शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरमध्येच नद्या पडू लागल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:39 IST

या वर्षी दोन महिने अगोदरच पावसाने दडी मारल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट होताना दिसत आहे.

- वसंत भोईरवाडा : या वर्षी दोन महिने अगोदरच पावसाने दडी मारल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट होताना दिसत आहे. तालुक्यातील नद्या तर आत्ताच कोरड्या पडू लागल्याने टंचाई फेब्रुवारी महिन्यापासून जाणवणार आहे. विविध कंपन्या व वीटभट्यांचा पाणीपुरवठा बंद करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.तालुक्याला तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी या पाच नद्यांमुळे मुबलक पाणी साठा असूनही नियोजना आभावी तुटवडा जाणवतो. तालुक्यात १६८ गावे व पाचशेहून अधिक पाडे आहेत. त्यामुळे या समस्येने उग्र रूप धारण करीत आहे. येथील रोलिंग मिल्स, शीतपेये बनवणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. त्यामुळे पाण्याचा उपसाही मोठ्या प्रमाणात होत आहे. हेही पाणी कमी पडते म्हणून खासगी कुपनलिकेतील पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे पातळीतही घट होत आहे. पूर्वी कुपनलिकेला ३०० फुटांवर पाणी लागायचे आता ५०० फुटांपर्यत खोदकाम करावे लागते. त्यावरुन पाण्याच्या पातळीची कल्पना करता येईल. तालुक्यात रोलिंग मिल्स मोठ्या संख्येने आहेत. त्यातच शीतपेये बनवणाºया कंपन्याही आहेत. त्यांना रोज हजारो लीटर पाणी लागते. त्यातच कंपन्यांनी कारखान्यात सुद्धा कुपनलिका मारल्या आहेत. ते पाणी कमी पडल्यानंतर टॅकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे गावोगावी टॅकरने पाणीपुरवठा करण्याचा व्यवसाय तेजीत आहे. यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.>पाच नद्यांवर प्रत्येकी दहा किमी अंतरावर बंधारे बांधले असते तर शेतकºयांबरोबर कारखानदारांचाही पाण्याच्या प्रश्न सुटला असता. या पाणी टंचाईमुळे शेतकºयांचेही मोठे नुकसान होत आहे.- प्रा.धनंजय पष्टे, सामाजिक कार्यकर्ते>कुडूस परिसरात लोहोपे येथे विस्तीर्ण बंधारा आहे. या बंधाºयातील गाळ काढल्यास अधिक पाणी साठा होऊन आजुबाजुच्या दहा पंधरा गावातील गावकरी, शेती व उद्योगांचा प्रश्न सुटू शकतो.- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते