शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

डिसेंबरमध्येच नद्या पडू लागल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:39 IST

या वर्षी दोन महिने अगोदरच पावसाने दडी मारल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट होताना दिसत आहे.

- वसंत भोईरवाडा : या वर्षी दोन महिने अगोदरच पावसाने दडी मारल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट होताना दिसत आहे. तालुक्यातील नद्या तर आत्ताच कोरड्या पडू लागल्याने टंचाई फेब्रुवारी महिन्यापासून जाणवणार आहे. विविध कंपन्या व वीटभट्यांचा पाणीपुरवठा बंद करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.तालुक्याला तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी या पाच नद्यांमुळे मुबलक पाणी साठा असूनही नियोजना आभावी तुटवडा जाणवतो. तालुक्यात १६८ गावे व पाचशेहून अधिक पाडे आहेत. त्यामुळे या समस्येने उग्र रूप धारण करीत आहे. येथील रोलिंग मिल्स, शीतपेये बनवणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. त्यामुळे पाण्याचा उपसाही मोठ्या प्रमाणात होत आहे. हेही पाणी कमी पडते म्हणून खासगी कुपनलिकेतील पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे पातळीतही घट होत आहे. पूर्वी कुपनलिकेला ३०० फुटांवर पाणी लागायचे आता ५०० फुटांपर्यत खोदकाम करावे लागते. त्यावरुन पाण्याच्या पातळीची कल्पना करता येईल. तालुक्यात रोलिंग मिल्स मोठ्या संख्येने आहेत. त्यातच शीतपेये बनवणाºया कंपन्याही आहेत. त्यांना रोज हजारो लीटर पाणी लागते. त्यातच कंपन्यांनी कारखान्यात सुद्धा कुपनलिका मारल्या आहेत. ते पाणी कमी पडल्यानंतर टॅकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे गावोगावी टॅकरने पाणीपुरवठा करण्याचा व्यवसाय तेजीत आहे. यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.>पाच नद्यांवर प्रत्येकी दहा किमी अंतरावर बंधारे बांधले असते तर शेतकºयांबरोबर कारखानदारांचाही पाण्याच्या प्रश्न सुटला असता. या पाणी टंचाईमुळे शेतकºयांचेही मोठे नुकसान होत आहे.- प्रा.धनंजय पष्टे, सामाजिक कार्यकर्ते>कुडूस परिसरात लोहोपे येथे विस्तीर्ण बंधारा आहे. या बंधाºयातील गाळ काढल्यास अधिक पाणी साठा होऊन आजुबाजुच्या दहा पंधरा गावातील गावकरी, शेती व उद्योगांचा प्रश्न सुटू शकतो.- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते