शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धोक्याचा प्रवास; मार्गदर्शक पट्टे धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 01:54 IST

अनेक ठिकाणचे उड्डाणपूल दिव्यांविना, भटक्या गुरांचाही मुक्त संचार

पारोळ : वसई तालुक्यातून जात असलेल्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, यामुळे अपघातांत वाढ होत असल्याने निरपराध नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या मार्गावर मार्गदर्शक पट्टे धूसर असून यात मार्गावर येणारी सातीवली, वसई फाटा, नालासोपारा फाटा, पेल्हार, विरार फाटा, शिरसाड या उड्डाणपुलांच्या आत दिवे नाहीत, तसेच या सर्व उड्डाणपुलांजवळ अवैध पार्किंग होत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा येतो, तसेच या मार्गावर भटक्या गुरांचाही मुक्त संचार होत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते, मात्र या मार्गावर मार्गदर्शक पट्टे दिसत नाहीत. वाहने भरधाव वेगात धावत असल्याने अपघात घडण्याची शक्यता असून मार्गदर्शक पट्टे लावण्याची मागणी वाहनचालकांतर्फे जोर धरू लागली आहे. भटक्या जनावरांचा वावर, उड्डाणपूल आणि पथदिव्यांचा अभाव त्याचबरोबर सुरक्षित जाळ्या नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागात म्हणजेच वसई सातिवली, खानिवडे टोलनाका या रस्त्यांवर मार्गदर्शक पट्टेच नसल्याचे दिसून आले आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी असतात, सोबत वाहतूककोंडीही असल्याने चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. या मार्गावर दुचाकीने प्रवास करणारेही अनेक जण आहेत. अवजड वाहने नजीक येताच त्यांची भीतीने तारांबळ उडते. अनेकदा वाहने घसरणे, अपघात होणे अशा घटना घडतात. थंडी सुरू झाल्याने मार्गावर धुकेही असते. अशा वेळेस मार्गदर्शक पट्टे नसल्याने अडचणींत वाढ होत आहे.

इस्पितळ नसल्याने चिंताएखादी दुर्घटना घडल्यास महामार्गावर इस्पितळ नसल्याने मुंबई किंवा वसईच्या रुग्णालयात नेण्यासाठी अधिक वेळ लागतो. यामध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा धोकादायक रस्त्यांवरून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.  

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार