शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

दलालांना माल न विकण्याचा निर्णय

By admin | Updated: February 26, 2017 02:28 IST

दलालांकडून शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने २०० शेतकऱ्यांनी बाडापोखरण वासगाव येथे सभा घेऊन दलालांना माल न देण्याचा निर्णय घेतला.

- शौकत शेख,  डहाणू

दलालांकडून शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने २०० शेतकऱ्यांनी बाडापोखरण वासगाव येथे सभा घेऊन दलालांना माल न देण्याचा निर्णय घेतला. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळला आहे. डहाणूतील वरोर, वाढवण, बाडापोखरण, तिडयाळे, ऐना, रणकोळ, कासा, सायवन, वानगाव, खंबाळे, आसनगाव, चंडीगाव, धूमकेत, अभ्राण, बावडा वाणगाव, कोलवली आदी भागातील शेतकरी भोपळा, भेंडी, मिरची, वांगी, कोथिंबीर, दुधी आदीचे उत्पादन घेतात. मात्र त्याला रास्त भाव मिळत नसून दलालांकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते आहे. मिरचिला मुंबईला २८ रु पये प्रतिकिलो भाव मिळत असतांना दलाल मात्र शेतकऱ्यांकडून ती केवळ १८ रुपये किलोने खरेदी करीत आहेत. त्यामुळे शुक्रवारी शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. त्यामुळे दलालांकडून जोपर्यंत शेतमालाला रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत त्यांना माल विकायचा नाही असे शेतकऱ्यांनी ठरविले आहे. डहाणू तालुक्यातील जंगलपट्टी तसेच बंदरपट्टी भागातील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य पिक असून पावसाच्या लहरीपणामुळे गेली काही वर्षे भातपिक घेण्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. तसेच त्याला तालुक्याबाहेर विशेष भावही मिळत नसल्याने खर्च झालेले पैसेही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळाला आहे. हा भाजीपाला दलाल डहाणू, बोईसर, चिंचणी यांसारख्या बागायतीतून मातीमोल दराने खरेदी करु न तो जास्त किमतींना बाजारात विकत आहेत. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे डहाणूच्या दुर्गम भागातील शेकडो गावातील हजारो लोकांना मिरची खुडणे, गोण्या भरणे त्या ट्रकमध्ये चढविणे इत्यादि रोजगार मिळतो. तो आता बंद होण्याची शक्यता आहे.