शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारमध्ये संवादापेक्षा विसंवादच- दरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:39 IST

आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आज एवढे दिवस उलटून गेले तरी खातेवाटप जाहीर होत नसून या सरकारमध्ये संवादापेक्षा विसंवादच अधिक आहे,

बोईसर : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आज एवढे दिवस उलटून गेले तरी खातेवाटप जाहीर होत नसून या सरकारमध्ये संवादापेक्षा विसंवादच अधिक आहे, अशी जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बोईसर येथे पत्रकार परिषदेत केली.पालघर जिल्ह्याच्या ७ जानेवारीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरेकर हे शनिवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांच्या गाठीभेटी व बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी बोईसर येथील रेयांश होटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आ.भाई गिरकर, पालघर जिल्हा परिषदेचे कृषि सभापती अशोक वडे, शिवशक्ती सामाजिक संघटनेचे ज्येष्ठ नेते संजय पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र संखे व वीणा देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष प्रमोद आरेकर आदी उपस्थित होते.मागील पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील विशेषत: आदिवासीसाठी विशेष योजना राबवून जिल्ह्यासह या राज्याला प्रगतिपथावर नेण्याचे प्रामाणिक काम केल्याने पालघरवासीयांना आपला मुख्यमंत्री व्हावा असे वाटते होते आणि त्यामुळेच पालघर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल, असे चित्र या ठिकाणी दिसत असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.पाच वर्षाच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने जनाधार दिला होता, परंतु दुर्दैवाने ज्या एका विचारधारेवर भाजप व शिवसेना एकत्र होती ती विचारधारा सोडून शिवसेनेने ज्यांच्याबरोबर आयुष्यभर संघर्ष केला त्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकत्र येऊन सत्तेसाठी महाविकास आघाडी बनवण्यात आली, असे दरेकर यांनी सांगितले. ती आघाडी बनविल्यानंतर काय चित्र आहे ते आज संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे, असेही ते म्हणाले.>महिना-दीड महिन्यात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपला मोठे यश मिळाले. त्यामुळे जनतेचा ट्रेंड हा भाजपच्या मागे आहे म्हणून पालघर जिल्हा परिषद सुद्धा भाजप व राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून या जिल्ह्यातील नागरिक हे भाजपच्या मागे उभे राहतील, असे दरेकर म्हणाले.