रकमध्ये चढविणे इत्यादि रोजगार मिळतो. तो आता बंद होण्याची शक्यता आहे.