शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

डिसेंबरमध्येच नद्या पडू लागल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:39 IST

या वर्षी दोन महिने अगोदरच पावसाने दडी मारल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट होताना दिसत आहे.

- वसंत भोईरवाडा : या वर्षी दोन महिने अगोदरच पावसाने दडी मारल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट होताना दिसत आहे. तालुक्यातील नद्या तर आत्ताच कोरड्या पडू लागल्याने टंचाई फेब्रुवारी महिन्यापासून जाणवणार आहे. विविध कंपन्या व वीटभट्यांचा पाणीपुरवठा बंद करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.तालुक्याला तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी या पाच नद्यांमुळे मुबलक पाणी साठा असूनही नियोजना आभावी तुटवडा जाणवतो. तालुक्यात १६८ गावे व पाचशेहून अधिक पाडे आहेत. त्यामुळे या समस्येने उग्र रूप धारण करीत आहे. येथील रोलिंग मिल्स, शीतपेये बनवणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. त्यामुळे पाण्याचा उपसाही मोठ्या प्रमाणात होत आहे. हेही पाणी कमी पडते म्हणून खासगी कुपनलिकेतील पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे पातळीतही घट होत आहे. पूर्वी कुपनलिकेला ३०० फुटांवर पाणी लागायचे आता ५०० फुटांपर्यत खोदकाम करावे लागते. त्यावरुन पाण्याच्या पातळीची कल्पना करता येईल. तालुक्यात रोलिंग मिल्स मोठ्या संख्येने आहेत. त्यातच शीतपेये बनवणाºया कंपन्याही आहेत. त्यांना रोज हजारो लीटर पाणी लागते. त्यातच कंपन्यांनी कारखान्यात सुद्धा कुपनलिका मारल्या आहेत. ते पाणी कमी पडल्यानंतर टॅकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे गावोगावी टॅकरने पाणीपुरवठा करण्याचा व्यवसाय तेजीत आहे. यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.>पाच नद्यांवर प्रत्येकी दहा किमी अंतरावर बंधारे बांधले असते तर शेतकºयांबरोबर कारखानदारांचाही पाण्याच्या प्रश्न सुटला असता. या पाणी टंचाईमुळे शेतकºयांचेही मोठे नुकसान होत आहे.- प्रा.धनंजय पष्टे, सामाजिक कार्यकर्ते>कुडूस परिसरात लोहोपे येथे विस्तीर्ण बंधारा आहे. या बंधाºयातील गाळ काढल्यास अधिक पाणी साठा होऊन आजुबाजुच्या दहा पंधरा गावातील गावकरी, शेती व उद्योगांचा प्रश्न सुटू शकतो.- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते