शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

शिरगावमध्ये घडले माणुसकीचे दर्शन; विधवेला केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 06:11 IST

टांग्याच्या घोड्याचा उपासमारीने मृत्यू

हितेन नाईक

पालघर : आपल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या टांग्याचा एक घोडा उपासमारीने मृत झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शिरगावच्या विधवा महिला सईदा शेख हिला एक घोडा खरेदी करून देत स्पर्श फाउंडेशनच्या संगीता धोंडे यांनी दाखविलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

जिल्ह्यातील पालघरसह सातपाटी, शिरगाव, वडराई आदी भागातील अनेक लोक अनेक वर्षांपासून घोडागाडी (टांगा) व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन झाल्याने बाजारपेठा, दुकाने बंद करण्यात आल्याने या व्यवसायावर मोठे गंडांतर आले आहे. ज्या व्यवसायावर आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो, तोच व्यवसाय बंद पडल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत त्या व्यावसायिकांना पडली आहे. आपल्या कुटुंबियांनाच दोन वेळचे जेवण मिळणे मुश्कील झाल्याने या घोड्यांना खायला कुठून अन्न पुरवायचे, असा प्रश्न त्या घोडा मालकापुढे निर्माण झाला होता. शेवटी त्यांना चरण्यासाठी मोकळे सोडल्यानंतरही त्यांना चणे, भुसा आदी नेहमीचा होणारा अन्नाचा पुरवठा बंद झाल्याने अनेक घोड्यांची प्रकृती खालावली होती. त्यातच त्यांना निर्माण झालेल्या आजारावर उपचार करण्यासाठी शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात जाणेही लॉकडाऊन आणि अवास्तव खर्चामुळे शक्य नसल्याने या भागात पाच घोड्यांचा उपासमारीने व वेळीच औषधोपचार न झाल्याने मृत्यू झाला होता. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत संगीता धोंडे, समाजसेविका वैशाली ऊर्फ लिनेट चव्हाण, मनसेच्या तुलसी जोशी आदींनी संकटात सापडलेल्या घोडा व्यावसायिकांना खाद्य पुरविले होते.

शिरगावच्या सईदा शेख यांच्या पतीचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर मुलगा सिकंदरला सोबत घेत तिने आपला टांग्याचा व्यवसाय पुढे सुरू ठेवला. मात्र अचानक लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडून घोडाही मरण पावल्याने या कुटुंबियांचे आर्थिक गणितच कोलमडले होते. एका घोड्याच्या सहाय्याने टांगा हाकायचा कसा? असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला होता. पालघरच्या स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता धोंडे, त्यांचे पती भरत धोंडे, मुलगी सुरभी धोंडे यांच्या प्रयत्नाने त्यांनी जिल्ह्यातील एका गरजू व्यक्तीकडून एक घोडा विकत घेत सईदाच्या स्वाधीन केला. रमजानच्या पवित्र महिन्यात ‘अल्ला’ने आपली हाक ऐकून आपल्या घरचे डळमळलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आपल्याला अनमोल भेट पाठविल्याने त्यांनी धोंडे कुटुंबियांसह अल्लाचे आभार मानले.