शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धोक्याचा प्रवास; मार्गदर्शक पट्टे धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 01:54 IST

अनेक ठिकाणचे उड्डाणपूल दिव्यांविना, भटक्या गुरांचाही मुक्त संचार

पारोळ : वसई तालुक्यातून जात असलेल्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, यामुळे अपघातांत वाढ होत असल्याने निरपराध नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या मार्गावर मार्गदर्शक पट्टे धूसर असून यात मार्गावर येणारी सातीवली, वसई फाटा, नालासोपारा फाटा, पेल्हार, विरार फाटा, शिरसाड या उड्डाणपुलांच्या आत दिवे नाहीत, तसेच या सर्व उड्डाणपुलांजवळ अवैध पार्किंग होत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा येतो, तसेच या मार्गावर भटक्या गुरांचाही मुक्त संचार होत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते, मात्र या मार्गावर मार्गदर्शक पट्टे दिसत नाहीत. वाहने भरधाव वेगात धावत असल्याने अपघात घडण्याची शक्यता असून मार्गदर्शक पट्टे लावण्याची मागणी वाहनचालकांतर्फे जोर धरू लागली आहे. भटक्या जनावरांचा वावर, उड्डाणपूल आणि पथदिव्यांचा अभाव त्याचबरोबर सुरक्षित जाळ्या नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागात म्हणजेच वसई सातिवली, खानिवडे टोलनाका या रस्त्यांवर मार्गदर्शक पट्टेच नसल्याचे दिसून आले आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी असतात, सोबत वाहतूककोंडीही असल्याने चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. या मार्गावर दुचाकीने प्रवास करणारेही अनेक जण आहेत. अवजड वाहने नजीक येताच त्यांची भीतीने तारांबळ उडते. अनेकदा वाहने घसरणे, अपघात होणे अशा घटना घडतात. थंडी सुरू झाल्याने मार्गावर धुकेही असते. अशा वेळेस मार्गदर्शक पट्टे नसल्याने अडचणींत वाढ होत आहे.

इस्पितळ नसल्याने चिंताएखादी दुर्घटना घडल्यास महामार्गावर इस्पितळ नसल्याने मुंबई किंवा वसईच्या रुग्णालयात नेण्यासाठी अधिक वेळ लागतो. यामध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा धोकादायक रस्त्यांवरून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.  

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार